मंगळवार, ८ डिसेंबर, २००९

 कुंडली आणि वास्तु


आकृतीत दाखवल्या प्रमाणे जातकाची चंद्ररास मकर असून सुर्यरास (पाश्चात) धनु आहे. जेव्हा जातक आपली कुंडली घेऊन येतो तेव्हा आपण त्यांच्या कुंडलीच्या आधारे जातकाच्या वास्तुचे परीक्षण करावे लागते. श्री सहस्त्रबुध्दे ह्यांनी ह्याविषयी बरेच संशोधन करुन एक ग्रंथ लिहला आहे. आज आपण एका जातकाच्या कुंडलीची त्याच्या वास्तुशी सांगड घालणार आहोत.




दिलेल्या कुंडलीच्या आधारे आपण जातकाचे सुख-दुखः पाहु.

१. लग्न मिथुन लग्नस्वामी सप्तमात मंगळ + रवी + केतु युक्त म्हणजे त्याची सप्तमात दुष्टी लग्नात आहे. राहु लग्नी म्हणजे पुर्वभाग दुषित किंवा बंद आहे.

२. लग्नीराहु म्हणजे पुर्व-ईशान्य, पुर्व, पुर्व आग्नेय भागात संडास, बाथरुम नक्की असणार.

३. धनेश अष्टमात शनी + चंद्र + शुक्र युक्त राहाते घरची कमी जागा पण इतर जागा जास्त असणार. शनी मुळे बाह्य जागा बिल्डींगचे कंपाऊड यांचे (र्माझिन) अंतर पश्चिम व पुर्व बाजुस कमी असणार आहे.

४. द्वितीयेश सप्तमात मंगळ + बुध + केतु अधिक हर्षल + प्लुटो युक्त घराला उत्तर ते पुर्व दिशेला अनेक कट असणार.

५. चतुर्थ स्थान चंद्रनाडीच्या प्रभावाखाली येत असल्याने व त्याचा राशीस्वामी बुध, मंगळ + केतु युक्त झाल्याने दशमातील स्वगृही गुरु त्यांची चतुर्थात सातवी दुष्टी घराच्या उत्तरेस मंदीर असणार किंवा घरातुन मंदिर दर्शन होणार.

६. तसेच चतुर्थची बुधरास व गुरुची सप्तमात दुष्टी असल्याने मुख्य करुन घराचे प्रवेश व्दार उत्तरेस आणि संकुलाचे मुख्य प्रवेश द्वार दक्षिणेस असणार व मुख्य जीना पश्चिमे कडुन पुर्वकडे असणार कारण कु़ंडलीचा चंद्र मकर राशीत आहे. मकर शनी प्रधान रास असल्याने जीना पश्चिमेस असणार.

७. पंचमातील राशीस्वामी (शुक्र) पंचमेश अष्टमात शनी + चंद्र + शुक्र युक्त म्हणजे पश्चिम दिशा मोकळी, तेथे कचरा, झाडे-झुडपे, गटार असण्याची जास्त शक्यता आहे. तसेच घर गच्चीवर असण्याची जास्त शक्यता आहे.

८. सप्तम स्थांनात मंगळ + रवी + केतु + बुध सप्तमेश दशमस्थानात स्वगृही म्हणजे पश्चिम दिशा मोकळी तसेच पश्चिमेचा रवीचे किरणे पश्चिमे कडुन घरात प्रवेश. व पश्चिमेत खिडक्या असणार.

९. अष्टमेश अष्टमात शुक्र + चंद्र युक्त घरात सर्व प्रकारच्या सुखसोई असणार पण त्याचा योग्य उपभेग जातकाला स्वता: न मिळता त्याच्या परिवाराला मिळेल.

१०. भाग्येश शनी अष्टमात शुक्र + चंद्र युक्त भाग्येश च्या व्ययात भागेश म्हणजे घरातील सर्व पैसा घरातील सुखसोईवर खर्च झालेला असेल. शिल्लक राहाणार नाही. तसेच घरामधील सर्व उपकरणे जरुरी पेक्षा अधिक असणार त्यामुळे सुध्दा खर्च अधिक प्रमाणात होईल.

११. कार्यस्थानातील गुरु मुळे खर्चजरी जास्त झाला तरी आवकसुध्दा व्यवस्थित असणार, दशमातील गुरु स्वराशीचा स्वगूही जातकाच्या घरात कधीही काहीही कमी पडु देत नाही.

कारण दक्षिणेच्या सुर्यनाडीतील गुरु स्वराशीत बसल्याने चंद्रनाडीचे दोष गुरुकृपेने कमी होतात. तसेच घरात व परिवारात गुरुसेवा परपरा असणार.

१२. लाभेश सप्तमात रवी + बुध + केतु युक्त घरचा मालकच्या सप्तमात मंगळ + रवी + बुध + केतु म्हणजे जातकाच्या पती/पत्नी चा स्वभाव रागीट पण बुधामुळे मनमिळावू कतृत्वशील, रवीमुळे सदासर्वदा कार्यरत, केतुमुळे गुरुसेवा + धार्मिकसेवा करणार असणारा आहे.

१३. व्यायातील वृषभ राशीचा स्वामी अष्टमात शनी + चंद्र + शुक्र युक्त घरातील स्वयपाकघरात अन्नजास्त शिजवत जात असणार, अन्न विपुल प्रमाणात ( चंद्र+शुक्र ), शनीमुळे त्यातील काही भागाची नाशाडी होण्याची शक्यता आहे. पण ह्या जागी शिजवलेले अन्न फार रुचकर आणि स्वादिष्ट मनाला तृप्त करणारे तसेच दहाजणाचा स्वयपाक वीस जणाना पुरेल इतका वरद हस्त दक्षिणेच्या गुरु व सप्तमातील व अष्टमातील ग्रहा मुळे अनुभवास येणार.

१४. सप्तमातील व अष्टमातील ग्रहाची संख्या दाटीवटीने असल्याने जातकाची जागाफार कमी असणार पण जातक त्याजागेत आंनदाने राहात असणार.

वास्तुस्थितीत जातकाचे घर :-

१. बिल्डींगचे प्रवेश द्वार दक्षिणे कडे आहे.

२. घराचे प्रवेशव्दार उत्तरे कडे आहे.

३. ईशान्य ते उत्तर भागातुन मंदिराचे दर्शन होते.

४. ईशान्य पुर्व भागात बांथरुम व पुर्व आग्नेय भागात संडास आहे.

५. अग्नेय दक्षिण भागार स्वयपाक घर आहे.

६. चंद्रराशी स्वामी शनी व दक्षिणेचा गुरु असल्याने दक्षिण पश्चिम या स्थांनात देवघर असणार ( ज्या स्थांनात गुरु असतो त्या स्थांनात मुख्य करुन जातकाचे देवघर असते. )

७. घराचे क्षेत्रफळ ३८५ फुट आहे. तसेच जातकाचे घर सर्व सोईयुक्त व वातानुकुलीत आहे.

८. ईशान्य ते वायव्य पश्चिमेकडील घराबाहेरचा सर्व भाग मोकळा आहे. जातकाला गच्चीचा हा भाग मिळालेला आहे तसेच बिल्डींगच्या बाहेर सुध्दा मोकळे पंटागण आहे.

९. पश्चिमेस कचरा, व झाडेझुडपे आहेत. तसेच त्यामध्ये गटाराचे पाणी सोडलेले आहे.

१०. दक्षिणेला गेटच्या बाजुला कचरा कुंडी आहे.

९. जातकाचे घर गच्चीत आहे व ते संकुलाच्या दक्षिण प्रभागात आहे.

१०. जातकाचे घर विदिशेत आहे.

इतर अनेक गोष्टी आपणास जातकाच्या घरी नजाता कुंडली वरुन पाहाता येतात. वेळे अभावी जास्त लिहत नाही. चुकाची दुरुस्ति करुन घ्यावी

संजीव

रविवार, २२ नोव्हेंबर, २००९

ग्रहांच्या परिभ्रमण पध्दतिचा अभ्यास

ग्रहांच्या परिभ्रमण पध्दतिचा अभ्यास


           ज्योतिषशास्त्रामध्ये कालानिर्णयपध्दति जर समजेल तरच फ़ल-ज्योतिषाचे महत्व आहे नाही तर हे शास्त्र हस्तसामुद्रिकाचे दर्जाचे होईल, ज्याप्रमाणे सामुद्रिक जाणणारांनी हात पाहून अंत:करणरेषा, मस्तकरेषा, आयुष्य रेषा व ग्रहांचे उंचवटे पाहून आयुष्यात मुख्य मुख्य गोष्टीचे वर्णन करावे. परंतु कालनिर्णयाचे कामी हस्त सामुद्रिक अतिशय लंगडे पडते. अमुक एक गोष्ट अमुक वेळी होईल हे मुळीच सांगता येते नाही, जे सामुद्रिक लोक कालनिर्णय सांगतात त्याला काही आधार नाही. अंदाजाने राम भरोसे काहीतरी थापा मारत असतात. त्या थापांनी ग्राहक थोडावेळ फ़सतो, पंरतु पुढे हस्तसामुद्राबद्दल त्याचा आदर कमी होऊन तो करमणुकीचा विषय आहे असे त्यास वाटू लागते. ( सामुद्रिक ज्योतिषानि वाईट वाटून घेऊनये ..क्षमस्व )

             फ़लज्योतिषाला कालनिर्णय समजला नाही तर हे शास्त्र सामुद्रिकासारखे झाले असते. परंतु फ़लज्योतिषशास्त्र, कालनिर्ण याचे कामी अतिशय सूक्ष्म जाऊ शकते. प्रत्येक दिवस चांगला आहे किंवा नाही हे सुध्दा सांगता येते, आज आपण एखाद्या कामास जात आहोत, तेव्हा ते काम फ़त्ते होईल किंवा नाही हे सांगण्यास फ़ल-ज्योतिषशास्त्रात जसा शास्त्रशुध्द मार्ग आहे, तसा मार्ग हस्त सामुद्रिकांमध्ये कोणता आहे हे आम्हांस सामुद्रिक जाणाकारांनी दाखवावे.

         कालनिर्णयाच्या अनेक वर्षफ़लपध्दति आहेत. ताजिक पद्धत, गोचर पद्धत, अंगिरस पद्धत, दिनवर्ष पद्धत, तात्काळ ग्रह-नक्षत्र पद्धत, कुष्णमूर्ति पद्धत व प्रायमरी डीरेक्शन पद्धत. त्यांपैकी आम्हांस दिनवर्ष व गोचर पध्दतीचा चांगला शिकवण्याचा अनुभव आहे.

        आता परिभ्रमणा पध्दतीचा विचार करु. कै. श्री जीवनराव चिटणीस या पद्धतीचा फ़ार उपयोग करीत असत व त्या पद्धतीवर त्यांचा फ़ार विश्वास होता, ही पद्धत परदेशातील ज्योतिषी उपयोगात आणतात. ही पद्धत वैद्य सीमोनाईटच्या “ अर्कना “ नामक पुस्तकात दिली आहे.

          रवि १९ वर्षे, बुध १० वर्षे, शनि ३० वर्षे, चंद्र ४ वर्षे, गुरु १२ वर्षे, हर्षल ८४ वर्षे, मंगळ १५ वर्षे, शुक्र ८ वर्षे, नेपच्यून १६४ वर्षे.

         इतक्या वर्षात ह्या ग्रहांचा एक फ़ेरा सर्व राशिचक्रामध्ये पुरा होतो. त्यात गुरु, हर्षल, नेपच्यून, शनि हे खरोखर इतक्या वर्षात राशिचक्राचा फ़ेरा पुरा करतात. म्हणून त्या ग्रहांचे परिभ्रमण सोपपत्तिक आहे. हे स्पष्ट होते. परंतु रवि एक वर्षानी राशिचक्र पुरे करीत असून त्याला १९ वर्षे कां धरावी हा प्रश्न शिल्लक राहतो, त्याची उत्पती खालीलप्रमाणे दिली आहे.

         मनुष्याचे पूर्ण आयुष्य १२० वर्षे असते ( हे आपल्या विंशोत्तरी दशेवरुन सिध्द होते ) गतीचे न्यूनधिक्याप्रामाणे ग्रहांचा क्रम चंद्र, शुक्र, बुध, मंगळ, गुरु व शनि असा आहे. ( ग्रहाची एका नंतर एकाची दशा सम ग्रहाच्या अधिकार क्षेत्रात) त्यात चंद्र अति शीग्र गतीचा आहे व शनि मंद. शनिची प्रदक्षिणा ३० वर्षाने होते म्हणून पूर्ण आयुष्य १२० वर्षे भागिले ३० म्हणजे ४ वर्षे ही चंद्राला दिली. गुरुची प्रदक्षणा बारा वर्षाची आहे. म्हणून १२० ÷ १२ = १० वर्षे ही बुधाला दिली. मंगळाचे परिभ्रमण १५ वर्षे. ( कित्येकवेळा १९ वर्षे मानतात त्याचे उत्पती लागत नाही ). १५ वर्षे मानली तर १२० ÷ १५ = ८ वर्षे ही शुक्राची. हा आकडा १९ चा वर्गाच्या जवळपास येतो ( १९ X १९ = ३६१ ) म्हणून रविचा काल १९ वर्षाचा ठरविला. सूर्य-चंद्र ग्रहणाचा पुर्ण फ़ेरा १९ वर्षाचा आहे. त्यानंतर तीच ग्रहणे पुन्हा येतात.

          एखादा ग्रह कुंडलीत ज्या ठिकाणी जन्मत: असेल त्याच ठिकाणी प्रत्येक ग्रहाचे एक एक परिभ्रमण झाल्यानंतर येते. कल्पाना करा की, चंद्र जन्मत: चतुर्थ स्थानी आहे तर त्याच राशीत त्याच अंशामध्ये पाचवे वर्षाचे वर्षकुंडलीमध्ये चंद्र तेथेच येईल. एकविसावे वर्षी आरंभी येईल. याप्रमाणे सर्व ग्रहांचे समजावे.

          एखादा ग्रह कुंडलीमध्ये जन्मत: बलिष्ठ असेल तर त्या स्थानाचे व त्या ग्रहाचे फ़ल परिभ्रमणपध्दतीने त्या ग्रहाच्या परिभ्रमणाच्या वेळी मिळेल. रवि दशमस्थानी जन्मत: आहे तर विसावे व चाळिसावे वर्षी दशमात येईल म्हणून विसावे व चाळिसावे ही दोन्ही वर्षे नोकरी, दर्जा, मानमान्यता या बाबतीत उत्तम जातील. वर्ष-कुंडली काढून त्रेराशिक पध्दतीने परिभ्रमण पध्दतीच्या ग्रहांची गति काढून वर्षकुंडली मध्ये ग्रह भरावे व ते जन्मकुंडलीशी व आपसात कसे योग करतात ते पाहून त्यांची फ़ले, ग्रहांची स्थाने व राशि यांच्या अनुरोधाने ठरवावी. पुढील उदाहरणावरुन परिभ्रमणपध्दतीची वर्षकुंडली कशी काढावी हे समजेल.

अभ्यास करावा.

जन्मकुंडली :- ता. ३१/०७/१८८३ वेळ ०९.४८ मुंबई रात्री जन्म ( माहीम, मुंबई जवळ )

( क्रंमश )

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २००९

वास्तुशास्त्राला कोणत्या भारतीय ग्रंथांचा आधार आहे

चिनूक्स यांस


प्रश्न :- वास्तुशास्त्राला कोणत्या भारतीय ग्रंथांचा आधार आहे, हे कृपया सांगाल का?

उत्तरः- मयानं वास्तुशास्त्रावर मयमतम नावाचा अफलातून ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ पॉडिचेरीच्या आश्रमात धूळ खात पडून होता. ब्रुनो डॉन्जेस नामक फ्रेंच तत्वचेत्त्याला हा ग्रंथ सापडला आणि ग्रंथाचं भग्य उजळ्लं डॉन्जेसनं हा ग्रंथ फ्रेंचमध्ये भाषांतरित केला. फ्रान्समध्ये खूप गाजावाजा झाल्यानंतर त्यांच इंग्रजीत भाषांतर झांल. त्यानंतर भारतीयांचं त्याच्याकडे लक्ष गेलं.

१. सुज्ञान जन्म रहित्यम् २. गंटल पंचांगम् ३. गुप्ता पंचागम्, ४. गुप्ता वास्तु, ५. गुप्ता वास्तु सम्राट, ६. गृहवास्तु ( काकिनाडा ) ७. वास्तुशास्त्र विवेकम् ४ भाग ८. श्री रामराय वास्तु शास्त्रम् ९. जातक परिजातम्, १०. बृहत्पराशर होरा शास्त्रम् ११. श्रीकृष्ण वास्तू शास्त्रम् १२. वास्तु दर्पणम् १३. वास्तु नारायणीम् १४. सनत्कुमार वास्तुशास्त्रम् १५. उत्तर काळमृत् १६. पेध्दबाल शिक्षा १७. आंध्रज्योति सचित्र वार पत्रिका १८. मनदेशम् पाक्षिक वार पत्रिका १९. गृहवास्तू दीपिका २० गृहवास्तू रहस्यम् २१ गृहवास्तू दर्पणम् २२. वास्तु दुंदुभि / टुंटुभि २३ वास्तु पद्माकरम् २४. वास्तु विज्ञान सर्वस्वम् २५. सुब्बराय वास्तु शास्त्रम् २६. श्री दत्तात्रेय वास्तुशास्त्रम २७ कृष्णा यजुर्वेद तैत्तरीय संहिता ५ भाग २८ याजुषा पुर्वप्रयोगचंदिका,

२९ निर्णयसिंधु ३० धर्मसिंधु ३१, अश्वलायन गृह्यसूत्रम् ३२. समारांगण- सूत्रधार ३३. ऋग्वेद ३४ यजुवेद ३५ सामवेद ३६ अथवेद ३७ शांति कमलाकरम् ३८ शांति रत्नाकरम् ३९ सर्व देव प्रतिष्ठा प्रकाश ४० श्रीविमानार्चना कल्पम्

४१ बृहत्संहिता ४२ वास्तु रत्नाकर ४३ वास्तु रत्नावली ४४ बृहद्वास्तुमाला ४५ गृहवास्तु शांती प्रयोग ४६ मुर्हर्त चिंतामणी ४७ वराह पुराण ४८ सूर्य पुराण ४९ भविष्य पुराण ५० विष्णु पुराण ५१ विष्णु धर्मोत्तर पुराण ५२ विश्वकर्मा पुराण ५३ विश्वकर्मा प्रकाश

५४ वास्तुवैभव ५५ मातृस्मृती १२ भाग ५६ वास्तु सम्राट ५७ वास्तुशास्त्र, ५८ शिल्पशास्त्र ५९ मेदिनीय ज्योतिष ( ५७ ते ५९ प्रत्येकी १२ भाग ) ६० मयमतम् ६१ मशिल्प ६२ मयशिल्पशतिका ६३ सूर्यसिध्दान्त ६४ वास्तुप्रवेश ६५ अजित वास्तु ६६ वास्तुशुभा ६७ मस्त्यपुराण ( १९०६) ६८ स्कंद पुराण ६९ वेद पुराणे समालोचन ७० श्री अग्निमहापुराण ७१ श्री गरुड पुराण ७२ श्री विश्वकर्मा पुराण ७३ सार्थ मुहूर्तमार्तंड


अशी अनेक पुस्तके आपणास मिळतील वरील सर्व पुस्तकांचे संदर्भ आपणास पाहिजे असता माफक शुल्लकात उपलब्द होईल.

वास्तु विज्ञान प्रेमी संजीव


बुधवार, १८ नोव्हेंबर, २००९

राहु केतु मुळे सप्तमस्थान अथवा चंद्र बिघाडला असल्यास वैवाहिक जीवनात गूढता निर्माण होते.

राहू आणि केतू


भागवताच्या मते कश्यप व धनी यांचा पुत्र ( ६,६,३०) आकाराने वाटोळा (म.भा.भीष्म १९ ) राहू व केतु मिळून मुळात एकच पुरुष होता, त्या एकाचेच दोन जाहाले. देव दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून अमृत बाहेर निघाले मोहिनीरुपी विष्णु ते अमृत देवांना वाटत असता हा देवाच्या पंगतीत चोरुन येऊन बसला. सुर्य-चंद्रानी त्याचे कपट उघडे केले असता विष्णूने त्याचे शीर तोडले. धडाचा झाला राहू व शिराचा झाला केतु त्यादोघांनी सुर्य-चंद्राविषायी राग धरला. त्या रागाने अद्यापि पर्वकाळी राहु-केतू हे सूर्य चंद्रांना गिळू पाहतात. त्यालाच आपण ग्रहण म्हणतो.

राहू-केतु हे सूर्यमालिकेतील ग्रह नाहीत. किंबहुना ’ग्रह’ संज्ञेत ते मोडत नाहीत. पृथ्वीची कक्षा व चंद्राची कक्षा ह्या दोन कक्षा एकमेकांना ज्या दोन ठिकाणी छेदतात ते छेदन बिंदू म्हणजे राहू व केतू आहेत. ज्योतिषशास्त्रा ह्या गणिताच्या बिंदूना प्राचीन काळापासून ग्रहाइतकेच महत्व देण्यात आले त्यांच्या फ़लाचा अभ्यास प्राचीन ज्योतिषी उत्कृष्ट स्वरुपात केला आहे हे दोन छेदन बिंदू ज्या स्थानात पडातात जे ग्रह ह्या दोन बिंदूजवळ असतात, त्या स्थानाच्या दृष्टीने त्या ग्रहाच्या परिणामाच्या दृष्टीने त्यात फ़ेरबदल करावे लागतात.

वास्तुत: राहू आणि केतू हे दोन इतर ग्रहांप्रमाणॆ दिसणारे ग्रह नाहीत. किंबहुना त्यांना व्यक्तित्वच नाही. हे दोघे आहेत दोन संपात बिंदू, ज्या वर्तुळ मार्गाने चंद्र फ़िरतो तो मार्ग आणि ज्या मार्गाने पृथ्वी सूर्याभोवती फ़िरते, तो मार्ग हे दोन मार्ग अवकाशात परस्पराना ज्या दोन भिन्न स्थळी छेदतात त्यापैकी एका छेदन बिंदूला राहू आणि दुस-या छेदन बिंदूला केतू म्हणतात. या दोन्ही छेदन बिंदूना गती आहे. म्हणून त्याला फ़लज्योतिषशास्त्राने स्वतंत्र ग्रह मानून त्यांची स्थाने एकमेकांसमोर १८० अंशावर काल्पिली आहेत. मेषादी राशीत पुढे-पुढे जात नसून मागे-मागे येत आतात म्हणजे वक्र गती असते. सूर्याभोवती प्रदक्षिणा करावयास राहूला १८ वर्षे लागतात. त्याचा तपशील असा:-

राहूची दैनदिन गती ३ कला २१ विकला आहे. या गतीने राहूला १२ राशी आक्रमण करण्याला ६७८५ दिवस २० घटी २५ फ़ळे ७ विपळे इतका काल लागतो. ३६० दिवसांच्या प्रमाणे १८ वर्षे १० महिने २ दिवस व ३६५ दिवसाच्या प्रमाणे १८ वर्षे ७ महिने २ दिवस इतका काळ लागतो.

राहूबद्दल पाश्चात्य ज्योतिषी काय म्हणतात ते पाहू: आग्न ज्योतिषी बिलाप लिळी म्हणतो – राहू हा पुरुष प्रकृतीचा असून तो गुरु-शुक्राच्या स्वभावधर्माचा व भाग्यवृध्दी करणारा आहे, तो गुरु-शुक्राच्याप्रमाणे फ़लदायी आहे. हा जेव्हा शुभ ग्रहाच्या बरोबर असतो, तेव्हा तो आपले अशुभ धर्म कमी करतो. जेव्हा तो शुभ ग्रहाने युक्त असतो , तेचा त्याच्य शुभ धर्माची वृध्दी करतो.

पाश्चात्य ज्योतिषशास्त्रात राहू-केतू सर्पाकार मानले आहेत. राहूच्या उच्च व स्वक्षेत्रासंबंधी एकवाक्यता नाही, प्रवासाची वेळ, सर्प, शत्रु, द्यूत, यश, प्रतिष्ठा, छत्रचामरादी राजयोग यांचा राहू कारक मानले आहे.

राहूचे मित्र – बुध, शुक्र, शनि, सम- गुरु, शत्रु- रवि, चंद्र, मंगळ, लिंग–स्त्री ग्रह, तमोगुणी, जात चांडाळ, अशुभग्रह,

दृष्टी:- आपल्या स्थानापासून ५,७,९,१२ स्थानावर पुर्ण २,१० या स्थानावर अर्धी, ३,६, स्थानावर पापदृष्टी आणि स्वग्रही असला, तर संध असतो असे पराशर सांगतात. त्याच्या दृष्टीबद्दल कोणत्याच शास्त्राकाराने कोठे सांगितल्याचे आढळत नाही, पण आपले ज्योतिषी ७ व्या दृष्टीशिवाय कोणतीच दृष्टी मानावयास तयार नाहीत.

याची उच्च-नीच राशी संबधाचे एकवाक्यात नाही. पंरतु आपले ज्योतिषी मानतात ते–राहू मिथुन व कन्या राशीत बलवान असतो. त्याची स्वराशी कन्या आहे मिथुन राशीत १५ संशावर उच्च असतो. काहीच्या मते वृषभ राशीत १५ अंशावर उच्च असतो व काहींच्या मते वृश्चिक राशीवर नीच असतो. ( ब्रहतपराशर्यमध्ये वृषभ ही व्याची उच्च राशी मानली आहे. कन्या ही स्वग्रह मानली आहे. )

हा वर्णाने निळा-काळा, उंच, सडपातळ, आदी खालच्या जातीचा, खरजेने व्याप्त जाहलेला पाखंडी, उचक्या लागणारा, खोटे बोलणारा, कपटी, कुष्टरोगी, नेहमी दुस-याची निंदा करणारा, बुध्दीहीन असतो. तांबूस, उग्र चेह-याचा, दृष्टी उग्रम विषवाणी, शरीरबांधा उंच, सशक्त, कर्तव्यभ्रष्ट, धुरकट रंग व नेहमी तंबाखू ओढणारा. शरीरावर व्रण, स्वभावाने दुष्ट असे याचे वर्णन पराशर करतत.

स्वभाव- तमोगुणी, दिशा- नैऋत्य, बर्बर देशावर याची सत्ता असते, वाहन – काळा सिंह, काहींच्या मते घोडा, धातू – शिसे, गोमेद हे तत्न ( स्त्रीयांनी हे रत्न वापरु नये ), तीळ हे त्याचे धान्य आहे, नीलवस्त्र व कृष्णपुष्प या त्याच्या दानवस्तु आहेत.

राहू अशुभ असता:- म्हणजे अशुभ स्थानी असता माणसाने काळ्या रंगाचे कपडे वापरु नयेत त्याच प्रमाणे नैऋत्य दिशेकडील माणसांशी संबंध ठेवू नये.

राहूच्या आवस्था:-

मिथुन, कन्या, कर्क, धनू राशीत असता – बाल

मेष, वृश्चिक, वृषभ – तरुण

मकर, कुंभ, मीन, सिंह – वृध्द

राहूशी इतर ग्रहांशी होणारे योग:-

ग्रहण विचारात रवि, चंद्र व राहू यांची फ़ळे आहेत असे समजावे, फ़रक इतकाच आहे की, ग्रहणाची फ़ळे प्रसंगवशात मिळतात व तीही कडक मिळतात आणि दर महिन्याला ग्रहण नसता हिणारी राहू-चंद्राची युती व वर्षातून एकाच वेळी राहू बरोबर होणारी रविची युती साध्य आहेत. तसेच कोणताही ग्रह चंद्र कक्षेच्या पातात येईल तर त्या ग्रहांची शुभ फ़ळे फ़ार जोराने मिळतात.

राहूकेतू-धक्का

राहु केतु मुळे सप्तमस्थान अथवा चंद्र बिघाडला असल्यास वैवाहिक जीवनात गूढता निर्माण होते. मनावर सतत दडपण राहते. मानसिक कोंडमारा होतो. प्रकृतिस्वास्थ्य नसल्याने कामसुखात बाधा येते. विवाह ठरतानाही विलंब होतो. वैवाहिक जीवनात तडजोड करावी लागते. पत्रिकेत सप्तमस्थान अथवा चंद्र केतुने बिघडला असल्यास्स वैवाहिक जीवनात उदासीनता निर्माण होते. जीवनसाथीदाराचा वियोग सहन करावा लागतो. कामसुखातील चैतन्यही हरवून जाण्याची प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते.

राहूधक्का जन्मलग्न तुला किंवा वृश्चिक असीन शनि हा ग्रह, कर्क, वृश्चिक, अथवा मीन राशीत असून त्यापासून राहू हा ग्रह ४/८/१२ वे स्थानी असला म्हणजे त्या जातकाला राहू धक्का पोचेल असे निदान करता येईल.

केतुधक्काही जन्मलग्न तुला किंवा वृश्विक असून शनि हा ग्रह मात्र वृषभ, कन्या, मकर या राशीत असून त्याचेपासून ४/८/१२ वे स्थानी जर का केतु हा ग्रह पडलेला दिसेल तर त्या जातकाला केतुधक्का त्रास देईल असे म्हणता येईल.

राहू हे धड आहे आणि केतु हे शिरकमल आहे असे भारतीय शास्त्राज्ञांचे मत आहे. अर्थात राहू धक्क्याचा परिणाम आडदांपणाच्या कृत्यात भाग घेणारा, त्यातून नुकसानीचे योग जातकाला दर्शवील तर केतु धक्का कुटिल बुध्दीने डाव रंगात आणणारा. पण यशाच्या ऐन प्रसंगी डावातील रंग निघून जाऊन सहजगत्या साध्या चुकीने एकाएकी बाजी करण्याचा प्रसंग केतु धक्का मानवाला आणील.

राहू हा ग्रह भावंडांचा कारक मानला जातो तर केतु हा ग्रह नातलग मंडळीचा वृध्द मंडळीचा कारक समजला जातो. हे दोन्हीही ग्रह प्रवासाचेही कारक आहेत. त्यातल्यात्यात केतु हा ग्रह महान प्रवासी आहे-पण या ग्रहांच्या गुणधार्माची गंमत ही दिसते की, राहू वा केतु मानवाला प्रवासी करतील खरे पण हा प्रवास अत्यंत विरक्त वृत्तीने किंवा बेफ़िकीरपणे ते करतील हे दोन्हीही ग्रह स्वजनाकरता प्राणपणाला लावणारे महान मुत्सद्दी असे आहेत. शनीइतकाच यांचा मुत्सद्दी आणि कारस्थानीपणामध्ये क्रम लागेल. पण पराजय पदरी पडला तर शनितत्वाचा माणूस धैर्य धरुन पुन्हा प्रयत्न करील, तर राहू केतु तत्वाचा माणूस नेस्तनाबूद होऊन जाईल एवढाच फ़रक आहे. अर्थातच हे ग्रह ज्यांना धक्का देतील त्यांचा अगदी संपूर्णपणे विनाश करुनच मोकळे होतील यात संशय नाही. हे जातीने दैत्यवंशीय आपल्या कृतीने व अमृतप्राशनाने यांनी देवत्व पचनी पाडलेले आहे. यामुळे यांचे ठिकाणी दुविचारधारेचा प्रवाहही संतत प्रसवत असतो. पण यांचे सुविचाराचे बोल कुणीही ऐकत नाही. जेव्हा का स्वजनच त्यांचा तिरस्कार करु लागतात, तेव्हा यांना संयम पाळणे कठीण जाते आणि मग महाप्रलयकाल ओढवतो. स्वजनांचाच संहार, स्वकृतीचाच सर्वनाश, स्वधर्माचाच स्वाहाकार या राहूकेतूच्या धक्क्यातून बाहेर पडतो.

ज्या व्यक्तिच्या कुंडलीत असा धक्कादायक योग असेल त्यांनी स्वजनांपासून अत्यंत सावध राहावे हे बरे. तुला लग्नी कर्केचा शनि राहू धक्क्याला जास्त जोराने चालना देऊन भावंडाचा प्रलयकाल त्याचेवर ओढवील. प्रवासात अपघातांचे संभव अशाच व्यक्तींचे जीवनात उद्दभवतील. घरातील वडीलधारी माणसे पटापट थोड्याच काळात दगावण्याचे योगही याच धाक्यातून येतात. हीच स्थिति केतुधक्यात तुला लग्नी मकरेचा चतुर्थातील शनि दाखवील. राहू धक्का पुर्वभाग्य नष्ट करील तर केतु धक्का भावंडांचा नाश करील, तुला लग्न असून वृश्चिकेचा शनि असताना दीर्घ मुदतीची दुखणी, आज्याच्य वेळची स्थिति जातकाची न राहणे, नेत्रपीडा, करभी, देवस्की यांपासून त्रास, जाणूनबुजून मार बसण्याची शक्यता राहूधक्का दाखवील. मीनेचा शनि राहू धक्क्याला थोडा कमी चालना देईल. फ़क्त प्रवासात वा अनोळखी लोंकाकडून धोके, त्याचप्रमाणे खाण्यापिण्यात विषप्रयोगाची शक्यतादर्शक योग, हीच स्थिति केतु धक्क्याची तुला लग्नी अष्टमातील वृषभेचा शनि असताना जातकाला दाखवील.

राहू अथचा केतु धक्का पोचेल की नाही हे पाहात असताना हे ध्यानात ठेवा की, जन्मकाली तुला वा वृश्चिक लग्न आहे किंवा नाही. असलेच तर शनि तुला, कर्क, वृश्चिक अथचा मीनेत आहे का? वृश्वित लग्नीही वरील राशीत आहे का आणि असला तर या शनीपासून राहू हा ग्रह ४/८/१२ वे स्थानी जन्मकाली आहे का? असेल तरच राहू पोचेल, नाहीतर नाही आणि केतुधक्क्याकरिता लग्नं तीच लागतात पण शनि मात्र कन्या, मकर किंवा वृषभेत लागतो व त्याचेपासून ४/८/१२ वे स्थानी केतु लागतो, तरच केतु धक्का पोचू शकतो.

अर्थात या दोन महान प्रभावी ग्रहांचे धक्के एकाच व्यक्तिला जीवनात मिळणार नाहीत हे सिध्द होते आणि हे त्यांचे मानवजातीचर उपकारच असेच मानले पाहिजे

वृश्चिक लग्नी किंवा मीनेतील वा कर्केतील शनि मानवाला भावंडांकडून मरणासम यातना देववील, स्वशरीरावर शस्त्रक्रीयेची पाळी आणील, हा योग राहू धक्का दाखवील, तीच गत वृश्चिक लग्नी केतु धक्का असताना जेव्हा का शनि ग्रह वृषभ, मकर वा कन्येत असेल तेव्हा मानवाची करील. सट्टॆबाज व्यक्तींना राहू व केतु धक्काच जास्त जाणवतो. राहू धक्क्यात वृश्चिक लग्नी शनि स्थलांतराचे सतत प्रसंग, विभक्तीकरण, मेदूला दुखणी, उपासमार व वेडाचे झटके येणे वगैरे परिस्थिति जोरदारपणे दर्शवील, तर मीनेचा शनि संततीला त्रास दाखवील.

सर्वसाधारणपणे केतु धक्का मानवाला लोकपवादाने, भावंडांच्या अघोरी कारस्थानाने नेस्तबूद करण्यास कारणीभूत ठरतो. कुटिल कारस्थान हे केतूचे कार्य असल्याने केतुधक्कावाल्या व्यक्तींनी कोर्टकचे-यांच्या लफ़ड्यात जास्त पडू नये हेच बरे. राहू हा मातेकडील स्थितिनिदर्शक ठरेल तर केतु हा ग्रह पितृकुळाचा दर्शक ठरेल. अर्थात यावरुन मातृपितृकुळाची पंरपरा आपले धानी येईल. अस्तु.



१. मंगळ राहु योग संततिसुखासाठी चांगला नसतो.

२. बुध-शुक्र-राहु (त्रिग्रह) योग कलेच्या क्षेत्रात कर्तबगारी दाखवू शकतो.

३. कुंडलीतील कोणताही भावेश केतु युक्त झाल्यास फ़लात कमतरता निर्माण करतो.

४. गुरु-केतु योगात आध्यात्मिक धारणा उच्च दर्जाची असू शकते.

५. चंद्राच्या चतुर्थात राहु असता घराच्या प्रवेशद्वारासाठी नैऋत्य दिशा योग्य अशी असते.

६. केतुची दशा सामान्य पणाने कोणत्याही लग्नांना वाईट जात असते.

७. लग्नातील राहु व्यक्तीतील निर्दयीपणा वाढवीत नेतो.

८. लग्नातील राहु व्यक्ति उपासक असू शकतात.

९. लग्नीतील केतु व्यक्तिचे आतोग्य चांगले ठेवत नाही.

१०. धनस्थानातील केतुमुळे माणसाला दंतरोग असू शकतात.

११. धनस्थानातील राहुमुळे व्यक्ति आक्रमकपणे पैसे मिळविताना दिसते..

१२. तृत्तीय स्थानात राहु असता व्यक्तिची वागणूक उर्मट असू शकते.

१३. तृतीय स्थानात केतु असता व्यक्तिला नातेवाईकां कडून त्रास होऊ शकतो.

१४. चतुर्थातील राहु असता शिवाउपासना केल्याने शांती मिळू शकते.

१५. पंचमातील राहु संततिच्या प्रगतीस अडथळा आणू शकतो.

१६. पंचमातील राहु कठोर उपासना घडवू शकतो.

१७. पंचमातील राहु निर्णायक लाभ करुन देऊ शकतो.

१८. पंचमेश राहुकुक्त निर्णायक लाभ करुन देऊ शकतो.

१९. पंचमेश राहुयुक्त शिक्षणात अडथळा आणू शकतात.

२०. पंचमात मंगळ –राहु संततीस तापदायक.

२१. कुंडलीतील राहु सदासर्वकाळ वाईट फ़ले देईल असे नसते.

२२. गुरु-केतु नवपंचम योग व्यक्ति निखळ अध्यात्मिक असू शकते.

२३. कुंडलीतील चंद्राच्या चतुर्थात केतु असता घराजवळ गणपतीचे देऊळ असते.

२४. सुखस्थानात केतु असता सुखात कुठेतरी मिठाची चिमुट असू शकते.

२५. मुखरोगासाठी रवि-केतु महत्वाचे ग्रह असू शकतात.

२६. विषबाधा, स्फ़ोट यासाठी रवि-राहु महत्वाचे ग्रह असू शकतात.

२७. सप्तमात राहु असता जोडिदाराच्या स्वभावात क्रुरता असू शकते.

२८. सप्तमात केतु असता जोडिदाराची प्रकृती चांगली असत नाही.

२९. भाग्यशानातील चंद्र-राहु युती शिक्षणासाठी अडथळे निर्माण करु शकते.

३०. सर्व प्रकारच्या जातकांच्या कुंडल्यांतुन बदलीचा प्रश्न सोडविताना राहुला महत्व द्यावे लागते.

३१. वृश्चिकेतील राहु डूख धरणारा असू शकतो.

३२. रवि-राहु पण मार्गी बुध असताना बाजार तेजी आणतात.

३३. अश्विनी नक्षत्रातील केतु कठोर उअपासना करुन घेत असतो.

३४. रोहीणी नक्षत्रातील केतु मानसिक त्रासानंतर फ़ायदा देतो.

३५. रोहीणी नक्षत्रातील केतु सदा-सर्वदा स्त्रीकडुन लाभ दाखवत नाही.

३६. मृग नक्षत्रातील राहु जातकाला संघर्ष करावयास लावतो.

३७. गुरु-राहु युतियोग जातकाच्या स्वभावात दुष्टता असू शकते.

३८. गुरु-राहु युतियोग स्वत:च्या संततीचे फ़ारसे लाड करतान आढळणार नाहीत.

३९. गुरु-राहु युतियोग शिक्षणात मोठी प्रगती होत नाही.

४०. आर्द्रा हे राहुचे नक्षत्र आहे हेच जन्म नक्षत्र असता जातकाल राहुमहादशा सुरु असते.

४१. राहु हा कुंडलीत दोन्ही पध्दतीत काम करत असलेला दिसतो.

४२. घराण्याचे शाप घराण्याचे पाप या दोन्हीचेही सुचन राहु करत असतो.

४३. राहु हा आजोबांचा कारक आहे.

४४. राहु हा छत्रकारकही होऊ शकतो.

४५. आर्द्रा नक्षत्रातील राहु चांगली अथवा वाईअट फ़ले तिव्रतेने देतो.

४६. आर्द्रा नक्षत्रातील केतु सर्व प्रकारच्या साधनेसाठी चांघला असतो..

४७. पुनर्वसु नक्षत्रात राहु अत्यंत शुभ असू शकतो.

४८. पुनर्वसु नक्षत्रात केतु साधनेसाठी चांगला असतो.

४९. आश्र्लेषा नक्षत्रातील राहु पित्यास त्रास असू शकतो.

५०. आश्र्लेषा नक्षत्रातील केतु विषबाधा- पिशाच्चबाधा असे त्रास होऊ शकतात.

५१. मद्या नक्षत्र केतुच्या अधिपत्याखाली येते.

५२. मद्या नक्षत्रात चंद्र असता नन्मत: केतुची महादशा असते.

५३. मद्या नक्षत्रातील राहु वडिलांकडून त्रास दाखवितो.

५४. मद्या नक्षत्रातील केतु गणपती उपासेनस चांगला असतो.

५५. पुर्वा नक्षत्रात राहु असता जन्मस्थ कुंडलीतील राहुला महत्व द्यावे.

५६. पुर्वा नक्षत्रातील राहु दुस-या तिस-या चरणांवर शुभफ़ले देऊ शकतो.

५७. पुर्वा नक्षत्रातील केतु उपासनेस सर्वत्र चांगला.

५८. उत्तरा नक्षत्रातील राहु पहिल्या तिस-या चवथ्या चरणांवर बराच मिश्र होऊ शकतो.

५९. उत्तरा नक्षत्रातील केतु उपासनेस चांगला

६०. ह्स्त नक्षत्रतील राहु जन्मस्थ बुधा प्रमाणे फ़ले देऊ शकतो.

६१. हस्त नक्षत्रातील केतु आरोग्यच्या दृष्टीने हानीकारक ठरु शकतो.

६२. चित्रा नक्षत्रातील राहु कुंडलेत मंगळा ज्या राशीत आसेल त्याप्रमाणे फ़ले देतो.

६३. वित्रा नक्षत्रातील केतू आरोग्याला हानिकारक असतो.

६४. स्वाती नक्षत्र राहुच्या अधिपत्याखाली येते.

६५. स्वाती नक्षत्रात जन्म्स्थ चंद्र असता जातकाला राहुची म्हादशा असते.

६६. स्वाती नक्षत्रात राहु कठोर उअपासना करवून घेतो.

६७. विशाखा नक्षत्रातील राहु जन्मस्थ शुक्र कोणत्या राशीत आहे यावर ठरत असते.

६८. विशाखा नक्षत्रातील केतु दंतरोग यादृष्टीने पहावा लागतो.

६९. अनुराधा नक्षत्रातील केतु मुखरोगासाठी हानीकारक ठरतो.

७०. जेष्ठा नक्षत्रातील राहु जन्मस्थ मंगळाप्रमाणे फ़लदायी होतो.

७१. जेष्ठा नक्षत्रातील केतु आरोग्यासाठी चांगला नाही.

७२. मूळ नक्षत्र केतुच्या अधिपत्याखाली येते.

७३. मूळ नक्षत्रात जन्मस्थ चंड्र असता जन्मत: केतुची महादशा सुरु असते.

७४. उत्तरषाढा नक्षत्रात राहु असता जन्मस्थ रवि ज्या राशीत असेल त्याप्रमाणे फ़लेदायी होतो.

७५. उत्तरषाढा नक्षत्रात केतु असता आरोग्यला हानिकारक होतो.

७६. श्रवण नक्षत्रात राहु जन्मस्थ चंद्राला मह्त्व द्यावे लागते.

७७. धनिष्ठा नक्षत्रातील राहु फ़क्त दुस-या तिस-या चरणावर शुभफ़ले देऊ शकतो.

७८. शतातारका नक्षत्र राहुच्या अधिपत्याखाली येते.

७९. शततारका नक्षत्रात जन्मस्थ चंद्र असता जातकाला राहु महादशा असते.

८०. शततारका नक्षत्रातील राहु उपासनेला चांगला असतो.

८१. शततारका नक्षत्र विपत म्हणून असेल तर जन्मस्थ राहुला महत्व द्यावे लागते.

८२. पुर्वा भाद्रपदा नक्षत्रातील राहु तिस-या चरणावर शुभफ़ले देऊ शकतो.

८३. रेवती बक्षत्रातील राहु शेवटच्या चरणात अशुभ फ़ले देऊ शकतो.

८४. गोचर राहु केतु यांचे राशीतून अथवा सप्तमातुन भ्रमण होत असता वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण होतात.

८५. मंगळ राहु युती विवाहित स्त्रीच्या पत्रिकेत अत्यंत अशुभ “तोंड दाबून बुक्क्यांचा मार” अशी परिस्थिती निर्माण होते.

८६. राहुचे बुध, शुक्र व शनि मित्र गुरु सम आणि रवि,चंद्र व मंगळ शत्रु आहेत.

८७. केतुचे मित्र सम व शत्रु राहुप्रमाणे समजावे वस्तुत: राहु व केतु याचे मित्र सम शत्रुत्व कांही ज्योतिषी मानीत नाहीत त्याचे कारण ते गोल नसून बिंदूरुपी आहेत हे होय. ग्रहांचे हे नैसर्गिक मित्र-सम-शत्रौत्व आहे.

८८. प्रथम स्थानी राहू असता जप-जाप्याची आवड

८९. राहू-चंद्र एकत्र असता एकदा तरी आयुष्यात मोठ्या संकटास तोंड द्यावे लागते.

९०. राहु शनी लग्नात असता पिशाच्चबाधा. / क्षीण चंद्र शनीसह अष्टमात असता पिशाच्चबाधा.

९१. राहू प्रथम किंवा पंचम स्थानी असता मनुष्याचे दात वेडेवाकडे, मोठे व दंतपीडा.

९२. तृतीय स्थानी राहू असता ( कोणत्याही राशीचा ) लाहानपणी कान फ़ुटण्याची व्यथा.

९३. षष्ठस्थानी राहू-चंद्र असता पोटाचे विकार.

९४. राहू-मंगळ एकाच स्थानी प्रतियोगात असतील, तर ऒपरेशन संभव अगर अपघात किंवा मंगळाचे राहु वरुन भ्रमण असता अपघात होण्याची संभवना.

९५. राहू रवि लग्नात असता दृष्टीनाश संभवतो ( नक्षत्र व इतर योग महत्वाचे असतात )

९६. राहू चतुर्थात पापग्रहाने दृष्ट असेल व लग्नेश निर्बली असेल, तर रुधिर रोग.

९७. मूळ राहुवरुन गोचरीचे राहूचे भ्रमण होत असता आजार अ दंतरोग दात काढण्याची पाळी येते.

९८. राहूवरुन मंगळाचे, मंगळावरुन राहूचे भ्रमण चालू असता प्रकृती बिघाडते.

९९. राहू षष्ठात असता किंवा केतू षष्ठात असता दंतरोग ओठ मोठे असतात.

१००. राहूचे किंवा शनीचे द्वितीयात किंवा सप्तमात गोचरीने भ्रमण चालु असता दंतपीडा

१०१. राहू द्वितीय स्थानी असता वाणी दोष असतो.

१०२. राहू तृतीयात असता जन्म देवस्थानाजवळ होतो.

१०३. धनात पापग्र्ह व तृतीयात राहू असता बंधुसौख्य नाश होते.

१०४. चतुर्थात राहू असता प्रथम संतती मृत होते.

१०५. राहू लाभात असता म्हातारपणी पुत्राकडून सुख मिळते.

१०६. राहू-मंगळ सप्तमात असतावैवाहिक सुखाचा बोजबारा उडतो.

१०७. अष्टमात राहू अगर हर्षल असता अनेक वेळा विवाह फ़िसकटतात.

१०८. अष्टमात राहू-हर्षल असता स्त्री धन मिळणार नाही.

१०९. ज्या लोकांन लिहिताना तोंड वेडे-वाकडे करण्याचे सवय अस्ते त्यांचा राहू सम्राशीत असतो, पण १/९ स्थानात असता हा नेम चुकत नाही.

११०. षष्ठात राहू मामाचे सुख लागू देत नाही, भांडखोर वृत्ती असते.

१११. राहू आपल्या राशीत किंवा ९ अगर १० व्या स्थानी असेल, तर मनुष्याला उच्चदशा प्राप्त होते.
हे एक संशोधन आहे. अर्थात चिकित्सक अभ्यासू व या शास्त्राचे रसिकजन यांनी यातील ठोकताळ्यांचा अनुभव घेऊन जरुर पडताळा पहावा व जे जे अनुभव पटले असतील वा नसतीलही ते माला कळवावे. म्हणजे माझ्या संशोधनाचे कामाला उत्तेजन मिळेल ही विनंती.
संजीव

संदर्भ ग्रंथ:- नवग्रहांची फ़ळे (श्री. वि,श्री. देशिंगकर), ग्रहांचे धक्के (श्री पदमाकर जोशी (शांडिल्य)), सहस्त्रावली ( श्री ज्योतिषभूषण उदयराज साने )

मंगळवार, १७ नोव्हेंबर, २००९

राहू आणि केतू

राहू केतू हे ग्रह आकाशात दिसणारे ग्रह नाहीत. ते गणित सिध्द बिंदू आहेत. मृथ्वीच्या भ्रमण मार्गास चंद्राच्या भ्रमण मार्ग उत्तरेकडे जातांना जेथे छेदतो त्या बिंदूस राहु म्हणतात. व त्या विरुध्द बिंदूस केतू म्हणतात. हे छाया बिंदू आहेत. त्यांना चंद्रचे पात म्हणतात. ( Moons Nodes, Ascending Nodes, Decending Noes अगर Dragon Head or Dragon Tall ) हे ग्रह नेहमी गक्र गतीने भ्रमण करतात. पाराशरी, सर्वार्थ चिंतामणी, बृहद्द जातक, सारावली ह्या मुळ ग्रंथात ह्याचा उल्लेख आहे. ह्यांना राशी दिलेल्या नाहीत पण अनुभवाने काही राशी ठरविलेल्या आहेत. त्यालाही मत मतांन्तरे फ़ार आहेत. पाराशर मते राहू वृषभेत उच्च, केतू वृश्चिकेत उच्च, राहु मिथुन कर्केत मुलत्रिकोणी व केतू धनु मकरेत मुल त्रिकोणी, राहू कन्येत स्वग्रही असतो. सर्वार्थ चिंतामणी मते राहू केतू उच्च वृषभ / वृश्चिक, मुल त्रिकोण कर्क / मकर,स्वगृह, काही नाही. मित्र राशी मेष/तुला. जातकभरण अमते उच्च राशी मिथुन/धनु, स्वगृह कन्या/मीन. जौमिनीय सुत्रात: रहू स्वगृह कुंभ, केतू-वृश्चिक.


साधारण पणे राहुला वृषभ, मिथुन, कर्क आणि कन्या ह्या राशी शुभ आहेत व केतूला वृश्चिक, धनु मकर आणि मीन ह्या राशी शुभ आहेत. हे तमोग्रह उपचय स्थानात बलवान असतात. हे छाया ग्रह रोज ठराविक गतीने ( ३ कला ११ विकला ) राशी चक्रांत उलट गतीने फ़िरत असतात. राहुला ३६० अंश भ्रमण करण्यास साधारण १९ वर्षे लागतात. राहू एका वर्षात साधारण १९ अंश जातो. ह्या ग्रहाची फ़ले शनी सारखी असतात. व केतू ग्रहाची फ़ले मंगळासारखी असतात. राहु वक्री दृष्टीने ५-७-१२ स्थानावर पाहातो. राहुची दृष्टी पुष्कळ ज्योतिषी ध्यानात घेत नाही. पश्चिमात्य लोक कुंडलीत राहु केतूचा विचार ध्यानात घेत नाही. अलिकडे त्याचा विचार फ़लीताकरता ते लोक घेऊ लागले आहे. विंशोंत्तरी महादशेत राहुला १८ वर्षे व केतूला ७ वर्षे दिली आहेत. त्यामुळे विशोंत्तरी महादशेत त्यांना महत्व प्राप्त झाले आहे.

राहू आणि केतू :- संपत्ती, संतती, वातव्यार्धीपासून अचानक आजार, दु:ख, अडचणी, विधवा स्त्रियांशी संबंध अथवा अन्य श्य्द्र जातीतील स्त्रीलाभ, सांपात्तिक नुकसान, पिशाच्च्चबाधा, मोक्षप्राप्ती इत्यादि गोष्तीचा हा ग्रह कारक असून राहूचा मुख्य अंमल गावाची वेस व तीर्थक्षेत्रातील बाहेरची जागा यावर असतो. केतूचा अंमल स्मशान, घरातील कोपरे व गावातील कोठ्याच्या जागा यावर असतो. राहूपासुन आजोबा आणि केतूपासून आईचे वडील यांचा बोध होतो. देवी, गोवर यासारखे रोग, विषारी प्राण्यांपासून पीडा, शत्रूची गूप्त कारस्थाने, हलक्या जातीच्या लोकांपासून पीडा, यासंबधी प्रश्नकुंडलीवरुन विचार करावयाचा असता राहू आणि केतू यावरून ही फ़ले पाहावीत. राहू नैऋत्य, केतू वायव्य ह्या त्यांच्या दिशा आहेत.

राहू केतू चे शुभ भाव म्हणजे क्रेंद्र स्थाने विशेष करुन चतुर्थ व दोन त्रिकोण स्थाने पंचम व नवम ही होत. ह्या स्थानात हे तमो ग्रह असता ते शुभ फ़ल देण्यास समर्थ होतात. ते स्वत: मात्र पाप प्रकृती ग्रह आहेत. इतर स्थानात त्यांची स्थिती, ते एकटेच असल्यास अनिष्ट फ़ल देणारी असते. पण ससे स्थित असून शुभफ़ले देणा-या ग्रहांबरोबर युक्त असतील तर शुभ फ़ल देतील तसेच जर केंद्राअत व त्रिकोणात असून पाप युक्त असतील तर पाप फ़लेही देतील.

हे ग्रह केंद्रात असून त्रिकोणाधिपती बरोबर संबंध करीत असतील किंवा त्रिकोणात असून केंद्राधिपती बरोबर संबंध करीत असतील तर राजयोग कारक होतात. पण केद्रेश युक्त व त्रिकोणात असून त्रिकोणेश युक्त असता राज योग होत नाही तो फ़क्त शुभ योग होईल. संबंध चार प्रकारे आहेत. सह योग, द्दष्टी योग, परिवर्तनयोग, व एकतर द्दष्टी योग अशा परिस्थितीतले छाया ग्रह असता ते संबंधामुळे त्या ग्रहाचे प्रतिनिधीत्व ( Agent ) स्विकारतात व अ त्या ग्रहांपेक्षा जोरदार फ़ले, बरे वाईट फ़ले देतात.

राहूचा स्वभाव, गुण व अवगुण व प्रभत्व:- संमेलने, भ्रम देणारा वर्मी बोलणारा, पाखंडी, जुगारी, संधिकालात बलवान, गुप्त कारस्थानी, तुरुंगवास देणारा, परदेश गमन करणारा, अपवित्र, अशुध्द, पांथरी वाढणे, खोटारडा, खालीपाहुन चालणारा, गोधळ्या, संशयग्रस्तता, यात्रा करणारा, दक्षिणेकडे राहणारा, पर्वत द-या अरण्ये यात राहणारा, ओबडधोभड जागेत राहणारा, वात कफ़ कारक, इंद्रजाल, मंत्रतंत्र जाणाणारा अथवा त्यावर विश्वास ठेवणारा, भुतपिशाच्च यांनी झपाटलेला, पोटात वायुविकार असणारा, दाहक व भिती वाटणारा, तीव्र, दु:ख मातामह, दुर्गा भक्त, डोळ्यात टिक येणे, वेड, उन्माद, मानसिक विकृती, संतती दोष असणारा, भाडोत्री घरात राहाणारा, दुस-याच्या पैशावर चैन करणारा.

राहूची दशा:-

राहूच्या दशेत काही शुभ ग्रहांची अंतरदशा चालू असेल अथवा अशुभ ग्रहांची अंतरदशा चालूअ असेल, तर प्रत्येक कामात आडकाठी, मघार घ्यावी लागेल. या राहूच्या दशेत रवी, मंगळ आणि केतू यांची अंतरदशा नुकसानीकारक जाईल.

जर राहू नीच असेल व चंद्रही नीच असेल, तर राहूची दशा चंद्राचे अंतरदशेमध्ये व्यक्तीस मिरगी नावाचा रोग होईल किंवा चक्कर आल्यासारखे वाटेल, याप्रमाणे बुध व शुक्र नीच असेल तर राहूचे दशेत शरीरावर कोड किंवा डाग होण्याचा संभव आहे.

जर केतू नीच असेल तर व्यक्तीस मुख्यत्वे करुन केतूच्या प्रत्येक द्र्हाच्या अंतरदशेमध्ये कोणत्या नाकोणत्या रोगास वळी पडावे लागेल. जर केतूची दशा असेल, जर शुक्र नीच असून त्याची अंतरदशा चालू असेल तर योनीचा कर्करोग होण्याची शक्यता आहे. किंवा योनीचा दाह, पीडा, शक्यता आहे. जर केतुच्या दशेत चंद्राची अंतरदशा चालू असेल, तर गुप्त रोगाची चिंता वाढेल. रवीची अंतरदशा असेल तर शरिराचे आतील बाजूस हाड मोडेल. केतू व मंगळ दोन्ही नीच असतील किंवा दोन्ही ग्रहापैकी कोणताही एक ग्रह तूळेत असेल, केतूच्या दशेत मंगळाचे अंतरदशेत रक्तदाब विकार होईल, जर केतूमध्ये शनीची अंतरदशा असेल, तर व्यक्तीस चर्मरोग होतात. केतूमध्ये राहूची अंतरदशा चालू असेल तर शत्रूच्या दृष्ट कारवाया वाढतात.

जन्मकुंडलीत मूळचे ग्रहयोग त्य त्या व्यक्तीची शारिरीक आरोग्यकारक स्थिती कशी राहणार हे दर्शवितात. त्याचप्रमाणे शरिरातल्या कोणत्याही विभागास व इंद्रियास पाप ग्रहाच्या प्राधान्ययोगामुळे विकार उत्पन्न होणे शक्य व संभवनीय आहे. जन्मत: कोणत्याही विभागार विकृती आहे. शरिरातील अस्थी रक्त मांस इत्यादी त्याच प्रमाणे सप्तधातूपैकी कोणत्या धातूचा अधिक उणेपणा आहे. शरीर पुष्ट व सकस राहणार की कृश आणि सामान्य राहाणार इत्यादि सुखाच्या व आरोग्याच्या बाबतीतील स्थूल सूक्ष्म अशा महत्वाच्या सर्व गोष्टीचा बोध जन्मस्थ ग्रह आणि स्थाने यावरुन फ़ार बारकाईने सूक्ष्म विचार केल्यास होतो. विशेषत: शरिरातील कोणत्या विभागात विकृती व दु:ख निर्मांण झाले आहे आणि विकाराचे व रोगाचे मूळ कोणत्या ठिकाणी आहे हे कळल्याने व त्याचे स्थाननिदर्शक स्पष्टीकरण झाल्याने उपाययोजनेस सौलम्य येते. ह्या गोष्टीचा विचार प्रत्येकाने केला पाहीजे

असे बरेच सांगण्या सारखे आहे पंरतु वेळे अभावि शुध्द लेखनातील चुका दुरुस्त केल्या नाहीत तसेच लेखन करु शकत नाही. अधिक माहीती पाहीजे असल्यास कुंडलीची भाषा खण्ड दुसरा ग्रंथाचा अभ्यास करावा ग्रंथ मिळण्याचे ठिकाण ज्योतिर्विद्या संशोधन मंडळ, नाशिक

वर्ग  क्रंमाक चार

आपण जी सुरुवात केली आहे ती नवमांश पध्दतीने आहे. नवमांश म्हणजे काय? नवमांश म्हणजे एका राशीचा नववा भाग होय. नुसत्या राशीवरुन भविष्य कथन अडचणीचे व अवघड झाल्यामुळे राशीचे भाग करुन व त्यांच्या होरा, द्रेष्कण, सप्तमांश, नवमांश, द्वादशांश व त्रिशांश कुंडल्या तयार केल्या व त्या वरुन सप्तवर्ग तयार झाले. भविष्य कथनात त्याचा फ़ार उपयोग होऊ लागला. होरा:- संपत्ती विचार, द्रेष्काण:- भांवड विचार, सप्तमांश:- संतती विचार, नवमांश :- पती-पन्ती विचार ( याखेरीज इतर पुष्कळ गोष्टीचा विचार ), द्वादशांश:- माता पिता, त्रिशांश:- अरिष्टाचा विचार करतात.

या सर्वात नवमांश कुंडलीस अनन्य साधारण महत्व आहे. नवमांश कुंडलीमध्ये पती-पन्ती विचारा याखेरीज इतर पुष्कळ गोष्टीचा विचार होतो. एक नवमांश म्हणजे राशीचा ९ वा भाग तो तीन अंश २० कलेचा चा असतो एक राशीत २ नक्षत्रे येतात. म्हणजे त्या राशीतील नक्षत्राचे एकेक चरण हा नवमांश चरण असतो.

जन्म लग्न राशी व नवमांश लग्न राशी एकच असली म्हणजे ते लग्न वर्गोत्तम असते. त्याने कुंडलीचा दर्जा वाढतो. जन्म कुंडलीतील स्वगृहीचा ग्रह जर नवमांसह कुंडलीत स्वगृही आला तर तो वर्गोत्तम ग्रह होतो. त्याचे शुभ फ़ल चांगले मिळते. या प्रमाणे ग्रहाचे बलाबल पाहाण्यास नवमांशाचा फ़ार उपयोग होतो. ग्रहांना मिळणा-या विविध बलामध्ये नवमांश बलाला विशेष मानाचे स्थान आहे. नुसत्या राशीवरुन निर्णय न घेता त्याचे नवमांश बलाचा विचार करावा. ते करत असताना ग्रहांच्या अवस्था सुध्दा महत्वाच्या आहेत प्रत्येक ग्रहाला महत्वाच्या तीम अवस्था असतात. १. जागृत २. स्वप्न, ३. सुप्त.

१. जागृत अवस्था :- जे ग्रह स्वराशीत किंवा उच्च राशीत येतात त्यांची जागृत अवस्था असते.

२. स्वप्न अवस्था :- जे ग्रह मित्र नवमांशात असतात ते आपल्या मित्राच्या डोक्यावर आपला भार सोडुन स्वप्नामध्ये राहातात.

३. सुप्त अवस्था :- जे ग्रह शत्रु किंवा नीच नवमांशी असतात ते सळर ध्यांनस्त बसतात. त्यामुळे त्याचा उपयोग होत नाही.

सर्व नवमांश हे चर राशीपासून सुरु होतात. तसेच चर राशीचे नवमांश लग्न स्थानापासून स्थिर राशीचे नवमांश पंचम स्थानापासून व द्विस्वभाव राशीचे नवमांश नवम स्थानापासून सुरु होतात.

मेषांशस्वरुप:- गेल्या वेळी आपण सर्वतोभद्र चक्रा मधिल मेषराशीचा पहिला तस्करांश पाहिला. आता मेषांशस्वरुप कसे असते ते बघु. आकाशात जे नक्षत्र तारका समुहनी बनलेले असते त्यामधील काही मुख्य तारका समुहाच्या सानिध्यात काही मंद प्रकाशाच्या तारका असतात. त्यांचा विचार भविष्य कथनात आजकालचे ज्योतिषी घेतनाहीत. त्या सर्व ग्रह व दशा योग्य असताना सुध्दा अपघातासारख्या घटना घडताना दिसतात.

उदा. रस्ता ओलांडताना आपण मध्ये उभे असताना एखादे वाहन जर नकळत आपल्या पाठिमागून किंवा समोरुन जोरात गेल्यास आपला तोल जातो किंवा क्षणभर आपण आपले भान हरवुन बसतो.

राशीत व नक्षत्राच्या भ्रमण मार्गात अनेक तारका समुह व उल्का, धुमकेतु असतात त्यातिल काहीचे मार्ग ठरलेले असतात. ह्यचा जर विचार भविष्य कथनात केला तर आपण जास्त प्रमाणात अचुकतेने भविष्य फ़ल कथन करु शकतो.

मेषराशीतला पहिला अंश तील

राफ़ेल:- उजव्या हातात विळा व डाव्या हातात लढण्याचे शस्त्र धारण करणारा पुरुष.

चारुबेल :- एका अमर्याद मैदानाच्या मध्यभागी नागरीत असलेला पुरुष.

सेफ़ारिअल :- एक वलवान पुरुष उभा आहे. त्याचा पोषाख चामड्याचा किंवा जाड्याभरड्या जड व सैल अशा जिनसांचा आहे; त्याचे खांदे बहुतेक उघडेच आहेत व त्याच्या हातात एक जबर सोटा आहे. या व्यक्ति वरुन मारुतीची ( हर्क्युलिसची ) आठवण होते.

वरिल सर्व गोष्टीच्या उपयोग भविष्य कथनात आपण करु शकतो.

शनिवार, ७ नोव्हेंबर, २००९

३० दिवसात दोन वेळा आपल्याला साडेसाती येते त्याला काय म्हणतात?


र्वग क्रंमाक तीन:- अश्विनी नक्षत्र


कुंडलीशास्त्रात गोचर ग्रहांचा जसा आपण विचार करतो तसा गोचर नक्षत्राचा विचार करुन जर जातकास सल्ला का देऊ नये? साडेसाती आपण चंद्र-शनी भ्रमणाचा विचार करतो. पण ३० दिवसात दोनदा आपल्याला साडेसाती येते त्याला काय म्हणतात? हा विषय सष्टकरुन सांगण्यास बराच अवकाश आहे. फ़क्त शनि मंगळ ज्या स्थानात असतात त्या स्थानाची फ़ळे देताना विरुध घटना का घडतात?
आकाशात २७ नक्षत्र भ्रमणाचा मार्ग ठरलेला आहे.
उदा. मूळ नक्षत्रास सर्वजण घाबरतात, पण ह्या नक्षत्राचे काही चांगले परिणाम आहेत. हे नक्षत्र फ़ाल्गुन, जेष्ठ, वैशाख, मार्गशिर्ष ह्या वेळी पाताळी असते. आषाढ, अश्विन, माघ, भाद्रपद ह्या वेळी स्वर्गी असते. श्रावण कार्तिक, चैत्र, पौष ह्या वेळी नक्षत्र मृत्यूलोकी असते. त्या प्रमाणे प्रत्येक नक्षत्र डोक्यावरती, पायाखाली, उजव्याबाजूस, डाव्याबाजूस असल्याने आपणास वेगवेगळी फ़ळे देताना दिसतात.


ज्या जातकाची जी दशा चालु असते त्या प्रमाणे त्या जातकास फ़ळे मिळतात, जरा दशा बद्दल झाला म्हणजे कळेल. दिलेल्या फ़ळाचे कसे विपरीत परिणाम होतात ते. नक्षत्राचे किती महत्व असते ते तुम्हीच स्वतावर प्रयोग करुन बघा. आपल्या जन्मपत्रिकेत ताराचक्र ते कसे बघायाचे ते आज पर्यत काही ज्योतिष मंडळी आपल्या जातकास सांगत नाही ह्याचा जर उपयोग आपल्या दैनदिनी जिवनात केल्यास कसा चागला परिणाम साधता येतो ते बघा. उदा. श्रीमती सोनिया गांधी चे ताराचक्र आपणास दिले आहे. (नक्षत्राचा समाप्ती काळ प्रत्येक दिनदर्शिकेत तसेच काही वर्तमान पत्रात आपणास मिळेल). 



ताराचक्राची सुरुवात आपल्या जन्मनक्षत्रापासुन होते. १. उत्पत्तीकारक २. संपत्तीकारक ३. विपत संकटदायक ४. शुभकारक ५. अशुभ ६. साधक, ७. वधकारक ८ मित्रता दर्शक, ९. परम मैत्री ह्या प्रमाणे प्रत्येक घरात तीन नक्षत्रे ज्याचे स्वामी एक आहे असे येतात. यातील ३,५,७ या घरातील नक्षत्रात कोणताही निर्णय घेताना विचार पुर्वक निर्णय घ्यावा.


उदा. कार्यालयातिल एकद्या प्रश्नाला उत्तर देऊद्या.  कोणताही विषय समाप्त करावयाचा असेल तर या दिवशी आपण पत्र देऊन बघा, त्याचा योग्य परिणाम आपणास मिळेल. व काही वाद न होता केस सामोपचार किंवा ती केस बंद केली जाईल. पण ह्याच बरोबर आपली दशा व ग्रह पाठबळ सुध्दा महत्वाचे आहे. (पण या शास्त्राच्या मते वध नक्षत्राच्या दिवशी आपणास कमीत कमी ९०% फ़ळे आपल्या बाजुनी मिळतात.)

अश्विनी नक्षत्र आज आपल्या पुर्व ईशान्य दिशेकडे आहे. श्री सचिन पिळणकर ह्याच्या लेखातील माहीती व काही फ़ोटो आपणास देत आहे त्याचा अभ्यास करावा. 



 




गुरुवार, ५ नोव्हेंबर, २००९

|| ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् ||

दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो. आज संकष्ट चतुर्थी श्री भोल्या शंकराच्या पुत्राचा दिवस जसा पितामहा भोला तसा त्याचा मुलगा. बघा आळवणी करुण कर्जातून काही प्रमाणात मुक्त होता येते का?


|| ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् ||

श्रीगणेशायनमः|| ॐ अस्य श्रीॠणमोचन महागणपतिस्त्रोत्र मंत्रस्य भगवान् शुक्राचार्याॠषि: ॠणमोचनगणपतिर्देवता ॠणमोचनार्थे जपे विनियोगः ॐ स्मरामि देवदेवेशं वक्रतुण्डं महाबलं ||
महाविध्नहरं सौम्यं नमामि ॠणमुक्तये ||१||

महागणपतिं देवं महासत्यं महाबलं || महाविध्नहरं सौम्यं नमामि ॠणामुक्तये ||२||
एकाक्षरं एकदंतं एकब्रह्मसनातनं || एकमेवारव्दितीयं च नममि ॠणामुक्तये ||३||
रक्तांबरं रक्तवर्णं रक्तंगधानुलेपनं || रक्तपुष्पै: पूजामानं नमामि ॠणामुक्तये ||४||

कृष्णांबरं कृष्णवर्णं कृष्णगंधानुलेपनं || कृष्णपुष्पै: पूज्यमानं नमामि ॠणमुक्तये ||५||
पीतांबरं पीतवर्णं पीतगंधानुलेपनं || पीतपुष्पै: पूज्यमानं नमामि ॠणमुक्तये ||६||
धूम्रांबारं धूम्रवर्णं धूम्रगंधानुलेपनं || धूम्रपष्पै: पूज्यमानं नमामि ॠणमुक्तये ||७||

सर्वांबरं सर्ववर्णं सर्वगंधानुलेपनं || सर्वपुष्पै: पूज्यमानं नमामि ॠणमुक्तये ||८||
भद्रजातं च रुपं च पाशांकुशधरं शुभं || सर्वविघ्नहरं देवं नमामि ॠणमुक्तये ||९||

यः पठेत् ॠणहरस्तोत्रं प्रातःकाले शुचिर्नरः || षण्मासाभ्यंतरे चैव ॠणच्छेदो भविष्यति ||१०||
इति श्रीब्रह्मांडपुराणे ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रं संपूर्णम् |

बुधवार, ४ नोव्हेंबर, २००९

कुंडलीत कोठेही मंगळ व शनिची एकत्र पणाने संचार म्हणजे जातकाच्य आयुष्यात स्थांनाच्या फ़ळा प्रमाणे विरुध्द घटना.



वर्ग क्रंमाक दोन :-
अश्विनी नक्षत्राची वैशिष्ट्ये:- केतू शुभ ग्रहाबरोबर नसेल व दूषित असेल तर हे नक्षत्र संतती प्रदान करत नाही. स्त्रियांना गर्भधारण झाल्यास गर्भपाताची शक्यता असते. कोणत्याही उपचाराचा फायदा होत नाही. त्यामुळे बर्‍याच स्त्रियांना संतती प्रापतीचा उपभोग घेता येत नाही. काम शक्ति क्षीण असते. पण याच्यावर जर शुभ ग्रहाची दृष्टी असेल तर किंवा ह्या नक्षत्राच्या खोल्या मध्ये शुभ ग्रह किंवा गोचरीचे शुभ ग्रह असल्यास कुप्रभाव कमी होतो.
या नक्षत्रावर जन्मझालेल्या व्यक्ति विचारशिल, अध्ययनशील, अध्यपानाचे कार्य करणारे. ज्योतिषी, वैद्यकीय शास्त्रा रुची असणारे, ( हैयो हैयोयो ) लेखक, इमादार, चंचल प्रकृतीचे, निसर्ग भ्रमण प्रिय, आंगावर चामखीळ व त्वचेचे विकार असणारे, गृहकलह माजवणारे, महत्त्वाकांक्षी विचारांचे असतात.

विशोत्तरी मतानुसार ही व्यक्तीच्या जन्मताच केतूच्या महादशेच्या चरणात येते. केतूची दशाचा काळ सात वर्षचा मानला जातो. केतूच्या दशेत मंगळ प्रभावी असेल याच्या उलट मंगळाची दशा चालु असून केतू प्रभावी असेल तर लग्न कुंडलीच्या ग्रह स्थांना नुसार फलप्राप्ती होईल. त्या व्यतिरिक्त नाडी ( चड्डीची नाही ) पध्दतीनुसार फलप्राप्ती होईल. (आकृती पाहा ) प्रत्येक नक्षत्राची नाडीचा उल्लेख केलेला आहे. ह्या नक्षत्रावरुन कोणताही ग्रह गेला तर त्या ग्रहानुसार व स्थाना नुसार जातकास फल प्राती होईल
आपणास दरोज दिसणार रविग्रह दरवर्षी वैशाख महिन्याच्या सुरवातीला ह्या नक्षत्रा कडे तेरा दिवसाच्या पहुणचारासाठी येतो. चे,चु,चो,ला याच्या कडे एका पाठोपाठ तीन ते साडे तीन दिवस प्रत्येक खोलित आपला मुक्काम करत असतो. त्याच वेळी तो कुणाला चांगली फळे देतो किंवा त्यांच वेळी दुसरा कोणताही ग्रह तेथे मुक्काम करत असेल तर तो त्याच मित्र शत्रु सम प्रमाणात जो जसे असेल त्या प्रमाणे आपल्या जवळील अस्त्राचा उपयोग करुन जातकास त्याप्रमाणे फळे देतो.
रवीचे मित्र चंद्र, मंगळ, गुरु ह्याच्या बरोबर असताना त्याची जंगी पार्टी होत असते. शनि आणि शुक्राला तो आपला शत्रु मानत असतो. बुधाला तो आव जाव घर तुम्हारा सम मानतो.
हा वर्गत्तम नवंमाश असल्यामुळे या ठिकाणी शुभ किंवा अशुभ ग्रह फ़लिताच्या दृष्टीने अतिशय बलवान असतात. शनि हा शत्रु असल्याने तो नीच असतो. रवि व मंगळ या नवमांशात बलवान व राजयोगकारक ठरतात. हे ग्रह शौर्य, धैर्य, सत्ता, अधिकार, कीर्ति अथवा लौकिक अशि फ़ळे देताना अनुभवास येतात. जन्मकुंडली मध्ये केन्द्र कोणांत १,४,७,१०,५,९, स्थनचे रवि व मंगळ या नवमांशी राजयोगकारक ठरतात. नवमांश कुंडलीत क्रेद्रांत हा नवमांश वर्गोत्तम असतां व्यक्ति भेद क्ररुन पुढे येतात.
मेषराशीतील मेष नवमांशी कुंडलीत कोणतेही ग्रह असता ( शनि सोडुन ) तमोगुण शीघ्रकोपी, दीघोंद्योंग व महत्वाकांक्ष हे गुण सामान्यत: आयुश्यात अविष्कृत होत्तांना दिसतात. प्रयत्न व पाराकाष्ठा हा गुण या नवमांशात आढळतो.
ह्या स्थांना मंगळ व शनि एकत्र असल्यास गंभीर परिणाम जातकाच्या जिवन शैलित त्यास अनुभवास येतात. तसेच कुंडलीत कोठेही मंगळ व शनिची एकत्र पणाने संचार म्हणजे जातकाच्य आयुष्यात स्थांनाच्या फ़ळा प्रमाणे विरुध्द घटना.
सर्वतोभद्र चक्र प्रमाणॆ पहिला सूक्ष्मांश म्हणजे तस्करांश जर जातकाला हा अंश प्राप्त झाला असेल तर जातकाची वर्तणुक तस्कराप्रमाणे म्हणजेच चोरी, कुमामार्गची असते.
( जर अभ्यासा साठी सर्वतोभद्र चक्र हे दुर्मिळ पुस्तक पाहिजे असल्यास आपण माझ्ये पारंपरिक ज्योतिषशास्त्र गुरु सौ. मिनल कुलकर्णी ( ज्योतिष शास्त्री ) यांनी मराठीतून लिहिलेले हे पहिले व एकमेव पुस्तक आपण त्यांच्याशी संप्रर्क करुअन प्राप्त करु शकतात.  टेलिफ़ोन नं 022-28695120 / Mob. 9322030404 )

सोमवार, २ नोव्हेंबर, २००९

श्री विष्णुपुजन व शिवरुद फ़ोटो

आमच्य "वंदना सदन" विरार संकुलात माझ्या घराच्य समोर श्री विष्णुपूजन व शिवरुद्र संपन्न झाला. संकुलातिल श्री व सौ निगुडकर मुख्य पुजेला स्थानापन झाले. इतर माननिय मंडळीनी हातभार लावुन कार्य संपन्न केले.

शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २००९

धडा पहिला कुंडलीची ओळख:-

धडा पहिला कुंडलीची ओळख:- गणितात आपण “क्ष” हे नाव घेऊन किंवा सुत्र घेऊन गणिताचे समिकरण सोडवितो त्याच प्रमाणे माणसाच्या जिवणाचे समिकरण सोडवण्यास ज्योतिष पध्दतीत १२ घराचे समिकरण किंवा सुत्र विकाशीत करण्यात आले आहे. कोणते ही मोजमाप करताना परिमाणाची आवश्यकता असते. त्या प्रमाणे ज्योतिषशास्त्रात सुध्दा परिमाणाची आवश्यकता असते. ज्या माननिय लोकांनी ही पध्दत आपल्याला उपलब्द करुन दिली आहे त्याचे आपण ऋणी आहोत. काही समीकरण किंवा योग्य सिध्दांत न मांडल्यामुळे ह्या विद्येवरील समाजामध्ये काही लोकांची श्रध्दा योग्य प्रमाणात बसली नाही. आपण जो हा विषय शिकणार आहोत त्या विषयी माझ्या संत्तगुरु व इतर गुरुवर्या कडुन जे जे प्राप्त झाले आहे ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणा आहे.


अभ्यासाला सुरुवात करण्या पुर्वी प्रथम आपण आपल्या भक्तिपुर्वक देवाला किंवा आपण ज्या गोष्टीला अभिवादंन करतात त्याचे स्मरण करुण ज्योतिषशास्त्र या विषयाला सुरुवात करुया. ह्या अभ्यास क्रमात नावाजलेल्या लेखाकाची व प्रकाशकाच्या पुस्तकाचा संदर्भ देण्यात येईल. अधिक माहीती साठी जमल्यास आपण ती विकत घेऊ शकतात. कॊपीराईट मुळे सर्वगोष्टी आपणास येथे देण्यात येणार नाही. ह्या गोष्टी शिकवताना ज्या लेखकांनी किंवा प्रकाशकानी संमती दिली असेल अशा गोष्टी आपणास त्याचा मुळ लेखनाची प्रत उपलब्ध होईल या गोष्टीची नोंद घ्यावी.

पदविच्या परिक्षेसाठी खालील ठकाणी आपण संपर्क करु शकता. माझ्या कडे फ़क्त शिकवणी वर्ग आहे. आपल्या कडुन कोणत्याही प्रकारे शिकवण्याचे मानधन घेतले जाणार नाही. फ़क्त गुरुदक्षिणा म्हणुन आपण कोणलाही गरजु मुलांना किंवा गरिबला औषधासाठी आपल्या ऐपती नुसार माझी गुरुदक्षिणा म्हणुन आपण त्यांना पैसे (नकद) न देता लागणारी वस्तु खरेदी करुन द्यावी हि विनंती.

१. पोस्टाद्वारे ज्योतिष शिक्षण देणारी संस्था “फ़ल ज्योतिष अभ्यास मंडळ/संस्था, पुणे, महाराष्ट्र अध्यक्ष पं विजय श्रीकृष्ण जकातदार दुरध्वनी +91 020 24455826 ( सकाळी १० ते दुपारी ०२ ).

२. फ़लज्योतिष प्रबोधिनी, नाशिक ( सलग्न महराष्ट्र ज्योतिष परिषद, मुबंई ) श्री किरण देशपांडे मो. क्रंमाक 9421507583. श्री श्रीनिवास कृ. रामदास मो.क्रंमाक 09422268321

३. ज्योतिर्विद्या संशोधन मंडळ, नाशिक. (महाराष्ट्र) 0253-2507178 वेळ दुपारी ०२ ते ०७ पर्यंत.

वरिल ठिकाणी मुक्त विद्यापिठाचे प्रवेश सुरु आहे आपण आपल्या जबाबदारी वर प्रवेश घ्यावा. इतर काही संस्थेची माहीती आपणास वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करीन.

आजचा वर्गातील अभ्यास क्रंमाक १.

कुंडली ओळख, सर्व साधारण मी प्रथम माहीती दिल्या प्रमाणे कुंडलीचे स्वरुप आहे. परंतु काही विभागात वेगवेगळ्या पध्दतीने कुंडली माडण्याते येते. ती कशी असते ते आपण नंरत पाहू. सर्व साधारण लोक चौकोनाला प्राधान्य देतात. प्रथम आपण एक चौकोनाची आखणी करु. त्यां चोकोनाचे चारही कोन एकमेकांना जोडुन आकृतीत दाखवल्या प्रमाणे त्यांच्या चारही रेषेच्या मध्य बिंदु पासुन त्या मध्ये एक चौकोनाची आखणी करुन घेऊ. नेहमी प्रत्येक गोष्टीला परिणामाचे बंधन असते. कुंडली शिकताना मनात येईल असा चौकोन न काढता एका विशिष्ठ मापामध्येच त्याची आखंणी करण्याचे मी आपणास बंधन घालणार आहे. त्यांच बंधनात राहुन आपण ही गोष्ट आत्मसात करावयाची आहे.

सर्वात प्रथम आपल्याला काही साहित्य खरेदि करावे लागेल. त्याची सुची खालील प्रकारे आहे.

१. सफ़ेद पेपर साईज 57 cm X 38 cm किंवा त्यापेक्षा मोठी साईज सुध्दा चालेले पण लाहान नको.

२. फ़ुटपट्टी ( Ruler ), पेन्सिल, रबर,

३. पंचाग ( आपल्या विभागा प्रमाणे )

आकृतीत दाखवल्या प्रमाणे 30 X 30 cm चा चौकोन कागदाच्या मध्यावर आखुन घ्या. व कुंडली तयार करावी आता त्याचे ऎकुन बारा भाग झाले त्यातिल प्रतेक भागाला एक विशेष नाव दिले गेले आहे. पंचागा बद्दल बरीच माहीती नेटवर प्रसिध्द करण्यात आली आहे त्यां मुळे मी ती येथे देत नाही. मीसळपाव ( www.misalpava.com ) वर आपण ती शोधल्यास सापडेल.

बारा घरातील पहिल्या घराला तनु व लग्न स्थान असे संबोधतात. ह्या विभागाचे क्षेत्र ०० ते ३० अंशा पर्यंत विभागले आहे. असे प्रत्येकी ३० अंशाचे १२ भाग म्हणेजे एक काल पुरुषाची कुंडली म्हणून संबोधले जाते. ह्या ३० अंशात कमी जास्त प्रमाणात नक्षत्राची दादागीरी चालते प्रत्येक नक्षत्र हम दो हमारे दो ह्या नियमा नुसार चालते. त्यातिल काही नक्षत्रे दोन घरात ( कुंडलीतील दोन भागात ) आपले हक्क सांगतात तर काही नक्षत्रे फ़क्त २५% हक्काची अंमल बजावणी एका घरात करताना दिसतात व दुस-या घरात ७५% हकाची अंमल बजावणी करतात.

प्रत्येक घराच्या आतमध्ये नऊ खोल्या असतात. त्यातिल प्रत्येक खोलीला एक विशिष्ठ महत्व प्रप्त झाले असते त्यालाच नंवमाश असे म्हणतात. आता आपण १२ पैकी पहिल्या घराची ओळख करु घेवु. ह्या घराचे नामकरण “ मेष “ असे करण्यात आले आहे. याच्या बरोबर तीन नक्षत्राचा सहवास असतो. ती म्हणजे १. अश्विनी १००% २. भरणी १००%, ३. कृतिका २५% ह्याची दादागीरी येथे चालते. त्यांच्या नऊ खोल्यांचे नामकरण चू चे चो ला ली लू ले लो आ अशा प्रकारे केले गेले आहे. प्रतेक खोल्याचे मापे सुध्दा आखुन दिलेली आहेत. पहिले खोली ०० ते ०३.२० अंशा पर्यत २. ०३.२० ते ०६.४० अंश ३. ०६.४० ते १०.०० अंश ४. १०.०० ते १३.२० अंश. ५. १३.२० ते १६.४० अंश ६, १६.४० ते २०.०० अंश. ७. २०.०० ते २३.२० अंश ८. २३.२० ते २६.४० अंश. ९. २६.४० ते ३०.०० अंश अशा प्रकारे त्याचे वाटप झाले आहे. त्या प्रत्येक घारामध्ये एक विशिष्ठ ग्रहाला व राशीना स्थांने वाटुन दिली गेली आहेत. हा सगळा नवांशचा घोळ कुंडली चे वाचन करताना कामाला येतो. पहिल्या घराच्या प्रत्येक खोलीत त्यांचा चरणस्वामी व नवांश राशीचा अधिकार असतो उदा. पहिल्या खोलीत चू कडे चरणस्वामी मंगळ व नवांश राशी मेष. २ चे कडे शुक्र-वृषभ, ३. चो कडे बुध-मिथुन ४. ला कडे चंद्र-कर्क असे अश्विन नक्षत्रा कडे १ ते ४ चरणाचे २५% चे चार भाग दिले आहेत. आत आपण अश्विन नक्षत्राची ओळख करु घेऊ.

अश्विन नक्षत्र :-

पहिले नक्षत्र, याचे क्षेत्र ० अंश ते १३ अंश २० कला मेषराशीत आहे . याचा राशी स्वामी मंगळ असुन ऩक्षत्र स्वामी केतु, योनि अश्व, नाडी आद्य, गण देव, नामाक्षर चू,चे,चो,ला कुंडलीतील घर क्रंमाक १ खोली क्रंमाक १ ते ४ वर आपला अधिकार. वेगवेगळ्या खोलीत वेगवेगळे चांगले किंवा वाईट परिणाम देण्याची क्षमता आलेल्या गोचरीच्या ग्रह पाहुण्याच्या स्वभावा नुसार फ़ळे.

शरीर भाग :- मस्तक आणि मोठया मेंदुच्या कार्यशमतेवर होतो.

नक्षत्रात होणारे रोग :- डॊळ्याला इजा, चक्कर येणे ( मिरगी ), शीतपित्त सर्दि, डोक्याला गंभिर वेदना, विसरणे, पक्षघात, मलेरिया, निद्रानाश, पोटवृध्दी,

नक्षत्राचा स्वभाव:- लोभी, विचारशुन्य, संतापी, संपती विषयी चिंत्ता, घरातील भावडा मध्ये विषेश, मंत्र-तंत्र जाणणारा, ईश्र्वरभक्त, साम्यवादी, दाग-दागिण्याची आवड ( पुण्यातील म.न.से.चा एक आमदार ), वागायला चतुर आणि बोध्दिक, कार्याने प्रतिष्ठित.

व्यवसाय:- कारखाण्यात नोकरी, पोलिस, सेना, चिकित्सा, सर्जरी, तुरुंगात नोकरी, अपराध, न्यायालय, रेल्वे, यंत्र, लोखड, पुस्तक संग्रालय, घोड्याचा व्यापार, पर्यवेक्षक, नेतृत्वप्रधान, प्रतिष्ठित अध्यक्ष.

अश्विनी नक्षत्राची वैशिष्ट्ये वर्ग क्रंमाक दोन मध्ये.