रविवार, ३१ ऑक्टोबर, २०१०

लग्नातील विक्रमी मंगळ / मंगळाची कुंडली भाग दोन.........
मंगळ आहे म्हणजे काय व तो कसा सदोष अथवा निर्दोष:-


                विवाह जमविताना वधू किंवा वर यांच्या जन्मकुंडलीत १,४,७,८,१२ या स्थानांत मंगळ ग्रह असता मंगळाची पत्रिका म्हणून विवाह जमविण्यास त्याज्य मानली जाते. अगदी अर्वाचीन काळात व चालू युगात तर प्रेमविवाहाला ऊत येऊन त्यास मोठे प्राधान्य प्राप्त झाले आहे. त्यातल्या त्यात मुलामुलींच्या इच्छेशिवाय विवाह करावयाचा नाही, असे पालकांचे धोरणही दिसते. पण मुलामुलीच्या पत्रिकेत मंगळ आहे म्हणून त्यांची डोकेदुखी उत्पन्न होते. विचार करण्याची गोष्ट अशी की, आपण इतिहास, पुराणे वाचतो. त्यात विवाह, प्रेमविवाह करावयाचा म्हटल्यास मंगळाला किती महत्त्व द्यावे ही एक विचार करण्यासारखी बाब आहे. अलिकडे मंगळाचे खूळ अत्यंत वाढले असून त्यामुळे विवाह जमविण्यास अत्यंत कष्ट पडतात. म्ह्णून अनेक विद्वानांनी ग्रंथ लिहिले आहेत. त्यांचे अवलोकन केल असता शेक १५२५ नंतर मंगळाचा दोष मानण्यात येऊ लागला, असे पीयूषधारा या मुहूर्त चिंतामणीवरील टीकेवरुन दिसून येते.

               जसा मंगळाचा दोष पाहिला जातो, त्याचप्रमाणे रवी, शनि, राहू व केतू यांचाही दोष पाहाणे अगत्याचे आहे. त्यातल्या त्यात शनीसारख्या पापग्रहाच दोष डोळ्याआड करुन चालणार नाही. कारण शनी मृत्यू देतो. इतर पापग्रहसुद्धा मंगळाप्रामाणेच वैद्यव्य, स्त्रीसुखनाश वगैरे फ़ले देतात. परंतु या गोष्टीकडे आजकाल दुर्लक्ष केले जाते, ही दुर्देवाची गोष्ट आहे.

                काही विद्वान ज्योतिष्यांच्या मते २,५,१०,११ ही स्थाने मंगळाच्या दोषाची म्हणून मानावीत असे आहे. परंतु या स्थानांवरुन वैधव्य अगर स्त्रीसुखहानीचा विचार केला जात नाही. या स्थानंतील मंगळ फ़ार तर संततिसुख व कौटुंबिक सुख यावर अनिष्ट परिणाम करु शकेल. परंतु द्वितीय स्थान म्हणेजे कुटुंबस्थान शुद्ध असावे असे माझ्या गुरुचे मत आहे. म्हणजे या स्थानांत पापग्रह असू नयेत. कारण त्या पापग्रहाची दृष्टी अष्टम स्थानी पडते. केरळ व मद्रास प्रांतातील ज्योतिषी २,४,७,८,१२ या स्थानांतील मंगळाचा दोष मानतात. आपल्याकडील ज्योतिषी प्रथम स्थानी असलेल्या मंगळाचा दोष मानतात व कुटुंबस्थानात असलेल्या मंगळाचा दोष मानीत नाहीत.

                काही विद्वान ज्योतिष्यांच्या मते मंगळाचे दोष पाहण्याचे दोनतीन प्रकार आढळतात. १. चंद्रपासून, २. लग्नापासून, ३. सप्तमेशापासून मंगळ मोजतात. पण यापैकी विश्वसनीय प्रकार कोणता हे कोणीच सांगत नाहीत. पण सर्वेषाम व्यवहारात बहुतेक ज्योतिषी लग्नापासूनच मंगळाचा दोष पाहतात असे दिसून येते.

                कुंडलीमध्ये विवाहसौख्याचा विचार करताना प्रामुख्याने सप्तमस्थानाचा विचार करतात, लग्नस्थान, चंद्राचे सप्तमस्थान, शुक्र, शुक्राचे सप्तमस्थान तसेच अभाग्यस्थानही विचारत घ्यावे लागते, प्रमेविवाह योगासाठी पंचमस्थान आणि लाभस्थानही त्या जोडीने पाहावे लागते, प्रेमविवाहचा विचार करताना, कुंडलीत शुक्र आणि मंगळाचा शुभयोग असेल, मग तो कुठल्याही स्थानात असेल तरी त्याची फ़ळे ही मिळतातच. वैवाहिक जीवनातील स्वास्थ्य, सुख, समृद्धी आणि भरभराट यांसाठी गुरु ग्रह लक्षात घ्यावा लागतो. गुरुची लग्न अथवा चंद्र तसेच सप्तमस्थान, पंचमस्थान, भाग्यस्थान अथवा शुक्र यांवर जर शुभदृष्टी असेल तर वैवाहिक स्वास्थ्य निश्चित मिळते. लग्नेश अथवा चंद्र, सप्तमेश, शुक्र भाग्येश, चंद्र, सप्तमेश , शुक्र अथवा भाग्येश याची अंतर्दशा अथावा गुरुच्या महादशेत पंचमेशाची अथवा चंद्राची अंतर्दशा तसेच पंचमेश अथवा चंद्राच्या महादशेतील गुरुची अंतर्दशा हा काळ संततिसौख्याच्या दृष्तीने उत्कर्षाचा काळ ठरतो, लग्न, चंद्र, शुक्र, सप्तमस्थान यांवरुन गोचरेच्या शुभग्रहांचे भ्रमण शुभ फ़लदायी ठरणारे असते. चंद्र , शुक्र, गुरुची गोचर भ्रमणे केंद्रातून अथवा कोनातून होत असतात तेव्हा विवाहसौख्याच्या दृष्तीने शुभ फ़ळे मिळतात. मूळ पत्रिकेत चंद्र-शुक्राचे शुभयोग, चंद्र-गुरुचे शुभयोग अथवा गुरु-शुक्राचे शुभयोग असतील, तर प्रदीर्घ विवाहसौख्य लाभते. सप्तमेश, लग्नेश, भाग्येश चंद्र, शुक्र हे ग्रह शुभ नक्षत्रात पडले असतील, तर वैवाहिक जीवनात प्रदीर्घ स्वास्थ लाभते. साडेसाती नसेल तसेच राहु-केतु, हर्षल , नेपच्यून आदी अशुभ ग्रहांचे भ्रमण चंद्र, शुक्र, लग्न, सप्तम स्थानांतून नसेल असा कालावधी विवाहसौख्याच्या दृष्टीने शुभयोग असतील तरच गोचरेच्या शुभ ग्रहयोगांमध्ये उत्कर्षदायी घटना घडतात.

                सप्तमस्थान हे व्यक्तीच्या जीवनावा फार मोठा परिणाम करणारे एक अंत्यंत प्रबल असे स्थान आहे. लग्नस्थान म्हणजे स्वतः व्यक्ति व त्याच्या समोरच असणाए सप्तमस्थान म्हणजे पत्नि. हे स्थान सर्व पकारच्या स्त्री-सौख्याच्या दृष्टीने महत्त्वाचे समजले जाते. मुख्यतः लैगिक भावनांवर परिणाम करणारे हे स्थान असल्याने व्यक्तीला वैवाहिक जोडीदारापासून मिळणार्या शारीरिक, मानसिक, सौख्याचा विचार ह्या स्थानावरुन करतात. व्यक्तीची विवाहबद्दलची मते, स्त्रीयांबद्दलचे/पुरुषाबद्दलचे विचार, त्याचे चारित्र्य, व्याभिचारी वृत्ति, अनैतिक संबंध व्यक्तीची लैगिक ताकद, पुरुषत्व, नपंसकत्व, जोडीदाराचे स्वरुप, रंग, स्वभाव, तसेच पतिपत्नीमधील प्रेम्, आपुलकी अथवा मतभिन्नता, मतवैचिव्य, मत्सर आणि जोडीदारासंबधी दैवी त्रास, आजार, मृत्यू, द्विभार्यायोग, वैधव्य, घटस्फोट अशा नाना गोष्टीचे दर्शन कुंडलीत सप्तमस्थानावरुन होत असते.

            ज्योतिषशात्र नव्याने शिकणार्या विद्यार्थ्यानी प्रथम ह्या स्थानांतील ग्रहांचा अभ्यास करावा. त्या ग्रहाच्या नैसर्गिक गुणधर्मानुसार सुखदु:खाचे स्वरुप व तीव्रता अवलंबून असते.सप्तमातील ग्रह व राशीवरुन जोडीदाराच्या रुपाची व स्वरुपाची कल्पना येऊ शकते. सर्वसाधारण रवि, मंगळ, शनि, राहू, हर्षल, नेपच्यून हे ग्रह सप्तमस्थानांत अशुभफलदायी असतात.प्रत्येक ग्रहाचे सप्तमस्थानातील परिणाम पुढील प्रकारणात दिलेले आहेत. सप्तमस्थानातील ग्रह स्वराशीत, उच्च राशीत, मूलत्रिकोणराशीत सामन्यपणे शुभफलदायी असतो. अशुभफलदायी ठरतो. सप्तमभावारंभाजवळ असणारा ग्रह सप्तमांत असता अशुभफलदायी ठरतो. सप्तमभावारंभाजवळ असणारा ग्रह शुभाशुभ परिणाम जास्त तीव्रतेने करतो.

क्रमश......

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०१०

[ लग्नातील विक्रमी मंगळ / मंगळाची कुंडली ]

                तुलशी विवाह नंतर अनेक घरातून वधू-वराच्या शोध मोहीमेस सुरुवात होते. पण आजच्या जगात कुंडलीशास्त्राला महत्व न देता, विज्ञानशास्त्राला महत्व देतात. विवाह ही एक नैसर्गिक अशी सामाजिक व धार्मिक बाब आहे असे मानले जाते. हिंदुधर्मशास्त्रात शास्रकारांचे मते धर्माचरणासाठी स्त्री व पुरुष यांनी एकमेकांचा पती-पत्नी या नात्याने केलेला अंगिकार म्हणजे विवाह. सामाजिकदृष्ट्या पाहिले तर रजिस्टर विवाह म्हणजे कायद्याने सुसंगत असलेला स्त्री-पुरुषांचा पती-पत्नी या नात्याचा संबध होय.

                भूतकाळाची विस्मृती आणि भविष्यकाळाचे अज्ञान या दोन शापवत वरदानामुळेच प्रत्येक व्यक्ति वर्तमानकाळात वावरत असते. अशा वेळी तिचे पूर्वसंचित, तिने केलेल्या पापपुण्याचा संचय त्या व्यक्तिवर अंमल करीत असतो आणि वर्तमानकाळ घडवीत असतो. त्याचे श्रेय त्याला उपभोगावयाला मिळत असते. हे झाले सामाइक जीवितासंबधी. पण वंशवृध्दीकरिता पुरुषाला स्त्रीची आवश्यकता आहे. तसेच स्त्रीजन्माचे सार्थक व्हावे म्हणून स्त्री पुरुषाचा अंगिकार करते. हिंदू संस्कृतीनुसार विवाहाचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत.

                  १. कुटुंबस्थापना २. शरीरसुख ३. संतानप्राप्ती ४. पारस्पारिक सहयोगी जीवन ५. धर्माचरण

                या कारणास्तव अशा तर्हे ने दोन मनं एकत्र येऊन “शुभ मंगल सावधान” या बोधवाक्याने विवाहबध्द होऊन ते जगापुढे पती-पत्नी या स्वरुपात येतात. कारण त्याचे भूतकाळी घडलेले कर्मफ़ळ हे गुप्त असून या जन्मी उन्मीलित होऊन ते भोगावयास येते. त्यावरच मिळणार्याा सुखात किंवा दु:खात वैवाहिक जीवन समाविष्ट आहे. विवाहसंबंध केवळ विषयभोगाकरिता वा लौकिक व्यवहारकरिता घडत नाहीत तर धर्माचरणाकरिता दोन ह्रदयांचे जे दृढ संमिलन तोच विवाह होय. याकरिता अज्ञानाने केलेले कोणतेच कार्य चांगले नसते हा प्रत्यक्ष नियम आहे. ज्ञान हे सर्व सुखाचे व उन्नतीचे मूळ आहे. म्ह्णून ज्योतिषशास्त्राधारे वधु-वरांच्या पत्रिकेची छाननि करुन विवाह केल्याने वृध्दि होईल.

               कुंडलीतील मंगळदोषामुळे अनेक मुलामुलीची लग्ने अडून राहातात. याचा विचार करुन माझ्या साईटवर मंगळदोषाचे विवेचन व मार्गदर्शन करुन मंगळामुळे येणार्याा अडचणींचे प्रश्न सुटतील व ज्योतिष्य सांगणार्याळ ज्योतिष्याना वधुवराची कुंडली नीट अभ्यासून आपल्या जातकाला योग्य मार्गदर्शन करावे एवढीच स्वामी चरणी प्रार्थना.

                संदर्भ ग्रंथ :- विवाह योग, मंगळ कोश, मंगळाला घाबरु नका, आरोग्य जातक, जातकशिरोमणि, ज्योतिर्मयूरव, आपला योग कधी?, वैवाहिक जीवनात अडथळे आणणारे ग्रहमान, भारतीय फ़ल ज्योतिष, आरोग्य जातक, जन्म कुंडलीवरुन आपले भविष्य आपणच पहा, नवग्रह व त्याची फ़ळे इत्यादि पुस्तकाचा संदर्भासाठी वापर करणार आहे यांची प्रकाशकानी व वाचकानी नोद घ्यावी ही विनंती.

                पत्रिका जमते की न जमते हे कसे पहावे, या गोष्टीकडे आपण आता वळू, बर्याळच काळापासून वधूची पत्रिका घेऊन, ती वराच्या पत्रिकेशी जमते, की नाही, हे पहाण्याचा प्रघात व रुढी पडलेली आहे. पडलेली रुढी मोडण्यास फ़ार त्रास व विरोध होतो. पूर्वी काहीतरी प्रामाणिकपणे पत्रिका पाहिली जात होती. पण, आता तसे घडत नाही. मुलगी चांगली असली की, पत्रिकेत काही दोष असला तरी, पत्रिका जमतेय असे सांगून लग्न ठरविणॆच्या गडबडी सुरु होतात. मुलीचा विवाह कोठे जमत नसेल, तर पालक पत्रिकेत बदल करतात व पत्रिका देतात. अशा स्थितीत विवाह होऊन, पुढे काही अरिष्ट निर्माण झाल्यानंतर आयुष्याचा जो गोधळ उडतो, त्याला पारावार असत नाही. तरी सूज्ञ जनांनी तसे करु नये, थोडी रुढी मोडावी, ती दोघांच्या हितासाठी; ती अशी: वर व वधू पक्षांनी एकमेकांस वर-वधूच्या पत्रिका देऊन त्या एकमेकांशी जुळतात किंवा नाहीत, हे ठरवून मग पुढील वाटाघाटीस लागावे. काहीच न पाहाता योगायोग असेल तसे घडेल, असे म्हणावे हे सर्वात चांगले. ज्या लोकाचा पत्रिकेवर विश्वास नसेल त्यांनी वधूवराची रक्त गटाची नुसती चाचणी न करता त्याची डी.एन.ऐ. चाचणी करावी कारण ह्या चाचणीत सर्वगोष्टीचा उलघडा होऊन पुढील अनर्थ टाळता येतो.

                मंगळाची परिभाषिक माहिती स्वगृहे : मेष व वृश्चिक ( वृश्चिक राशीचे अधिपत्य पाश्चात्य ज्योतिषांनी प्लुटोकडे दिले आहे. )

                मूल त्रिकोण रास :- मेष, मूल त्रिकोण राश्यंश ० ते १२ अंश, स्वराशीचे अंश १३ ते ३० अंश; उंच्च राशी :- मकर उच्चांश २८ अंश ; नीच राशी - कर्क, नीचांश २८ अंश; मध्यम गती २३ कला व ३० विकला दररोज, संख्या - ९, देवता- कर्तिकेय; अधिकार- सेनापती; दर्शकत्व - शारीरिक बल; शरीर वर्ण- तांबूस;गौर वर्ण; शरीरांगर्गत धातू - मज्जा; तत्त्व अग्नी; विषय- नेत्रांनी ग्रहण होणारा व ज्ञान होणारा असा रुपविषय; कर्मेन्द्रिय - हात; ज्ञानेन्द्रिय - नेत्र, त्रिदोषांपैकी दोष - पित्त, त्रिगुणापैकी गुण- तमोगुण, लिंग पुरुष; रंग- लालभडक, द्र्व्य- सुवर्ण; धातू लोखंड.

                निवासस्थान - अग्निस्थान - स्वयंपाकघर; दिशा - दक्षिण; जाती क्षत्रिय; रत्न - पोवळे; रस - कडू, ऋतू - ग्रीष्म, वय - बाल ४ वर्षेपर्यंत; दृष्टी - ऊर्ध्व; उदय - पृष्ठोदय; स्थलकारकत्व- पर्वत, अरण्ये, किल्ले, भाग्योदय वर्ष २८ वे. अनुकूल भाव : तृतीय, षष्ठ, दशम, एकादश. प्रतिकूल भाव : द्वितीय, अष्टम, द्वादश; बाधस्थान : सप्तम स्थान; अनुकूल राशी : मेष, वृषभ, कर्क, वृश्चिक, धनु, मकर व मीन; प्रतिकुल राशी: मिथुन, कन्या, तुला व कुंभ; मित्र ग्रह : रवि, चंद्र, गुरु; शत्रु ग्रह: बुध; सम ग्रह ; शुक्र व शनि. नविन ग्रहाशी शत्रू-मैत्री : हर्शल ( प्रजापती ) मंगळाचा शत्रू, नेपच्यून ( वरुण ) मंगळाशी सम, प्लुटो ( रुद्र ) मंगळाचा मित्र.

                क्रंमश ………….. टिप आपले प्रश्न पाठविताना सोबत जन्मतारीख, वेळ व ठिकाण , दूरध्वनी क्रंमाक लिहण्यास विसरु नये. योग्य मानधन घेऊन कुंडली सोडवलि जाईल किंवा मानधनाच्या रुपात आपल्याला जवळच्या वैद्यकिय रुग्णालयात जाऊन तेथील गरजू व्यक्तिना औषधाच्या स्वरुपातील मद्दत करावी रुग्णालयाची किंवा गरिब रुग्णाची माहीती विचारल्यास आपल्या परिसरातील रुग्णालयाची किंवा सेवाभावि संस्थेची माहिती दिली जाईल.