शनिवार, ३० ऑक्टोबर, २०१०

[ लग्नातील विक्रमी मंगळ / मंगळाची कुंडली ]

                तुलशी विवाह नंतर अनेक घरातून वधू-वराच्या शोध मोहीमेस सुरुवात होते. पण आजच्या जगात कुंडलीशास्त्राला महत्व न देता, विज्ञानशास्त्राला महत्व देतात. विवाह ही एक नैसर्गिक अशी सामाजिक व धार्मिक बाब आहे असे मानले जाते. हिंदुधर्मशास्त्रात शास्रकारांचे मते धर्माचरणासाठी स्त्री व पुरुष यांनी एकमेकांचा पती-पत्नी या नात्याने केलेला अंगिकार म्हणजे विवाह. सामाजिकदृष्ट्या पाहिले तर रजिस्टर विवाह म्हणजे कायद्याने सुसंगत असलेला स्त्री-पुरुषांचा पती-पत्नी या नात्याचा संबध होय.

                भूतकाळाची विस्मृती आणि भविष्यकाळाचे अज्ञान या दोन शापवत वरदानामुळेच प्रत्येक व्यक्ति वर्तमानकाळात वावरत असते. अशा वेळी तिचे पूर्वसंचित, तिने केलेल्या पापपुण्याचा संचय त्या व्यक्तिवर अंमल करीत असतो आणि वर्तमानकाळ घडवीत असतो. त्याचे श्रेय त्याला उपभोगावयाला मिळत असते. हे झाले सामाइक जीवितासंबधी. पण वंशवृध्दीकरिता पुरुषाला स्त्रीची आवश्यकता आहे. तसेच स्त्रीजन्माचे सार्थक व्हावे म्हणून स्त्री पुरुषाचा अंगिकार करते. हिंदू संस्कृतीनुसार विवाहाचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत.

                  १. कुटुंबस्थापना २. शरीरसुख ३. संतानप्राप्ती ४. पारस्पारिक सहयोगी जीवन ५. धर्माचरण

                या कारणास्तव अशा तर्हे ने दोन मनं एकत्र येऊन “शुभ मंगल सावधान” या बोधवाक्याने विवाहबध्द होऊन ते जगापुढे पती-पत्नी या स्वरुपात येतात. कारण त्याचे भूतकाळी घडलेले कर्मफ़ळ हे गुप्त असून या जन्मी उन्मीलित होऊन ते भोगावयास येते. त्यावरच मिळणार्याा सुखात किंवा दु:खात वैवाहिक जीवन समाविष्ट आहे. विवाहसंबंध केवळ विषयभोगाकरिता वा लौकिक व्यवहारकरिता घडत नाहीत तर धर्माचरणाकरिता दोन ह्रदयांचे जे दृढ संमिलन तोच विवाह होय. याकरिता अज्ञानाने केलेले कोणतेच कार्य चांगले नसते हा प्रत्यक्ष नियम आहे. ज्ञान हे सर्व सुखाचे व उन्नतीचे मूळ आहे. म्ह्णून ज्योतिषशास्त्राधारे वधु-वरांच्या पत्रिकेची छाननि करुन विवाह केल्याने वृध्दि होईल.

               कुंडलीतील मंगळदोषामुळे अनेक मुलामुलीची लग्ने अडून राहातात. याचा विचार करुन माझ्या साईटवर मंगळदोषाचे विवेचन व मार्गदर्शन करुन मंगळामुळे येणार्याा अडचणींचे प्रश्न सुटतील व ज्योतिष्य सांगणार्याळ ज्योतिष्याना वधुवराची कुंडली नीट अभ्यासून आपल्या जातकाला योग्य मार्गदर्शन करावे एवढीच स्वामी चरणी प्रार्थना.

                संदर्भ ग्रंथ :- विवाह योग, मंगळ कोश, मंगळाला घाबरु नका, आरोग्य जातक, जातकशिरोमणि, ज्योतिर्मयूरव, आपला योग कधी?, वैवाहिक जीवनात अडथळे आणणारे ग्रहमान, भारतीय फ़ल ज्योतिष, आरोग्य जातक, जन्म कुंडलीवरुन आपले भविष्य आपणच पहा, नवग्रह व त्याची फ़ळे इत्यादि पुस्तकाचा संदर्भासाठी वापर करणार आहे यांची प्रकाशकानी व वाचकानी नोद घ्यावी ही विनंती.

                पत्रिका जमते की न जमते हे कसे पहावे, या गोष्टीकडे आपण आता वळू, बर्याळच काळापासून वधूची पत्रिका घेऊन, ती वराच्या पत्रिकेशी जमते, की नाही, हे पहाण्याचा प्रघात व रुढी पडलेली आहे. पडलेली रुढी मोडण्यास फ़ार त्रास व विरोध होतो. पूर्वी काहीतरी प्रामाणिकपणे पत्रिका पाहिली जात होती. पण, आता तसे घडत नाही. मुलगी चांगली असली की, पत्रिकेत काही दोष असला तरी, पत्रिका जमतेय असे सांगून लग्न ठरविणॆच्या गडबडी सुरु होतात. मुलीचा विवाह कोठे जमत नसेल, तर पालक पत्रिकेत बदल करतात व पत्रिका देतात. अशा स्थितीत विवाह होऊन, पुढे काही अरिष्ट निर्माण झाल्यानंतर आयुष्याचा जो गोधळ उडतो, त्याला पारावार असत नाही. तरी सूज्ञ जनांनी तसे करु नये, थोडी रुढी मोडावी, ती दोघांच्या हितासाठी; ती अशी: वर व वधू पक्षांनी एकमेकांस वर-वधूच्या पत्रिका देऊन त्या एकमेकांशी जुळतात किंवा नाहीत, हे ठरवून मग पुढील वाटाघाटीस लागावे. काहीच न पाहाता योगायोग असेल तसे घडेल, असे म्हणावे हे सर्वात चांगले. ज्या लोकाचा पत्रिकेवर विश्वास नसेल त्यांनी वधूवराची रक्त गटाची नुसती चाचणी न करता त्याची डी.एन.ऐ. चाचणी करावी कारण ह्या चाचणीत सर्वगोष्टीचा उलघडा होऊन पुढील अनर्थ टाळता येतो.

                मंगळाची परिभाषिक माहिती स्वगृहे : मेष व वृश्चिक ( वृश्चिक राशीचे अधिपत्य पाश्चात्य ज्योतिषांनी प्लुटोकडे दिले आहे. )

                मूल त्रिकोण रास :- मेष, मूल त्रिकोण राश्यंश ० ते १२ अंश, स्वराशीचे अंश १३ ते ३० अंश; उंच्च राशी :- मकर उच्चांश २८ अंश ; नीच राशी - कर्क, नीचांश २८ अंश; मध्यम गती २३ कला व ३० विकला दररोज, संख्या - ९, देवता- कर्तिकेय; अधिकार- सेनापती; दर्शकत्व - शारीरिक बल; शरीर वर्ण- तांबूस;गौर वर्ण; शरीरांगर्गत धातू - मज्जा; तत्त्व अग्नी; विषय- नेत्रांनी ग्रहण होणारा व ज्ञान होणारा असा रुपविषय; कर्मेन्द्रिय - हात; ज्ञानेन्द्रिय - नेत्र, त्रिदोषांपैकी दोष - पित्त, त्रिगुणापैकी गुण- तमोगुण, लिंग पुरुष; रंग- लालभडक, द्र्व्य- सुवर्ण; धातू लोखंड.

                निवासस्थान - अग्निस्थान - स्वयंपाकघर; दिशा - दक्षिण; जाती क्षत्रिय; रत्न - पोवळे; रस - कडू, ऋतू - ग्रीष्म, वय - बाल ४ वर्षेपर्यंत; दृष्टी - ऊर्ध्व; उदय - पृष्ठोदय; स्थलकारकत्व- पर्वत, अरण्ये, किल्ले, भाग्योदय वर्ष २८ वे. अनुकूल भाव : तृतीय, षष्ठ, दशम, एकादश. प्रतिकूल भाव : द्वितीय, अष्टम, द्वादश; बाधस्थान : सप्तम स्थान; अनुकूल राशी : मेष, वृषभ, कर्क, वृश्चिक, धनु, मकर व मीन; प्रतिकुल राशी: मिथुन, कन्या, तुला व कुंभ; मित्र ग्रह : रवि, चंद्र, गुरु; शत्रु ग्रह: बुध; सम ग्रह ; शुक्र व शनि. नविन ग्रहाशी शत्रू-मैत्री : हर्शल ( प्रजापती ) मंगळाचा शत्रू, नेपच्यून ( वरुण ) मंगळाशी सम, प्लुटो ( रुद्र ) मंगळाचा मित्र.

                क्रंमश ………….. टिप आपले प्रश्न पाठविताना सोबत जन्मतारीख, वेळ व ठिकाण , दूरध्वनी क्रंमाक लिहण्यास विसरु नये. योग्य मानधन घेऊन कुंडली सोडवलि जाईल किंवा मानधनाच्या रुपात आपल्याला जवळच्या वैद्यकिय रुग्णालयात जाऊन तेथील गरजू व्यक्तिना औषधाच्या स्वरुपातील मद्दत करावी रुग्णालयाची किंवा गरिब रुग्णाची माहीती विचारल्यास आपल्या परिसरातील रुग्णालयाची किंवा सेवाभावि संस्थेची माहिती दिली जाईल.

शनिवार, ४ सप्टेंबर, २०१०

वृषभ लग्न द्वादश लग्नानुसार धनहानी आणि कर्जबाजारी योग


१. वॄषभ लग्नामध्ये दशमस्थानाचा स्वामी शनि जर षष्ठात, अष्टमात किंवा द्वादश भावात असेल तर जन्मस्थानात अर्थिक प्राप्ती नसते व त्याला जीवनामध्ये सदैव धनाची कमतरता असते. अशा व्यक्तीला जीवनात कर्जाचा सहारा घेण भाग पडते.

२. वृषभ लग्नामध्ये लग्नेश शुक्र जर षष्ठात, अष्टमात आणि द्वादश स्थान्त असेल आणि सूर्य (रवी) तुळेचा असेल तर ती व्यक्ती कर्जबाजारी होते.

३. वृषभ लग्नामध्ये द्वितीय स्थानात जर पाप ग्रह असेल किंवा लाभेष गुरु षष्ठात, अष्टमात, द्वादशात असेल तर अशा व्यक्तीला सहजपणे कर्ज मिळू शकत नाही. व ती व्यक्ती कायम दरिद्री रहाते.

४. वृषभ लग्नामध्ये केंद्रस्थानाला सोडून चंद्र, गुरु जर षष्ठमस्थान, अष्टम स्थान, द्वादशस्थानात बसला असेल तर तो संकष्ट योग मानला जातो. त्या कारणाणे जातकाला सदैव धनाची कमतरता भासते. चंद्र गुरुचा गज केसरीयोग सुध्दा बनतो. पण ६,८,व१२ स्थानात हा योग नष्ट होऊन संकष्ट योग निर्माण होतो.

५. वृषभ लग्नामध्ये अष्टमेश गुरु शत्रूस्थानात किंवा नीच राशीचा असेल किंवा बुध द्वादशस्थानात असेल तर अचानक धनहानीने जातक कर्जबाजारी बनतो.

६. वृषभ लग्नामध्ये लाभेश गुरु, षष्ठम, अष्टम व द्वादश स्थानात असेल किंवा लाभेश अस्त, पापपीडीत झाला असेल तर जातक अति गरीब असतो.

७. वृषभ लग्नामध्ये धनेश बुध अष्टमात किंवा द्वादशात व अष्टमेश गुरु वक्रि झाला असेल तर त्या जातकाच्या घनाचा नाश होतो.

८. वृषभ लग्नामध्ये धनेश बुध अस्त होऊन नीच राशीमध्ये असेल व धनस्थानात किंवा अष्टमस्थानामध्ये कुठलाही पापग्रह असेल तर तो जातक सदैव ऋण ग्रस्त असतो.

संजीव

मंगळवार, १७ ऑगस्ट, २०१०

द्वादश लग्नानुसार धनहानी आणि कर्जबाजारी योग

महेंद्र नी म्हटले...
तुमचे भविषय एकदम चूकिचे आहे. नुसते लग्न पाहून कसे काय तुम्ही भविष्य सांगु शकता?
मेष लग्नाला लग्नेश जर अष्टमात असेल तर कर्जबाजारी होतो असे तुमचे म्हणणे पुर्ण चुक आहे. माझ्या पत्रीकेत तोच योग आहे पण अजूनही म्हणजे पन्नास वर्ष झाली तरीही कर्जबाजारी झालेलो नाही, तुमच्या भविष्या प्रमाणे!
असो..

माझ्या पत्रिकेत शुक्र बुध निच भंग योग करतात तरीही कर्जबाजारी नाही मी..
कृपया असे ठोकताळे लिहून लोकांना घावरवून टाकु नका.
१५ ऑगस्ट २०१० ५-२५ pm

वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग नी म्हटले...
महेंद्रजी नमस्कार

धन्यवाद. तुम्हाला लिहिलेलं आवडतं, आवर्जुन कॉमेंट दिलयाबद्दल आभार.
कृपया जन्मतारीख वेळ व जन्म ठिकाण दिल्या उत्तम
बघतो माझे कुठेचुकले ते?

आपला संजीव
१५ ऑगस्ट २०१० ८-५५ pm


महेंद्र नी म्हटले...
माझी पत्रीका अशी आहे. मेष लग्न, चंद्र वृषभेचा, मिथुन मंगळ पराक्रमात, सुख स्थान रिकामे, पंचमात रवी आणि राहू, शष्ठात शुक्र बुध - निचभंग योगात, सप्तमात काही नाही, अष्टमात काही नाही, भाग्यात गुरु आणि शनी .दशमात काही नाही, एकादशात केतू, आणि व्ययस्थान रिकामे.

नुकतीच साडेसाती आटोपली शनीची. मला अतीशय उत्तम गेला तो काळ. तसेच राहूची महादशा पण फारच छान गेली. गुरु महादशा तर उत्त्तमच गेली कारण भाग्येश गुरु आहे म्हणुन. वेळ आणि तारीख लवकरच कळवतो तुम्हाला अभ्यासासाठी. सध्या आठवत नाही.
पण एक आहे, चर राशी केंद्रात ( १,४,७.१०,) आणि केंद्र स्थान रिकामे अशी पत्रिका आहे माझी.
१६ ऑगस्ट २०१० ११-४६ am

essbeev नी म्हटले...
या फलादेशाच्या निर्णयात दशांचा विचार करावा लागत नाही काय ??
१६ ऑगस्ट २०१० १-३० pm


महेंद्र नी म्हटले...
आणि हो.. जन्म आहे रोहिणी नक्षत्र दूसरे चरण. १२ सप्टेंबर १९६० रात्री बहुतेक साडेआठची वेळ असावी.. नक्की आठवत नाही.
१६ ऑगस्ट २०१० २-१७ pm

आणि हो.. जन्म आहे रोहिणी नक्षत्र दूसरे चरण. १२ सप्टेंबर १९६० रात्री बहुतेक साडेआठची वेळ असावी.. नक्की आठवत नाही......


सर्वतोभद्रचक्राच्या गाभार्यातून रोहीणी नक्षत्राचे द्वितीय चरण........


रोहीणी नक्षत्राचे द्वितीय चरण ( भाग्यांश ) वृषभ राशीच्या १३ अंश २० कलानंतर १६ अंश ४० कलापर्यंतचा विभाग वृषभ राशीचा पाचवा नवमांस अर्थात रोहिणीचा द्वितीय चरण, वृषभ नवमांश म्हणजे वर्गोत्तम नवमांश होय. शुक्राचा स्वनवमांश असल्यामुळे या चरणांत शुक्र उत्तम फले देतो. या चरणातील कोणताही ग्रह केंद्रस्थानात ( १,४,७,१० या स्थानात ) फल देण्याच्या दृष्टीने बलवान असतो. रोहिणी द्वितीय चरणातील कोणताही ग्रह ( गोचरीचा सुध्दा ) हा वर्गोत्तम असल्यामुळे तो शुभ फले देण्यास प्रवृत्त होतो व तो आपल्या विशोत्तरी मानाने महादशेत फले देतो. लग्नी रोहिणी नक्षत्र द्वितीय चरण नक्षत्रचरणाधिपती शुक्र तेथेच असता, किंवा तो कुंडलीत ४,७,१० या स्थानात स्वराशी नवमांशात असता तनुभावाची फले चांगली देईल. इतर स्थानात रोहिणीचा द्वितीय चरण असता व तेथे शुक्र असता स्थानजन्य फले शुभ देईल. परंतु विशेषत दोन, पाच नऊ या स्थानात असला तर अधिक चांगले इतर शुभग्रहही या चरणात वरील स्थानात शुभ फलेच देतील, परंतु ती मध्यम प्रमाणात मिळतील. बिघडलेला कोणताही ग्रह शुभ फल देण्यास असमर्थ होतो वा शुभ फले मिळण्यात अडथळे निर्माण होतात.

एकाच स्थानात राशीचे ३० अंश पूर्ण असणे असंभवीय आहे. त्याचप्रमाणे राशीत असलेला ग्रह कोणात्या अंश कलावर आहे, त्याचप्रमाणे तो ग्रह कोणात्या भावांत स्थित आहे ठरवावे लागते.

स्थूल कुंडलीत एका स्थानात मांडलेले ग्रह त्याच्या राशी-अंश कलांच्या पायावर मागच्या किंवा पुढच्या भावात स्थित असतो. उदा. षष्ठ भावाम्ध्य मेषेच्या ०७ अंशावर आहे व गुरु मेषेच्या २९ अंशावर आहे अशा वेळेला स्थूल कुंडलीत षष्ठ स्थानात मांडलेला गुरु भावचलीत कुंडलीत सप्तमभावात मांडला जाईल. हा गुरु मेषेचाच असतो. वृषभेचा म्हणण्याचे कारण नाही. काही लोक असे म्हणतात की, भावचलीतात तो वृषभेचा झाला. पण हे सर्वस्वी चूक आहे. फल षष्ठ स्थानाचे न मिळता सप्तमस्थानाचे मिळेल हे लक्षात ठेवावे.
क्रांतीवृत्तावर ज्या राशीत नक्षत्रात जो ग्रह असतो तो तेथेच असू द्या, आपल्याला चक्र वदलण्याचे सामर्थ्य नाही. मला विशेष समजते असे सांगण्याचा माझा उद्देश नाही, तर गुरुकुलाने जे आम्हाला, मला सांगितले ते वाचकांच्या समोर ठेवणे हे माझे कर्तव्य आहे. वाचकांनी ते गोड मानून घ्यावे व शंका असल्यास कृपया विचारणा करावी ही विनंती.

दिनांक १२/०९/१९६० रोजीचे पंचाग :- वार सोमवार राशी: वृषभ तिथी:- कृष्ण-७ १४:४८ पर्यंत नंतर अष्टमी योग:- सिद्धि,
करणं:- बालव, साधारण २०:३० मुंबईचे सष्ट ग्रह :-

लग्न मेष ०१:१४:३४, रवि सिंह २६:३१:२१, चंद्र वृषभ २३:०९:२४, मंगळ मिथुन ०२:०७:४१, बुध कन्य ०७:१७:५५,
गुरु धनु ०१:१६:५४, शुक्र कन्य १८:४५:५५, शनि धनुअ १८:३१:२०, राहू सिंह २१:५२:५४, केतू कुंभ, हर्षल कर्क २९:५३:०९
नेप तुला १३:५२:०९, लुप्टो सिंह १३:०३:४०

श्री महेंद्रजी आपणास कुंडलीशास्त्राची माहीती आहे असे मला मनापासून वाटते. असो. मी वरील दिलेली मुंबईचे दिनांक १२/०९/१९६० संध्याकाळी २०:३० चे सष्ट ग्रह आहेत. बघा कुंडली माडून काय जमते काय?

धन्यवाद, तुम्हाला लिहिलेलं आवडतं, आवर्जुन कॉमेंट दिलयाबद्दल आभार.
आपला संजीव

रविवार, १५ ऑगस्ट, २०१०

मेष लग्न कर्जबाजारी पणा

१. मेष लग्न असेल तर दशमभावाचा स्वामी शनि जर षष्ठात, अष्टमात किंवा द्वादशात असेल तर जातक कुठल्याही प्रकारे मेहनत करत असेल तरी तो कर्जबाजारी बनतो.

२. मेष लग्न व लग्नेश मंगळ षष्ठात, अष्ठमात, द्वादश स्थानामध्ये असेल किंवा तुळेचा मंगळ केंद्रस्थानामध्ये असेल तर जातक, व्यपारात फार मोठे नुकसान होऊन कर्जबाजारी होतो.

३. मेष लग्न व लाभेश शनी जर षष्ठत, अष्ठमात, द्वादश स्थानात असेल तर तो जातक काही वर्षासाठी कर्जबाजारी होतो.

४. मेष लग्न केंद्र स्थानाला सोडून चंद्र गुरुपासून षष्ठात, अष्टमात किंवा द्वादश स्थानामध्ये असेल तर संकष्ट योग बनतो त्या कारणाने त्या व्यक्तिला सदैव धनाचा अभाव असतो.

५. मेष लग्नामध्ये धनेश शुक्र अस्त असेल व नीच राशीत किंवा धनस्थान व अष्टम स्थानात कुठलाही पापग्रह असेल तर जातक सदैव कर्जबाजारी राहते, कर्ज शेवटपर्यंत असते.

६. मेष लग्न लाभेश शनि षष्ठात, अष्टमात, द्वादश स्थानात बसला असेल किंवा धनेश अस्त झाला असेल किंवा पापपीडित असेल तर अशी व्यक्ति कर्जाच्या कारणाने महा दरिद्री होते.

७. मेष लग्नामधे अष्टमेश मंगळ शत्रुक्षेत्री नीच राशीत किंवा अस्त असेल तर अचानक धनहानी झाल्याने जातक कर्जबाजारी बनतो.

८. मेष लग्नामध्ये अष्टमेश मंगळ वक्रि होऊन बसला असेल तर किंवा अष्टम स्थानात कुठलाही ग्रह वक्रि होऊन वसला तर कोणत्याही कारणाने अकस्मात धनहानी होते.

अधिक माहिती साठी संपर्क साधा
संजीव

बुधवार, ११ ऑगस्ट, २०१०

एक विलक्षण अनुभव मंगळ आणि वास्तुशास्त्र, मंगळाचा दोष, मंगळाची पत्रिका, मंगळ आणि कलर थेरपी, मंगळाच्या अष्टमात शनी,


नाव:- वैभव जन्म तारीख १० फ़्रेब्रुवरी १९९५, वेळ संध्याकाळी ०५.५५ मुंबई ( परेल ).
जन्म: चंद्र राशी वृषभ, तिथी शुक्ल -११, नक्षत्र मृग, योग वैधुति, करण वणिज.

वृषभ रास :- मॄगशीर्ष नक्षत्राचा पहिला चर या राशीत येत आहे. आकाशात प्रत्यक्ष दिसणा-या बैलाच्या आकृतीस वृषभ राशी म्हणतात, ही रास कष्टाळूपणा, सोशीकपणा, सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण वृषभ राशीत असतात.

वृषभ राशी नेहमी दोन आकड्याने दाखवितात. जन्मकुंडलीतील ज्या भावात २ आकडा मांडलेला असतो त्या भावात वृषभ राशी आहे असे समजावे ही सम राशी आहे. जन्म कुंदलीतील समस्थानात सम राशी सामान्यत: बलवान असते. ही स्थिर राशी आहे.

सम राशी या सौम्य राशी आहेत. त्यामुळे निरुपद्रवता, दुस-याचे ऐकून घेणयाची वृत्ती, समजुतदरपणा, व शांतपणा हे गुण सामान्यत: दिसतात. तसेच स्त्री राशी म्हणून लज्जा, विनय, ममता, वात्सल्य, संगोपन, संसारासक्ती, घर करुन राहण्याची प्रवृती, परावलंबित्व, दुस-याच्या मदतीने पुढे येणे, कोमलता हळवेपणा, वगैरे स्त्रीचे ठिकाणी असणारे नैसर्गिक गुण स्त्री राशीत असतात. चंद्र व शुक्र हे ग्रह कोणत्याही स्त्री राशीत सामान्यत: बलवान असत्तत स्त्री राशी समभाव व समग्रह यांछे साहचर्य परस्परास पोषक असते. म्हणून समभावात समराशीत स्त्री ग्रह असता ते विशेष बलवान.

ही स्थिर राशी असल्याने स्थैर्य, प्रवासाची नावड, हिंडण्या-फ़िरण्याचा कंटाळा वस्तु व वास्तु ( राहण्याची जागा ) आणि व्यवसाय स्थिर ठेवण्याची प्रवृत्ती हे गुण या राशीत प्रमुखपणे दिसतात.ही चतुष्पाद राशी आहे. माणसाचे चालण्यावरुन या राशीचा असलेला तिरपे चालणेचा गुण दिसून येतो. चतुष्पाद राशी दशमात बलवान असतात.

वृषभ राशी ही पुथ्वीतत्वाची राशी असल्याने सुबकपणा, प्रमाणशीर अवयव रचना, निटनेटकेपणा, व्यवस्थितपणा, सह्नशिलता, सौंदर्य योग्य जुळणी करणे व योग्य मांडणी करणे वगैरे पृथ्वीतत्व प्रधान ग्रह आहे. तो या राशीत बलवान होतो. त्यामुळे पृथ्वीतत्वाचे गुण उत्कट स्वरुप धारण करतत. राशी व भाव यामध्ये पौष्यपोषकपणा असतो. त्यामुळे भाव व राशी गुण वाढतात. म्हणून समभावात सम राशीचे गुण प्रकर्षाने दिसतात.

वृषभ ही राशी पृष्ठोदय राशी आहे. ही रात्रीबली राशी आहे. ही मध्यम प्रसव राशी असल्याने ज्या भावात ती बलवान असते त्या भावने दाखविलेल्या व्यक्तिअची संख्या मध्यम असते.

जन्म नक्षत्र :-

मृगशीर्ष नक्षत्र पावचे नक्षत्र मृग नक्षत्र होय, हे नक्षत्र द्विपाद आहे. नक्षत्राचा आरंभ सिंह नवमांशाने होतो. सिंहेचा रवि व कन्येचा बुध, तुळेचा शुक्र, वृश्चिकेचा मंगळ यांचा अमंल असतो. हे नक्षत्र तीर्यमुखी,मंदलोचनी व देवगणी नक्षत्र आहे. या नक्षत्राचा राशीस्वामी शुक्र आहे, त्यामुळे कलाकौशल्य असते. नक्षत्र स्वामी मंगळ म्हणून चपळता असते व देवता चंद्र म्हणून अवखळपणा असतो. या सर्व गोष्टींचा एकत्रिपणा या नक्षत्राच्या लग्नावर दिसून येतो. ७ जूनला रवि या नक्षत्रात आला की पावसाला सुरवात होते. या नक्षत्रावर जन्मणारे जातक कुरळे केस, रेखीव भुवयांचे, बुध्दिमत्ता चांगली असलेले व पायाचा भाग निमुळता, हरणासारखा असलेले असते. शारीरिकदृष्या हे नक्षत्र बलवान नाही. या व्यक्ती उंच, मध्यम बांध्याच्या व नाजूक प्रकृतीच्या असतात.

या नक्षत्रात ११ तारे असून मार्गशीर्ष महिन्यात ते रात्रभर दिसते. अतिशय मोठे नक्षत्र आहे. या नक्षत्राची व्याप्ती वृषभेत २३° २०’ ते ३०° व मिथुनेत ६° ४०’ आहे. या नक्षत्राचा शर दक्षिण १३°२२’ आहे. यांना शरीरिक श्रम झेपत नाहीत. इंग्रजीत या नक्षत्राला ’ओरायन” म्हणतात. शारीरिक शक्ती व जीवनशक्ति कमी असते. हे नक्षत्र देवगणी असल्याने या नक्षत्रावर जन्मलेली जातक सुशील, ईश्वरभक्त, परोपकारी, संतुष्ट, रसिक, बुध्दिमान, व्यवहारी व न्यायी असते. कलाकौशल्यात नैपुण्य असते. नीटनेटकेपणा व स्वच्छतेची आवड असते. नक्शत्र जरी बिघडले तरी या व्यक्ती व्यसनाकडे वळत नाही. या नक्षत्रात अतिशय चांगले गुणधर्म आहेत परंतु ग्रह तसे लाभल्यास त्याचे परिणाम दिसून येतात. किंवा गोचरीचा ग्रहाचा परिणाम दिसून येतो.

मृग नक्षत्राचा भाव हा सिंह नवमांशवरुन आरंभ होतो. सर्वतोभद्र चक्राप्रमाणॆ मृग नक्षत्राचा चौथ्या चरणाला नीचांश प्राप्त झाला आहे.

या नक्षत्रात जातकाणी खालील गोष्टीत शिक्षण घेतले पाहिजे. आर्किटॆक्ट, इंजिनिअर, ड्राफ़्‍ट्स्‌मन, पत्रकारिता, प्रिटिंगप्रेस व्यवसाय, चार्टर्ड अकौंटट, मशीन विकणारे कमिशन एजंट, सेल्समन, बँकींग क्षेत्रातील आँडीटर, पेंटर, चित्रकार, डाँक्टर्स या प्रकारचा व्यवसायात हे नक्षत्र फ़ार मोठ्या पदावर नेणारे किंवा नावलौक मिळवून देणार नाही. त्यामुळॆ राजवैभव किंवा अधिकार योग मिळणार नाही.

या नक्षत्र नाजूक असल्याने हवामानातील बदलाप्रमाणे साथीजन्य रोग होऊ शकतात. तसेच शीत विकारामुळे सर्दी, कफ़, खोकला, थंडीताप या प्रकारे त्रास होतो,

मृगशीर्ष नक्षत्राच्या जातकाची लक्षणे :- मगृशीर्ष नक्शावर जन्मलेल्या व्यक्ति गंभीर, वाक्पटू, चंचल आणि स्वाभिमानी असतात. त्यांना अपमान खपत नाही. दुस-यांच्याविशयी मनात अढी व ईर्ष्या असत. आपल्या जीवनात नाव मिळवून उच्च स्थान मिळवतात.

मृगशीर्ष नक्षत्राच्या व्यक्ति शस्त्रकलेत पारंगत असत्तत. नम्रस्वभाव व आदरणीय व्यक्तिंच्या बाबतीत आदराची भावना यांच्यात असते. राज्या-पक्षाकडून अनुकूलता प्राप्त होते. मंत्र्याशी मैत्री असते. धार्मिक वृत्तीचे व सन्मार्गावर चालणारा असणार. भोगविलासात विशेष रस त्यांना असतो. नवनवीन अनुभवांचा संग्रह यांच्याकडे असतो. स्वभावाने भावूक असल्याने चटकन प्रभावित होतात. पैशाची बचत करण्याची कला यांना अनुयायी असणार. व आपले विचार प्रकट करताना हाव-भाव करण्यांछी सवय असते. आपल्य अप्रगतीसाठी निरंतर झटण्याची वृत्ती असते. आंतरिक प्रेरणेमुळे सामान्यपणे भाग्यशाली असतात. मनोवैज्ञानिकाच्या रुपात प्रसिध्दी याला मिळेल.

प्रथम स्थान ( लग्न स्थान / प्रथम भाव / ग्रह / नक्षत्र ) याचा विचार सर्वतोभद्र चक्रा प्रमाणे :-

१. लग्न कर्कराशीत आश्लेषा नक्षत्राच्या प्रथम चरणात धनु नवमांशात आहे. हा सर्वतोभद्र चक्र १८:५८:३९ अंशावर (अवकहडा चक्र) प्रमाणे ३३ व्या उत्पनांशावर आहे. आश्लेषा नक्षत्राचे जे गुणधर्म आहेत त्याप्रमाणे जातकास उत्पनांश हा सूक्ष्मांश प्राप्त झाला किंवा जातकाच्या कुंडलीमध्ये गुरु, चंद्र, रवि यासारखा ग्रह त्या स्थानी असेल किंवा गोचरीच्या भ्रमणा तुन येईक तर जातकास अतिशय उत्कृष्ट फ़ले मिळू शकतात आणि जातक प्रगतिपथावर विराजमान होतो. ह्या नक्षत्राचे गुणधर्म पाहून कोणात्या प्रकारचा व्य्वसाय करावा व या उन्नतीस तो पात्र असेल हे या नवमांशात असलेल्या ग्रहांवरुन ठरवावे लागेल, जातकाचा धनु नवमांश आहे. धनुचा गुरु हा जातकाच्या पत्रिकेत पंचमात वृश्चिक राशीत जेष्ठा नक्षत्राच्या प्रथम चरणात आहे. हा सुध्दा सर्वतोभद्र चक्रा प्रमाणे ६९ उत्पन्नांश.

२. आश्लेषा नक्षत्रातील प्रथम चरणातील लग्न :- शेष आपल्या डोक्यावर पृथ्वीचा भार घेतो. यालाच आश्लेषा म्हणतात. कर्तृत्ववान व्यक्तिच्या अंगावर जबाबदार्‍या पडणे व ते यशस्वीपणे पार पाडण्याचे सामर्थ्य असणे हा गुण आश्लेषा नक्षत्रात आहे. मराठी ९ या अंका सारखे दिसणारे हे नक्षत्र अधोमुखी मंदलोचनी, जीवाग्नी तत्त्वाचे आहे. ते तीक्ष्ण, दारुण फलदायक आहे. राक्षकगणी, मार्जार योनीचे आहे. नक्षत्राची अमृतनाडी असून, नक्षत्रस्वामी बुध व नक्षत्रदेवता सर्प आहे. गंडातर योगातले हे नक्षत्र अमृतनाडीत आहे. कुंडलीत या नक्षत्रात शुभ ग्रह असल्यास व ते शुभ ग्रहयुक्त नक्षत्र १, ५, ९, १० या स्थानात असल्यास मनुष्य कर्तव्यदक्ष असून आपले कर्तृत्व सिध्द करतो व अमृतमय फले प्राप्त करतो. हे नक्षत्र वरील स्थानत असता जातक महत्त्वाकाक्षी, निग्रही सुविचारी असून समाजात मान प्रतिष्ठा प्राप्त करतो.

३. लग्नी मंगळ :- लग्नी प्रथमस्थानी मंगळ असता जातक अत्यंत चपळ, उत्साही असतो. या व्यक्ति कुठलाही निर्णय झटपट घेतात. झटकण राग येतो. दुसव्यावर वर्चस्व गाजवण्याची वृत्ती असते. वयाच्या २८ नंतर भाग्योदय होतो. २८ नंतर त्यांची तामसी वृत्ती कमी होते. नोकरीत भाग्योदय होतो. भाऊ-बहिणी याच्या बरोबर पटणार नाही. मातृसौख्यात कमतरता असणार. मातेला दिर्घ मुदतीचा आजाराची शक्यता आहे. मैदानी खेळाची आवड, कौटुंबीक सौख्य कमी. दुसर्‍याने दिलेला सल्ला जातकाला कमी पणाचा वाटतो. दुसर्‍याने कुणी दोष दाखवून दिल्यास ते कधीच पटत नाही.

४. कुंडलीत प्रथमस्थानी मंगळ व सप्तमात रवि:- रविमंगळ युति, प्रतियुती अथवा क्रेंद्रयोग तीव्र स्वरुपाची फळे या जातकाला देताना दिसतात. रविमंगळ युती अधिकार योग देताना दिसत आहे.

प्रथमस्थानी असणारा मंगळ दुसर्‍यावर वर्चस्व निर्माण करतो. तामसी स्वभावामुळे वैवाहिक जीवनात वैवाहिक साथीदाराशी पटणॅ मुश्किल होते. हा मंगळ चवथ्या दृष्टीने चतुर्थ स्थानाकडे पहातो त्यामुळे घरात कलहाचे वातावरण निर्माण होते वैवाहिक स्वास्थ हरवून जाते. प्रथमस्थानी असणारा मंगळ सातव्या दृष्टीने सप्तमस्थानाकडे पहतो. त्यामुळे सत्तमस्थान दुषित होते. वैवाहिक साथीदाराशी कुठलीही तडजोड स्विकारण्याची मनोवृती नसल्याने वैवहिक जीवनातील गोडी निघून जाते. अष्टमस्थानाकडे आठव्या दृष्टीने पहाणारा मंगळ प्रकृतीविषयी अनिष्ट फळ देतो त्यामुळे वैवाहिक जीवनातील शरीरसुखात बाधा निर्माण होते.

वृश्चिकेचा सहाव धनु नवमांष व जेष्ठा नक्षत्राचे पहिके चरण म्हण्जे उत्पान्नांश या नक्षत्रावर असलेले गुरु, रवि, मंगळ हे ग्रह जातकास धन वृध्दि करुन देतात. परंतु या नक्षात्राचे वैशिष्ठ्य असे आहे की जेव्हा एखादा क्रुर ग्रह कालांतराने वेध घेईल तेव्हा धनाच्या बाबतीत अनेक त-हेच्या समस्या उत्पन्न करून जातकाची धनहानी होईल. तसेच उत्पन्नाच्या मार्गामध्ये खंड पडेल म्हणून या सूक्ष्मांशाबद्दल जातकास काळजीपूर्वक मार्गदर्शन करावे.

जातकाच्या कुंडलीत मंगळ कर्क राशीत २९:४४:३४ अंशावर असल्याने कर्क राशीत तो २८ अंशावर नीचेचा असतो. कर्क राशीत त्याचे बल हे निकृष्ट असते. मंगळ ०६ अंशाच्या पुढे असल्याने मंगळास बाल अवस्था प्राप्त झाली आहे. त्यामुळे तो थोडे फ़ळ निश्चित जातकाला देईल या शंका घेंण्यास जर सुध्दा जागा नाही.

मंगळ हा ग्रह ४, ७, ८ दृष्टीने चतुर्थ स्थानातील तुळ राशीत राहू वर पाहात आहे. चतुर्थ स्थानाल मंगळ पूर्ण दृष्टीने पाहत असल्यने मातापित्याचे सुख मिळत नाही, शारीरकष्ट भोगणारा, पणा वयाच्या २८ व्या वर्षाच्या अवस्थेपर्यंत अत्यंत दु:खी, पाश्चात सुखी, परिश्रम न करता अंगचुकारपणाने काम करणारा. तसेच त्याची स्व:रास वृश्चिक पंचमात गुरु ग्रहा बरोबर आसल्याने त्याच्या निर्णयाला उत्तम चालणा गुरु ग्रह देऊन मंगळ त्याला प्रोहसान देईल. सातवी दृष्टी सप्तमावर बुध, नेप, रवी वर असल्याने रवी त्याचा मित्र गृह असल्याने कोणत्याही कामात त्याल आळस व शारीरिक थकवा येणार नाही. तसेच सप्तम स्थानावर मंगळ पुर्ण दृष्टीने बधत असल्याने परस्त्रीरत, कामी, प्रथम भार्येचा वियोग होऊन त्यायोगे दु:ख पावणारा पण रवी बुध ( रवी+बुधा आदित्ययोग ) मुळे यांची शक्यता कमी आहे. त्याची आठवी दृष्टी अष्टमात शनिवर असल्याने अपघात होण्याचा संभव आहे. ज्या ज्यावेळी गोचरीचा ग्रह ह्या स्थानावरुन जाईल त्यात्यावेळी जातकाला शारीरिक पिडा संभवतात. आठव्यास्थानावर मंगळ पूर्ण दृष्टीने पाहील तर धन व कुटूंब यांचा नाश परंतु जातकाच्या कुटूंबा मधिल मात्यापित्याची पत्रिका पाहिल्या शिवाय हे निवेदन करणे चुकीचे आहे कारण जर मात्या पित्याच्या कुंडलीत चंद्र राशी मकर व कुंभ असल्यास शनि त्याचा राशी स्वामी आहे व जातकाच्या कुंडलीत अष्टमात मकरेचा शनि आहे त्या मुळे हा योग होणार नाही ह्या योगाची नोंद आवशक घेण्यासारखी आहे.

कर्केतील मंगळ हट्टी स्वभाव व मानसिक अस्थिरता हा कर्क राशीत मंगळाचा गुणधर्म आहे. चंद्राच्या ह्या जलराशीत मंगळ फ़लीताच्या दृष्टीने मोठे कोडे आहे. कर्केतील मंगळची फ़ले फ़ार विचार करुन वर्तवावी लागतात. कित्येक वेळा कर्क राशीतील मंगळ आत्यंतिक शुभ फ़ले देताना सापडतो. काही वेळा तितकीच अशुभ फ़ले मिळतात. आश्लेषा नक्षत्रातील मंगळा मुळे जातक व्यापारात फ़सल्या जातात. ह्या जातकानी व्यापार करूनये.

मंगळाच्या पंचमात गुरु या योगात बायको वांझ मिळण्याचा संभव असतो. अगर तिला संततीप्रतिबंधक रोग होतात. योग्य उपचार केल्यास रोग जातो व संतती होण्याचा संभव असतो. रविच्या उपासनेने संतती टिकत. सर्व प्रकारच्या एंजिनियरींग शिक्षण पुर्ण होते. साहित्य फ़ार होते. चांगले लिखाण लिहिले जाते. हा प्रसिध्दि योग आहे. फ़क्त कर्क, वृश्चिक, मीन राशीत हा योग झाल्यास संतती भरपुर होते व संततीनियमन करण्याची पाळी येते.

एक विलक्षण अनुभव :- आकाशातल्या ग्रहात नवराबायकोची दोन जोडपी आहेत. १ले रवि-चंद्र, २रे मंगळ-शुक्र, रविचंद्र ही नवराबायको अत्यंत जुन्या पद्धतीतली आहेत. आणि शुक्र-मंगळच्या युतीतसुध्दा रविच्या पुढे ( सायंकाळी पश्चिमेकडे दिसणारी युती ) ६० अंशावर ज्या वेळी पुर्वाश्चिम, दक्षिणोत्तर अंतर शून्य असेल तर शुक्राचे मनोहर तेज मंगळावर पडते. त्या वेळी मंगळाचा तांबूस वर्ण कमी होऊन एक प्रकारचा मनोहर पांढुरका वर्ण दिसू लागतो. म्हणजे ही युती फ़ार मनोहर दिसते आणि –

ज्या वेळी रविच्या मागे शुक्र असेल ( सकाळी पुर्वेकडे दिसणारी युती ) त्या वेळी चारी दिशांचे अंतर शून्य असेल तर मंगळ तेज शुक्रावर पडते व शुक्र त्या वेळी थोडास गुलाबी वर्णाचा दिसू लागतो, या वेळी शुक्र अगदी मनोहर दिसतो.

मंगळाच्या अष्टमात शनी :- या योगात संतती, संपती, मानमरातब, ऐश्वर्य यांनी युक्त होतो. धंदा नोकरी उत्तम चालते, नावलौकिक उत्तम मिळवितो. परंतु शांततेने समाधानाने आयुष्य घालविणारे असतात. त्यांचे प्रकृती इतकी नाजूक असते व हे मनाने इतके नेभळट असतात की यांना ज्वलत्जहाल क्रांतिकारकांचे तेज सहन होत नाही.हे चमडी दमडी बचावून राजकरण करण्याचा तृतीय प्रकृतीचा मार्ग पत्करतात. उदा. हिंदूमहासभा, लिकशाही स्वराज्य पक्ष, असले नादान पंथ दुस-या ख-या कार्यकर्त्यांना अपशकून कर्ण्याकरताच काढलेले आहेत. यातल्या शूर वीरांना तुरूंगात जायाला नको, दंड भरावयाला नको, व्यासपीठावर मोठ्यामोठ्याने गाढवासारखे बडबडून टाळुआ मिळवून गळ्यात मोठाले हार घालून घरी मिरवत जाणे व घरी जाऊन गरम शिरा खाऊन वर चहाचे डिकाँक्शन पिऊन निष्काळजीपणॆ झोपी जाणे हाच योग पुण्याचे श्री न, चिं. केळकर, अमरावतीचे दादासाहेब खापर्डे यांच्या कुंडल्यात होता.

मंगळाच्या महादशेत फ़ळे :- ही दशा मृग, चित्रा, धनिष्ठा नक्षत्रात येते. या महादशेतील धनयोग होतो. जर मंगळ वक्रि असल्याने बंधू-वैमनस्य, हा केंद्रात असल्याने जमीनजुमला, घरदार देतो व शेतीपासून फ़ायदा, मानसिक शांती. जातकाल जन्मता: ७ वर्षाची मंगळाची महादशा होती. त्यांनतंर राहूची महादशा सुरु झालेली आहे.

कर्क राशीचा मंगळ जमीनजुमला, धरदार, नोकरचाकर, वाहने, भूमी यांची अतिकष्टाने प्राप्ती नतलग व स्त्रीपुत्रांचा वियोग, मानसिक दुर्बलता, क्लेश व चिंता देतो.

प्रथम स्थानी कर्केचा मंगळ

१.प्रथम स्थानी कर्केचा मंगळ क्रोधी मनाची कमतरता, मोठे आशावादी, भांडण –तंट्याच्या मोठमोठ्या योजना आखतात.

२.आरोग्याच्या तक्रारी.

३.प्रथम स्थानी मंगळ असता व्यवसायात नुकसानी, व्यापारास लागणारे गुण यांचे अंगी नसतात. ह्या जातकानी नोकरी करणे फ़ार चांगले आहे.

४.पण ह्यानी व्यापारा संबधी मोठमोठ्या योजना आखाव्यात पण दुस-यासाठी स्व:तासाठी नाहीत.

५.कर्केचा मंगळ प्रथम स्थानी वाडवडिलांचे सुख प्राप्त होत नाही व संततीसुखात कमतरता असते असे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे तरी अष्टमातील शनी व वडिल-आईची कुंभ-मकर रास ही या योगाला संपुष्टात आणते.

भाव बल :-
जातकाच्या कुंडलीत कर्क लग्नात मंगळ (व) आश्लेशा नक्षात्राच्या चतुर्थ चरणी ( २९:४४:३४ ) अंशावर आहे. मीन नवमांशात आहे. ह्या तील मंगळ जलभय सूचक व शस्त्रकियासूचक समजावा. कुंडलीत वक्री मंगळ या नवमांशी पायात दोष वा पायाचे विकार उद्भवण्याची संभावना आहे. या नवमांशांतील मंगळ द्रवपदार्थांच्या व्यापारास अनुकुल आहे.

मंगळ आणि वास्तुशास्त्र :-

ज्याच्या पत्रिकेतील चंद्र, लग्न अथवा चतुर्थस्थान मंगळाने दुषित आहे त्याने स्ततःच्या नावावर घर घेऊ नये अशा व्यक्तिने घरात उत्तरेकडील भिंतीवर मारुतीच्या फोटो लावावा. तसेच गृहसौख्य लाभण्याच्या दृष्टीने श्री गणपती उपासना करावी. मंगळवारचा उपवास कराव. घरात चाकू, विळी सारख्या धारदार वस्तू तसेच अग्नि यापासून सावधगिरी बाळगावी. मंगळाच्या पत्रिका असंआर्‍यांनी श्री गणपती उपसना करावी. मंगळवारचा उपास करावा. संकष्टी अंगारकीचा उपास धरावा. " उपेम हुं श्री मंगलाय नमः ह्या मंगळाच्या बीजधार मंत्राचा ( लक्ष्याचा जप ७ दिवसात पुर्ण करावा, रोज १०८ वेळा " ॐ अंगाकराय नमः किंवा ऋग्वेदातील श्री सुव्या रोज म्हणावे. किंवा अंगाकराय विघ्नहे शक्ती: हस्ताय | धीमही, तन्मो भौम प्रचोदयात || हा गायत्री मंत्र १०८ वेळा रोज म्हणावा.

मंगळाचा दोष, दाहकता, तीव्रता कमी करण्यासाठी मंगळाची पत्रिका असणार्‍यांनी अंगारक कवच, अंगारक स्त्रोत्र, मंगळ चंडिका स्तोत्र, ऋणमोचल स्तोत्र यपैकी जे जमेल ते कवच रोज म्हणावे.

मंगळाची पत्रिका असणार्‍या स्त्रियांना पाळीचा त्रास खूप होतो. तसेच बाळंतपणात अशक्तपणा येण्याची शक्यता असते. गर्भधारणॅच्या प्रक्रियेत ही अडथळे निर्माण होतात. आणि म्हणून मंगळाची पत्रिका असणार्‍या तरुण मुलींनी, महिलांनी पुढील मंत्र रोज म्हणावा.

" या रक्त वसना देवी या रक्तः रजसूया | रजोस्वला महातेजा उमा कँगु वासिनी || " मंगळ दुषित पत्रिका असणार्‍यांनी विवाह लवकर ठरण्यासाठी पुढील मंत्र रोज म्हणावा " ॐ पत्नी मनोरमा देही मनोवृत्तानुसारिणी | तारिणी दुर्गसंसार सागरस्य कुलोद् भवाम् || हा मंत्र॑ दररोज ७ वेळा म्हणावा.

मंगळ आणि कलर थेरपी :-

ज्याच्या पत्रिकेत मंगळ बलवान आहे.मंगळ स्वराशीचा, मित्रराशीचा अथवा उच्च राशीचा आहे. अथवा मंगळाला नवमांश बळ आहे त्याने आपल्या आयुष्यात महत्त्वाच्या प्रसंगी निर्विवाद यश मिळण्याकरिता कलर थेरपीचा वापर करावा. अतिशय महत्त्वाचे काम असेल आणि त्या कामात हमखास यश मिळवायचे असेल तर अशा प्रसंगी पुरुषांनी अंगात लाल शर्ट अथवा लाल टोपी/ रुमाल चा वापर करावा. महिलांनी लाल ड्रेस अथवा लाल साडी धारण करावी. श्री गणपतीला लाल फूल वाहून दर्शन घ्यावे, डोळे मिटून या मंडळीनी लाल रंगात आपल्या कुलदेवतेची मानसपूजा करावी. स्वसंमोहनाचे तंत्र ज्यांना माहिती आहे त्यांनी भिंतीवर एखादा पुठ्ठा टांगून त्यावर एक लाल ठिंपका काढावा व त्या ठिंपक्यावर आपली एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना रेकीचे तंत्र माहिती आहे. त्यांनी स्वतःसाठी रेकीचा वापर करताना डोळे मिटून मनातल्या मनात लाल छटा संकल्पीत करुन रेकी घ्यावी. संकट प्रसंग आल्यास डोळे मिटून लाल छटा संकल्पीत करुन श्री गणपतीची ही मानसपूजा करावी.

संजीव
रंगामुळे आपल्या भाववृत्तीवर काही निश्र्चित असा परिणाम होत असतो असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. अर्थात तसं का नि कसं घडतं हे मात्र विज्ञानास सांगता आलेल नाही. रंगाचा प्रभाव व्यक्तिगणिक वेगवेगळा होऊ शकतो. त्यामुळेच काही निश्र्चित असे नियम ह्याबाबतीत सांगता येत नाहीत. व्यक्ति तितक्या प्रकृती म्हणतात त्याप्रमाणे रंगाच्या प्रभावाबाबतही म्हणता येईल. विविध मानवसमूहात विशिष्ट प्रकारच्या रंगाची वस्त्रप्रमाणे वापरण्याचा सांस्कृतिक लळा जपलेला असतो, हे आपण बघत असतो. शिवाय व्यक्तिगत अनुभव आणि आवडीनुसार जो तो आपल्याला हव्या त्या रंगाचे कपडे वापरत असताना दिसून येतो. तुम्हाला आवडणारा भडक रंग कदाचित तुमच्या घराशेजारच्या काका-काकूंचा उच्चरक्तदाब आणखी उत्तेजित करणारा ठरु शकतो. तुमचे भडक कपडे पाहून काहीजण नक्कीच नाक मुरडणार! कारण हा ज्याच्या त्याच्या पसंतीचा मामला आहे. नापसंती दर्शविण्यासाठी मग प्रतिक्रिया होऊ शकतात वा प्रतिक्रिया होऊ शकतात वा प्रतिक्रिया प्रकट झाल्या नाहीत तरी त्याचा अर्थ तुमच्या आवडीचे रंग सगळ्यानाच आवडतील अस मात्र नाही!

एका पाहणीत रंगाच्या प्रभावाबाबत अस आढळून आल आहे की लोक रंगाबाबत धनात्मक किंवा ऋणात्मक प्रतिक्रिया जरुर बाळगतात. हे सूक्ष्म अवलोकन असल तरी ते सत्यधिष्ठत आहे एवढ मात्र खर!

आणाखी एक पाहणीत शिक्षित मुलांची प्रतिक्रिया बघण्यत आली :- स्वच्छंदी आणि प्रसन्न मुलांना पिवळा रंग पसंत होता तर तपकिरी रंग मनाची उदासी आणि खिन्नता ह्यात बुडालेल्या मुलांना प्रिय होता असं दिसून आलं. अर्थात रंगाचे हे भावनात्मक विश्लेषण तस वैश्विक सिध्दांत स्वरुप मानता यायचं नाही! कारण तसा सर्वसमावेशक असा अभ्यास आणि तदनंतरचा निष्कर्ष उपलब्ध नाही. एवढं मात्र खंर की अगदी लहान वयाच्या मुलांनासुध्दा विशिष्ट प्रकारचे रंग आवडत असतात आणि त्या रंगांचा त्यांच्या दृष्टीकोनावर प्रभाव पडत असतो. तसंच त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या घडणीतही त्याच सुयोग्य असं योगदान असते हे मान्य करावयास हव.

अगदी लहान बालकांच्या पाहणीत अस आढळून आल आहे की, त्यांना अगदी शुध्द रंगाची खेळणी प्रिय असतात. निळा, लाल रंग त्यांना आवडत असतो. पाढर्या खडूपेक्षा रंगीत खडूचं त्यांना अधिक आकर्षण असतं, कंपासपेटी, रंगपेटीवरील रंग आणि चित्र ह्यांची विविध रंगसंगती आणि आकार त्यांना भावत असतात.

कारखान्यातून सुध्दा भिंतीना कोणता रंग असावा म्हणजे कामगारांचा उत्साह आणि कार्यकुशलता प्रभावीपणे कार्यतर राहून उत्पादन वाढेल, ह्यासाठी पाहणी करुन जरुर ते प्रयोग अमंलात आणले जातात. कारण कारखान्यातले वातावरण कामगारांच्या चित्तवृत्तींना प्रफुल्लित ठेवू शकले तर त्याचा परिणाम कारखान्यातील माल उत्पादनावर निश्चितच होत असतो. कामगार मन लावून काम करु लागले तर गुणसंख्यात्मकदृष्ट्या उत्पादनावर चांगला परिणाम घडून येत असतो. ह्याबाबतीत व्यवस्थापन अलिकडे जागरुक झाल्याचे दिसून येत आहे.

रंगाबाबतचे हे भावनात्मक विश्लेषण केवळ कपड्यांपुरतेच किंवा घराच्या कारखान्याच्या भिंतीच्या विशिष्ट प्रकारच्या रंगांचे अस्तित्व आणि त्यांचा प्रभाग ह्यापुरतंच मर्यादित राहिलेल नसून खाद्यपदार्थ आणि त्याचे पॅकिंग, वेस्टन वगैरे मोटर, स्कुटर, हातबॅगा, खांद्याला अडकवायच्या बॅगा, धुलाईयंत्र, पंखे, शीतपेट्या, घरातील फर्निचर, गाद्या, उशा,अभ्रे, पडदे, अगदी पेन-पेन्सिलीसुध्दा ह्यांच्या रंगाच्या निवडीबाबत उत्पादकांप्रमाणॅच ग्राहकांचे सुध्दा मानसशास्त्र निगडीत असल्याने मागणीप्रमाणे पुरवठा होत असतो, हे बाजारातील विविध प्रकारचे रंग परिधान केलेले पदार्थ-वस्तू पाहून कळून येते.

निसर्गामध्ये इतके विविध रंग आहेत की ते पाहून त्यांच सृजन करणार्या शक्तीच कौतुक वाटू लागते. विविध रंगाची फुले, फळे, लतावेली, वृक्ष, पान, आकाश, पर्वतराजी, नद्या, तळी, सागरकिनारे, चमकणारी किनार्यावरची वाळू,चांदणे किती अमर्याद आणि शास्वत स्वरुपाचे हे रंगीबेरंगी वैविध्य! एकीकडे निसर्गात अशी रंगाची विविधतापूर्ण रुप तर माणसाने आपल्या सौदर्यतृष्णेकरिता रंगाचे आपले असे विविधतेचे आगळेवेगळे अस विश्व निर्माण केले आहे ती केवळ एक निर्मितीच आहे अस नसू़न सुंदरतेने नटलेले गोड-आनंददायी सृजनचं आहे.

आज रंगाचा जणू एक अविभाज्य असा प्रभाव एकूणच समाजावर पडलेला दिसून येतो आहे. आश्चर्य वाटाव इतक्या प्रमाणात समाजातील विविध क्षेत्रात अगदी घरापासून, सरकारी विश्रामगृह ते पंचतारांकीत हॉटेल्स आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत तद्वतच अतिपूर्वेकडील देशांपासून ते अतिपश्चिमेकडील देशातील समाजात सुध्दा रंगाचा वापर विपुलतेने आणि आपापल्या मगदुराप्रमाणे आणि अभिरुचीप्रमाणे रंगाची निवड आणि वापर करण्यात येतो. रंगाद्वारे आपल्या संस्कृतीचच जणू दर्शन घडून येत असत तर व्यक्तिगत पातळीवर रंगसंगतीचा माणसाच्या चरित्र-चित्रणाच्या आणि त्याच्या स्वभावाचा अन्योय असा संबंध असतो. संतशिरोमणी जगद्दगुरु संत तुकाराम महाराज म्हणतात

" पडिले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा | नाही दूजा ||"

तर आपल्या जणू हे अंगवळणी पडून गेलेलं असत की विशिष्ट प्रकारचे रंग आपणास प्रिय असतात. त्याच्या दर्शनाने मनास आल्हाद वाटतो तर काही रंग स्वाभाविकपणेच अप्रिय असतात. आता ते तसे का अप्रिय असतात? ह्यामागे मानसशास्त्रीय काही उपत्ती जरुर असते. पण एवढ मात्र खर की ते फक्त व्यक्तिसापेक्षा असत. एकाला एक रंग प्रिय असेल त्र तोच रंग दुसर्यास अप्रिय असू शकतो.

गोर्या गोमट्या देहाच्या व्यक्ति जेव्हा भडक रंगाची वस्त्रे परिधान करतात तेव्हा ती त्यांना शोभूनही दिसतात पण कुणी जेव्हा कोळशासारख्या रंगाची वस्त्र वापरतो तेव्हा ते काय सुख देत असेल बघणार्यांनी ठरवायच! कारण मानसशास्त्रीयदृष्ट्या काळा रंग हा शोक, वितरागित किंवा मानसिक विद्रोह दर्शक असतो. त्यामुळे धार्मिक कार्यात, अनुष्ठानत काळ्या रंगाला अजिबात स्थान नाही. अर्थात त्यातही ज्या व्यक्तिंना काळ्या रंगाची मनातूनच आवड असेल त्यांचा स्वभाव विद्रोही, दृढनिश्चयी असतो असे मानसशास्त्रीय संशोधन सांगत. रुढी आणि परंपरा तोडून फोडून टाकायला हव्यात असा त्यांचा स्वभावधर्म असतो. अर्थात ह्या रंगाच आणखीही एक वैशिष्ट्य आहे की, ह्या रंगाद्वारे गुप्तता आणिअ व्यक्तिगत पातळीवरची रहस्य गोडी दिसून येते.

रंग आणि वृत्ती

पिवळा रंग हा सपन्न व्यक्तिमत्व, अध्यात्मात आवड, प्रगतीचा ओढा असण हे गुण दर्शवितो. आपलयाकडे धार्मिक समारंभामध्ये पिवळ्या रंगाच महत्त्व अनन्यसाधारण अस आहे. हा रंग ज्यांना आवडातो त्यांची बुध्दी कुशाग्र असून त्यांची स्मरणशक्ती सुध्दा तीक्ष्ण असते ते वैयक्तिरित्या कष्टाळू आणि प्रामाणिक असतात. जे अजून प्राप्त झाल नाही, त्याची प्रतीक्षा करण्याची संयमीवृत्ती ह्य रंगाने लाभते. महा-तणाव आणि ह्र्दयरोग ह्याबाबतीत ज्यांना चिंता असेल त्यांना अगदी प्रेमपूर्वक ह्या रंगाशी आपली गट्टी जमवायला हवी. काही कालावधीत आपला आपणच अनुभव घ्यावा. ज्याची हाडे आणि सांधे दुखत असतील त्यांनासुध्दा त्यामुळे लाभ होतो, असे अनुभवांती सांगण्यात आल आहे.

निळा रंग हा शांतीचा निदर्शक आहे. शीतलता आणि स्निग्धता हे ह्यारंगाच वैशिष्ट्य आहे. ह्या रंगात सागर आणि आकाशाची अमर्यादा खोली ह्यांची अनुभूती मिळते ( हा रंग स्वयपाक घर / किचन मध्ये वापरणे टाळावे ) हा रंग ज्यांना प्रिय असतो ती माणस स्वभावाने उदार, विश्वासू, श्रद्घाळू, सौदर्यप्रेमी आणि सुखी जीवन व्यतीत करणारी असतात. अशा व्यक्तीना कुठल्या नको त्या झंझाटात पडायची इच्छा नसते. आपण बरं की आपल घरदार बर असा ह्यांचा स्वभाव असतो. वातविकारांच्या लोकांसाठी हा रंग लाभदायक ठरु शकतो.

लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो. शौर्य, संघर्ष, उत्तेजना, कामवासना, आवेग आणि उत्साह ह्या भावांच दर्शन ह्या रंगाद्वारे होते. विशेष करुन लग्न सभारंभामध्ये वधू-वराचे जोडेसुध्दा लाल रंगाचे वापरायची परंपरा काही समाजसमूहात आढळून येते, हेही कामोत्तेजकतेचेच निर्देशक असते. ह्या रंगातच मुळी एक प्राकारची ऊब असते, रक्तदाब, सर्दि, खोकला ह्या विकारांसाठी हा रंग उपयोगी सिद्ध झाला आहे. हा रंग ज्यांना प्रिय असतो ती व्यक्ति जीवनातल्या दरेक क्षेत्रात महत्त्वाकांक्षी असते. अतिउत्साह आणि उत्तेजितता हे ह्या रंगाचे वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे आदिम हिंसक प्रवृत्तीचेही निदर्शक आहे.

हिरवा रंग एकांताचा निदर्शक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी स्वप्नाळू, अस्थिर चित्ताचीए आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्याच तंद्रित राहणारी आणि तरीही बुद्धिप्रामण्यवादी असतात. त्याचप्रमांणे प्रदर्शनप्रियताही त्यांच्यापाशी असते हिरव्या रंगाच्या दर्शनाने डोळ्यांना शीतलता प्राप्त होत असते. म्हणून सकाळी हिरवेगार वृक्ष, लतावेली किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने डोळ्यातील सूक्ष्म वाहिन्यांना शीतलता प्राप्त होते. ज्यांना फुफ्फुसाचे आजार असतील, श्वासाचा त्रास असेल, गळ्याची कंठाची-घशाची समस्या असेल त्यांना हिरवा रंग मानसशास्त्रीयदृष्ट्या लाभप्रद असतो.

पांढर्या रंगाच वैशिष्ट्य हे की, हा रंग पवित्रता आणि सरळपणाचे प्रतिक मानला जातो. खर तर पांढरा रंग हा तसा कुठला पृथक रंग नाहीच मुळी! निळा पिवळा, नारगी, लाल, जांभळा ह्या रंगाच मिश्रण म्हणजे पांढरा रंग! सात विभिन्न रंगाचे मिश्रण मिळूनच सूर्याचा सफेद प्रकाश बनला आहे. हा रंग ज्यांना प्रिय असतो ते लोक शांत सरळ आणि स्पष्टमतवादी असतात आणि हे अस असल तरी धूर्त,चालाख, लांड्यालबाड्यात पटाईत असलेली माणस मात्र अगदी बगळ्यासारखी सफेद वस्त्र घालून मिरवत असताना बघून श्री. बा. भ. बोरकर यांच्या "आनंदभैरवी" या काव्यसंग्रहातील एका कवितेतील काव्यपंक्तीची आठवण अवश्य होते.

थेटर आमुचे झाले देऊळ
मकानामध्ये दुकान आले
आणि मिरविते शील आमुचे
पांढर्यात गुंडाळूनी काळे

अर्थात बबोरकरांच्या ह्या काव्यपंक्तीचा संदर्भ थोडा वेगळा असला तरी त्याद्वारे सुद्धा मानवी स्वभावाचेच दर्शन घडते. अशा प्रकारे विविध रंग आणि मानवी स्वभावाची विविधता एकमेकांस पूरकषटविकारांच दर्शन घडविणारी असतात. म्हणून ज्योतिषशास्त्रात व वास्तूशास्त्रात रंगाला व रंग संगतीला फ़ार महत्व आहे. जर का आपण वास्तूमध्ये चूकीचे रंग वापरले तर ते आपल्या रोजच्या जीवणावर परिणाम करतात. त्यामुळे वाचकानी आपल्या घराला /वास्तूला रंग देताना ह्या गोष्टीचा फ़ार विचार करावा.

संजीव

बुधवार, २ जून, २०१०

एक महत्वाचा मुदा लक्षात घेऊन स्व. श्री. कृष्णमूर्ती यांनी के.पी पध्दत अवलबंली आहे, ते त्रिवार सत्य आहे.

२६ जून २०१० साली होणारे सूर्यग्रहण :-


जगातील काही नामवंत ज्योतिषानि सूर्यग्रहणा विषयी भाष्य केले आहे. काही जण नुसते शनी-मंगळाच्या युतीने योगात देशाचे व ज्यांच्या पत्रिकेत कन्या रास षष्ठ अष्टम स्थानी आहे म्हणजे मेष आणि कुंभ लग्नाच्या कुंडल्यांना विकार होतील. ह्या बद्दल भविष्य वर्तविण्यास सुरुवात केली आहे. पण ही शनि मंगळाची युती मेदनीय ज्योतिष्यशास्त्रा दृष्टीनी आज आपण बघणार आहोत. तसेच ह्या बाबत श्री राजीव उपधाय आपल्याला वेळोवेळी मेदनीय जोतिषाच्या दृष्टी कोणातून मार्गदर्शन त्याच्या साईटवरुन ( http://rajeev-upadhye.blogspot.com ) करत आहेत. त्याचा लाभा वाचकानी द्यावा. तसेच श्री. सुहास डोंगरे यांनी सुध्दा मेदिनीय ( राष्ट्रिय ) ज्योतिष शास्त्रा बद्दल अनेक पुस्तके जातकाच्या वाचनात भर घालण्या साठी प्रसिध्द केली आहेत.

कोणत्याही ग्रहाच्या युतीचा परिणाम हा जातकाला तो ज्या स्थानात राहात असतो त्या स्थांनाच्या अनुसंधाने होत असतो. हा पहिला नियम येथे घेणे महत्वाचे आहे. पुथ्वी वरिल लग्न बिंदूहा प्रत्येक राज्यात देशात नेहमी वेगवेगळा असू शकतो. तसेच घातचक्रा मधिल माहितीची सागड घातली तर प्रत्येकाचे कारण आपणास समजणे अवघड जाणार नाही. प्रत्येक ग्रहाचे पृथ्वीच्या भवति फ़िरण्याची एक सीमा ठरलेली आहे. त्या सीमेरेषेच्या बाहेर कोणताही ग्रह जाणार नाही. आपल्या जोतिष्यशास्त्रात २७ ( अधिक एक ) २८ नक्षत्रे व १० ग्रह व अधिक राहू व केतू मिळवून १२ ग्रह आहेत हे सर्व ग्रह व नक्षत्रे पृथ्वी सभोताली सतत एक ठराविक मार्गक्रमाने फ़िरत असतात. ते पृथ्वी भवती फ़िरताना प्रतेक लग्नाशि विशिष्ठ योग करतात. तसेच गोचरीचे ही योग करत असतात. ह्या योगाचा अभ्यास जर का केला तर आपल्याला योग ते भाष्य करण्यास कधिही अडचण येणार नाही.

प्रत्येक देशातील / शहराला ग्रहाची तसेच नक्षत्राची बघण्याची दृष्टी / वेध हे वेगवेगळ्या कोणातून होत असते. यालाच आपण ग्रहाचे व नक्षत्राचे योग असे संबोधतो. या मध्ये जातक हा ज्यावेळी जन्मलेला असेल त्या प्रमाणे त्याचे आपण भविष्य सागण्यास सुरुवात करतो. पण हे जरी खरे असले तरी जातकाचा झालेला जन्म लग्ना प्रमाणे आपण त्याचे भविष्य सागत असतो. पण हे माझ्या दृष्टी कोणातून चूकीचे आहे. कारण पहिल्यादा जातक हा एका ठराविक विभागात राहात होता, तो जरी बाहेर गेला तरी काही ठराविक अतंर जाणार हे ज्योतिष्याला माहीत होते, त्यामुळे साधारण अदांज घेउन ज्योतिष्या जातकाला त्याच्या आयुष्यातील घटणा क्रमांचा अंदाज देत असत. आता आपण आधुनिय युगात आलो आहोत. जेव्हा आपण एखाद्या जातकाचे भविष्य वर्तवितो त्या वेळी जातकाचा ठावठिकाणा आपल्यास माहिती असलेला पाहिजे तसेच जातकाचे प्रवास व देशपर्यंटन सुध्दा माहित असले पाहिजे म्हणजे आपल्याला मेदनीय ज्योतिष्याच्या सुंसगतीने योग्यते भाष्य करता येते.

जातकाच्या लग्नकुंडली प्रमाणे तसेच त्याच्या दशा व गोचरीच्या ग्रह व नक्षत्र आणि मेदनिय म्हणजे जातक ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे त्या ठिकाणाचा सर्वसार विचार करुन जातकाला त्याचे भविष्य सागितले पाहिजे. हा एक महत्वाचा मुदा लक्षात घेऊन स्व. श्री. कृष्णमूर्ती यांनी के.पी पध्दत अवलबंली आहे, ते त्रिवार सत्य आहे. कारण के.पी पध्दतीत जातक ज्या स्थानात राहून प्रश्न विचारतो त्या स्थांनाची कुंडलीचा आपण विचार करुन जातकाच त्याचे भविष्य सागतो. हा मुद्दा आता के. पी. पध्दतीने भाष्य करणा-या ज्योतिष्याच्या लक्षात आलेला नाही. हे कटु सत्य के.पी पध्दत अवलंब करणा-या ज्योतिष्यानी मान्य करावयास हवे.

आता आपण मेदिनीय ज्योतिष्यशास्त्र म्हणजे काय ते पाहू :-

मेदिनीय ज्योतिष वर्तविताना प्रामुख्याने दोन भाग पडतात. अ) नैसर्गिक घटना ब) मानवी घटना
सुख व दु:ख या जीवनरुपी नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण अनुभव असा की सुखाची बाजू सहजपणे विसरली जाते, दु:खाची बाजू मात्र सतत जीवनभर सलत राहाते.

मेदिनी याचा अर्थ पृथ्वी. या पृथ्वीतलावर सर्व चराचर सृष्टीवर होणार्यात अनेक विविधरंगी घटनांचा मागोवा घेणारे शास्त्र म्हणजेच “मेदिनीय॑ ज्योतिषशास्त्र” होय. सर्व पृथ्वीचा विचार केल्यास सर्वसामान्य माणसे म्हणजे जणुकाही नियतीच्या हातातील कळसूत्री बाहुल्याच आहेत. नियतीच्या एकाच तडाख्यात कित्येक माणसे क्षणार्धात भूकंप, ज्वालामुखी, वादळे, पूर यांत बेचिराख होतात. नागासाकी व हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बने लक्षावधी माणसे क्षणार्धात खलास झाली होती. यावरुन पृथ्वी व सर्वसामान्य माणसे यांचा विचार करता पृथ्वी, तिच्या विशिष्ट भागाला व विशिष्ट परिस्थितीला साहजिकच जास्त महत्त्व आहे.
समस्त पृथ्वी अक्षांश-रेखांश या पद्धतीने विभागली गेली आहे. त्यामुळे कोणते गाव, कोणते शहर नेमके कोठे आहे, कोणत्या दिशेला आहे याचा उलगडा होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रामध्ये हे अक्षांश-रेखांश महत्त्वाचे आहेत. तसेच ते मेदिनीय ज्योतिषात अतिशय महत्त्वाचे आहेत, किंबहुना त्याखेरीज मेदिनीय ज्योतिषामध्ये कोणतेही भाकीत करता येत नाही. जगामधील निरनिराळ्या देशामध्ये निरनिराळ्या प्रमाण वे़ळा सूर्याच्या भ्रमाणाप्रमाणे आधारभूत धरल्या जातात. भारताचा विचार केल्यास ८२ संश ३० मिनिटे ( पूर्व ) हे रेखांश आधारभूत पकडून भारतीय प्रमाण वेळ काढण्यात आली आहे. समस्त॑ जगाचा विचार करताना लंडान शहराचे शून्य संश रेखांश पकडून सर्व जगातल्या प्रदेशाची विभागणे केलेली आहे. साहजिकच मोठमोठ्या प्रदेशात उदा. अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया येथील एकाच प्रदेशात निरनिराळ्या प्रमाण वेळा राज्याप्रमाणे आहेत.
अंदाजे दुसरे शतकात पश्चिमात्य ज्योतिषी टॉलेमी यांनी लिहिलेल्या "टिट्राबोक्तास" या नावाजलेल्या ग्रंथात निरनिराळी राष्ट्रे व शहरे यांचे त्याने वर्गीकरण केलेले आहे. हे वर्गीकरण करताना त्याने त्या त्या विशिष्ठ देश, राष्ट्र याची नैसर्गिक वैशिष्ट्ये व इतिहास लक्षात घेतला आहे. पृथ्वी ही विविधरंगी विविढंगी असल्यामुळे "मूर्ती तितक्या प्रकृती" या न्यायाने निरनिराळे नैसर्गिक भेद पृथ्वीवर आढ्ळून येतात. त्यातील उत्तर गोलार्ध हे तर महत्त्वाचे आहेच.

टॉलेमीने देश व शहरांची विभागणी निरनिराळ्या राशींमध्ये नेमकी कोणत्या निकषांवर घेतली त्याचप्रमाणे कोणत्या आयनांश पकडून काढली, ( सायन व निरयन भविष्य कथनाच्या पद्धतीमधील अंशात्मक भे म्हणजे अयबांश होय ) त्याचाही नीट्सा उलगडा जुन्या ग्रंथामध्ये सुस्पष्टपणे सापडत नाही. त्याने वसंतसंपात बिंदूपासून ३६० अंश रेखांशाची विभागणी १२ राशीत करुन प्रत्येक रास ३० अंशाची या मापाने शहरांचे व देशांच्या राशी त्यांच्या वर्गीकरणापरत्वे केले आहे. त्याप्रमाणे मेष राशीचा अंमल इंग्लड, जर्मनी, डेन्मार्क, पॅलेस्टाईन , सिरीया या देशांवर तर नेपल्स, बर्मिगहॅम या शहरांवर आहे असे मानलेले आहे तर समस्त भारत, पंजाव, अफगाणिस्तान, ग्रीस या देशांचे वर्गीकरण त्याने मकर राशीमध्ये दिलेले आहे.
तथापि त्या टॉलेमीच्या वेळच्या देश व शहरे यांच्या सीमारेखांमध्ये (प्रामुख्याने देश ) खूपच फरक पडलेला आहे. त्या वेळचा महाभारत आता फक्त भारत उरलेला आहे कारण टॉलेमीच्या वेळेला पाकिस्तानचा जन्म झालेला नव्हता थोडक्यात सर्वच प्रदेशांच्या सीमारेखा ज्या टॉलेमीच्या वेळच्या होत्या त्या आता राहिल्या नाहीत. तसेच टॉलेमीनंतर अंदाजे १८०० वर्षे झाली असल्यामुळे (त्य वेळी सायनच पद्धत असावी असा तर्क आहे. ) टॉलेमीने देश व शहरे यांच्या राशीचे जे वर्गीकरण केलेले आहे त्या राशीचे अंश त्याने दिलेले नसल्यामुळे काही माहिती अपूर्ण व लंगडी आहे. ( सायन व निरयनमध्ये आजकाल अंदाजे २३ अंशाचा फरक असतो. टॉलेमीच्या वेळी हा फरक नगण्य असेल) याबद्दल नेमके व निश्चितपणे सांगणे केवळ कठीण आहे. कारण मेदिनीय ज्योतिषाशास्त्र हे अजून तसे अपूर्णावस्थेत आहे.

साहाजिकच त्यानंतर निरनिराळ्या तज्ञ ज्योतिषांनी उदा. सेफेराईल, राफेल ते आजपर्यंतचे डॉ. बी. व्ही, रामन, कै श्री. केळकर, श्री सुहास डोंगरे यांनी काही तुरळक देशांचे, राशींचे निरनिराळे वर्गीकरण त्यांची वुध्दिमत्ता व अनुभव यांच्या जोरावर केलेले आहे. तथापि विद्वानात एकमत फारच क्वचित होत असल्यामुळे नेमकी कोणती पत्रिका ज्योतिष अभ्यासकांनी घ्यावी याबद्द्ल साहजिकच संभ्रम निर्माण होतो.
देश व शहरांच्या पत्रिका व त्यावर अंमल करणार्या राशी यांचा विचार करताना आजची पत्रिका आधारभूत पकडली आहे. त्याप्रमाणे त्या देशातील इतिहासातील ठळक घटना जमणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे त्या प्रत्रिकेप्रमाणे देशातील आगामी घटनांचे भविष्य तंतोतंत बरोबर येणे किंबहुना जास्त महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रचंड चिकाटी अविरत परिश्रम, ऐतिहसिक घटनांचा मागोवा, सूक्ष्म निरीक्षण शक्ती, बुध्दिकौशल्य व ज्योतिष शास्त्रातील वरवर क्षुल्लक वाटणार्यान पण महत्त्वाच्या गोष्टीवर त्यांचे प्रभुत्व व मोदिनीय ज्योतिषाची जाण हे खुपच महत्त्वाचे आहे. इतिहासातील घटना लक्षात घेतल्या तर या घटनासुद्धा इतक्या विविध स्वरुपाच्या व विविध रंगी परंतु ठळक व नजरेत भरणार्याे असतात की त्यामधून नेमकी कोणती घटना प्रमाणभूत म्हणून पकडावयाची हे अखेर ज्या त्या ज्योतिषांच्या कल्पनेचा, बुध्दिकौशल्याचा, अनुभवाचा परिपाक असतो. भारताच्या बबतीत विचार केल्यास टॉलेमीने भारताची रास सायन मकर पकडली आहे. कै श्री के केळ्कर हे भारताची रास निरयन मकर पकडूनही त्यांची कित्येक भविष्ये अचूक आलेली आहेत, तर ज्योतिषांमधील आधुनिक वराहमिहीर असा ज्यांचा उल्लेख आदराने करता येईल असे डॉ. बी. व्ही. रामन हे भारताची रास निरयन कन्या पकडतात व त्याप्रमाणे त्यांचीही अनेक भविष्ये पहिल्या महायुध्दापासून ते आजपर्यंत आश्चर्यकारकरीत्या खरी ठरली आहेत.
ज्योतिष शास्त्रात प्रामुख्याने भारतीय ज्योतिषा जर कोणी अननोल भर घातली असेल तर तो ज्योतिषी म्हणजे वराहमिहीर होय. याने "बृहत्तहसंहिता" या ज्योतिष ग्रंथामध्ये निरनिराळ्या देशांची विभागणी राशीवार केलेली होती, तसेच वराहमिहिर यांनी राहू व केतू हे दोन कल्पितबिंदू ग्रह म्हणून मानलेले आहेत. वराहमिहिरच्या पूर्वी राहू व केतू हे ग्रह मानले जात नव्हते. त्याचप्रमाणे वराहमिहीर यांनी कूर्मचक्राच्या आधारे देशांची विभागणी करुन अनेक आश्चर्यकारक विधाने केलेली आहेत. ( वराहमिहिरांचे योगदान इतके प्रचंड आहे की, वराहमिहीर एकच आहे की दोन याबद्द्ल संभ्रम निर्माण व्हावा. ) कोणत्या नक्षत्रात ग्रहण असल्यास त्याचे परिणाम काय होतात याचे सुध्दा त्याने सूक्ष्मपणे भविष्यकथन केले आहे. ते सगळेच प्रकरण आश्चर्यकारक आहे कारण त्यावेळेला आजच्यासारखा सुसज्ज यंत्रणाही नव्हत्या. असे वाचनात आले आहे की पाश्चात ज्योतिषी सेफेरेल यांनी असे भविष्य कथन केले होते. ते म्हणतात की, एका पाठोपाठ एक प्रदेश बळकावीत जगज्जेता सिकंदर जेव्हा विशिष्ट रेखांश ओलांडून पुढे जाईल त्या क्षणापासून त्याचे पतन होण्यास सुरुवात होईल. अर्थातच ते भविष्य त्यांनी कोणत्या आधारे केले याबद्दल नीटसा पुरावा उपलब्ध दिसत नाही.

ज्योतिष अभ्यासकांना सोयीसाठी टोलेमीने दिलेले प्रदेश व शहरे यांचे वर्णन जसेच्या तसे दिलेले आहे. त्या राशी सायन आहेत की निरयन आहेत हे ज्योतिष अभ्यासकांनाच ठरवून देत.

राशी प्रदेश

मेष रास प्रदेश :- इंग्लंड, डेन्मार्क, जर्मनी, लेसर, पोलंड, पॅलेस्टाईअन व सिरिया.

वृषभ रास प्रदेश :- आयर्लंड, इराण, पोलंड, आशिया मायनर, जॉर्जिया, कासेशस, ग्रेशिअन, आर्किपेलगो, आयप्रस व श्वेत रशिया.

मिथुन रास प्रदेश :- अमेरिकेतील संयुक्त संस्थाने ( यू.एस.ए ) वेल्जमब्रॅक्ट, लांबार्डी, इजिप्त, सार्डानिया, इंग्लंडचा पश्चिम भाग, आर्मोनिया, त्रिपोली, फ़्लन्डर्स आणि वेल्स.

कर्क रास प्रदेश :- स्कॉटलंड, हॉलंड, न्यूझिलंड, आफ़िकेचा उत्तर व पश्चिम भाग, मॉरिशस बेटे आणि पाराग्वे.

सिंह रास प्रदेश :- फ़्रान्स, इटली, बोहेमिया, सिसिली, काल्डियापासून बसरा प्रांतापर्यंतचा भाग, रुमानियाचा उत्तर भग, पाल्प्स पर्वतातील प्रदेश.

कन्या रास प्रदेश :- युरोपीय तुर्कस्थान, स्वित्झरलंड, वेस्ट इंडीज, बाबीलोनिया, मोरिया, थेसली, कुर्डीस्थान, ग्रीस देशातील काही भाग, व्हर्जीनिया आणि ब्राझिल.

तूळ रास प्रदेश :- ऑस्ट्रिया, इंडोवायना, चीन मुख्यत्वाने उत्तरेकडचे प्रांत व भारताचा चीनजवळचा प्रदेश, तिबेट, कास्पियन समुद्राच्या बाजूचा प्रात, उत्तर इजिप्त जपान, ब्रह्मदेश आणि अर्जेटिना.

वृश्चिक रास प्रदेश :- अल्जेरिया, बव्हेरिया, मोरोक्को,नॉर्वे, उत्तर सीरिया क्कीन्सलंड.

धनु रास प्रदेश :- अरबस्तान, ऑस्ट्रेलिया, केप फ़िनिस्टर, डालमॅशिया, हंगेरी, इस्त्रिया, मोरॅव्हिया, स्क्लव्होनिया, स्पेन, टस्कनी, फ़्रान्स देशातील सिअएन व ग्यॅरोन ते केप फ़िनिस्टर पर्यंतचा प्रदेश आणि मादगास्कर.

मकर रास प्रदेश :- भारतवर्ष, पंजाब, पर्शियामधिल सिराकत व मारकनजवळील प्रदेश, अफ़गाणिस्तान, थ्रेस, अल्बेनिया, बोस्निया, बल्गेरिया, ग्रीस, मेक्झिको, लुथिआनिया.

कुंभ रास प्रदेश :- खडकाळ अरबस्तान, प्रशिया, रशिया, पोलंड, स्वीडन.

मीन रास प्रदेश :- पोर्तुगाल, सहाराचे वाळवंट.


शहर किंवा प्रदेशांच्या पत्रिका तयार करण्यासाठी ज्या निरनिराळ्या पध्दती तज्ञ ज्योतिषी अवलंबितात त्यामध्ये एक पध्दत ही आर. व्ही. वैद्य यांची आहे. त्यांच्या मते प्लुटो हा ग्रह राष्ट्रामधील ठळक घटना म्हणजेच क्रांतिकारक घटनाण्चा मुख्य कारक ग्रह आहे.
श्री. सुहास डोंगरे सिव्हिल इंजिनिअर,ज्योतिषी, वास्तु ज्योतिष्य अभ्यासक ह्यांचे खापरपजोबा श्री व्यंकटेश बापूजी केतकर यांनी प्रथम प्लुटो ग्रहाचा शोध लावला आणि तेही कोणत्याही प्रकारची सुसज्ज यंत्रणा नसताना, ते लोकमान्य टिळकांच्या समकालीन होते. त्यांनी केतकर शुध्द पंचाग याचा प्रथम अवलंब केला. या प्लुटो ग्रहाचे सामर्थ प्रचंड असून संहारक शक्ती व नवनिर्मितीचा कारक आहे. हे लोंकाना पटवून दिले.

त्यामुळे एखाधा देश / शहरातील ठ्ळक घटना ज्या कालावधीत झाल्या तो कालावधी व प्ल्टो कोणत्या राशीत आहे हे लक्षात घेऊन ती रास दशबिंदूपाशी घेऊन त्याप्रमाणे लग्नबिंदू ठरवावा असे त्याचे मत आहे. या प्लुटो ग्रहाच्या जोडीला हर्षल व नेपच्यून याची मदत घ्यावी.

मेदिनीय निभागात फलादेश करताना सर्वात कोणत्या गोष्टीला महत्त्व असेल तर ते म्हणजे ग्रहणे होय, ग्रहणे हे प्रामुख्याने आधारभूत आहेत तर ग्रहणांची पत्रिका ही मेदिनीय फलीत करण्यासाठी आधारपत्रिका, भारतीय ज्योतिर्विदांनी राहू व केतू यांची वराहमिहिरांच्या काळापासून पूर्णपणे ओळख आहे. त्याकाळी दळणवळण पध्दती फार मागासलेली होती त्यामुळे सर्व जण जेव्हा एकमेकाना भेटत असत त्यावेळी त्याचे संवाद व लिखाण एकमेकाशी देवाण घेवाण होत असे. त्यातील चुका व वेळेचे बंधन असल्यामुळे फारसे मेदनिय शास्त्र प्रचलित नव्हते.

जेव्हा एखादे ग्रहण किंवा ग्रहाचा युती योग होत असतो त्या प्रमाणे ते ग्रहा वसुधरेच्या प्रत्येक भागाला काय फ़ळे देतात हे महत्वाचे आहे. त्या प्रमाणे ज्योतिष्याने भाष्य करताना ह्या सर्व सामान्य गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. नुसते ग्रहाच्या किंवा ग्रहणाच्या योगाने आपणास हे रोग होतील किंवा अपघात होतील हे म्हणजे फ़ार चुकीचे आहे, कारण देशात अनेकाचे लग्न एकच असते, पण च्याच्या वर ग्रहाच्या व नक्षत्राच्या दृष्टीचे परिणाम हा वेगवेगळा असू शकतो. तो परिणाम नवनविन नियम करुन मोजने आवश्यक आहे.

लिहण्यस फ़ार आहे. परंतु येथे वेळेचे व नित्य कामाचे बंधन असल्याने लिहता येत नाही. तसेच वेळेचे बंधन असल्याने शुध्द लेखन तपासणे सुध्दा जमत नाहे. तरी चुका सुधारुन घ्याव्या ही विनंती.
कुंभ राशीत शतरारका नक्षात्र जन्मलेला
संजीव