बुधवार, २३ सप्टेंबर, २००९

मुख्य घरातील देव्हारा व मुख्य दरवाज्या मुळे होणारे दोष:-

वास्तुचे वर्ग शिकवताना आमच्या सौ.च्या परिचयातील एक लीना नावाची बाई आली, आमच्या सौ. ना वास्तुबद्दल माहिती असल्या कारणा ने त्यांनी अगोदरच त्यांच्या घराचा आराखडा काढला होता. आम्ही तो फ़ळ्यावर मांडला, विघ्यार्थि येवढे खोडकर त्यांनी आराखडा काढतानाच त्यांची दु:खे सांगण्यास सुरवात केली.

१. देव्हारा चुकीच्या ठिकाणी असल्या कारणाणे घरात ऎश्र्वर्यहानी, धननाश, पश्चिम वायव्य असल्याने रोगबाधा. वास्तुची रक्तवाहीनी सुभद्रा २५ वे घर रोगस्थान व वास्तु पुरुषाची भुजा असल्याने घरात येणारा पैसा कमी पडणार. यादिशेची लक्ष्मी गजलक्ष्मी असली तरी पुजा करताना ईशान्य दिशेला पाठ म्हणजे संतानलक्ष्मी, परमेश्र्वर दिशास्वामी गुरु, वास्तु पुरुषाचे शिख ( डॊके ), याच्याकडे पाठ. यादिशेची देवता पापाराक्षसी, दिशास्वामी शनी, राशीस्वामी वृश्विक (मंगळ) याची पुजा म्हणजे बघा.

२. घराचे मुख्य द्वार नैऋते पश्चिम असल्याने वास्तुपद १७वे स्थान म्हणजे “पितर” आणि वास्तु पुरुषाचे पाय मुख्य द्वारा कडे येतात.  कन्यारास, राहु व केतु पुतनाराक्षसी, नैऋतीराक्षस ह्याचा अमल घरच्या करत्या पुरुषावर होतो.

३. या दिशेला उतार असल्यास व्यसन, अपकीर्ती, ग्रहपीडा, स्फ़ोटक, पिशाच्चबाधा, भूतप्रेतपीडा; दुष्ट स्त्रियांचा संग, चर्मरोग, मृत्य यांसारखी फ़ले भोगावी लागतात.

४. या भागात मुख्य दरवाजा असेल तर नातेसंबधात तणाव, मुलांच्या क्षिशणात अडथळे, अपघात, मुलांना मानसिक दडपण इत्यादी फ़ळे मिळतात. वास्तुच्या पुर्व दिशाच्या पदातील रक्तवाहीण्या पुर्वदिशेकडे सती, वसुमती, नंदा, सुभद्रा, मनोरमा व आग्नेयदिशेकडे इद, विशोका, ज्वाला, जया, प्रिया ह्याची ह्या वास्तुबाहेर बाहेर गेल्याने वास्तुत हानी. तसेच वास्तुपुरुषाचा हात, भुजा, मणिबंध, बगल, पोट, ऊर ह्या भागातुन वेगळे झालेल्याने त्याचा परिणाम मुख्य करत्या परुषावर झाला. तसेच काळपुरुषाच्या कुंडली प्रमाने अर्ध कर्मस्थान, लाभस्थान, व्ययस्थान, गेल्याने शत्रुपीडा, आपत्ती, कुकर्म, कष्ट, द्रव्यलाभात अडथळे, दीर्घायुष्यात बाधा, सर्वप्रकारच्या लाभात अडथळे, पितृसुख, उघ्योग, राजाकडून मान, नोकरी वरिष्टांची मर्जी, अब्रु, प्रवास, चरितार्थच्या साधनात अडथळे सासु, जानुस्थान इत्यादि लाभा पासुन वचिंत.

५. नैऋत्येचे द्वार पश्चिमभिमुख्य करुन असेल तर मिश्र फ़ले मिळेल. जिना असल्याने शुभ, द्वारासमोर व्हंराडा असल्याने अशुभ,

श्रीमती लीना यांचे यजमानाचा वयाच्या ३५ व्या वर्षी मृत्यू झाला. वरील मजल्या वर सुध्दा मुख्यघर मालकाचा वयाच्या ३८ व्या वर्षी मृत्यू झाला. त्यांमुळे श्रीमती लीना ह्यांना आपल्या उपजीवीका चालवण्यास स्त्रियांसाठि सौदर्यं पार्लर सुरु करण्याची वेळ आली. मुलांचे शिक्षणातील लक्ष उडाले. नातेसंबधात तनाव निर्माण झाला.. त्यात कमी म्हणजे ह्या घराला उंबरठा नव्हता. सौ. ह्यांनी तीला सांगुन पहिल्यादा मुख्य द्वाराला लाकडी उंबरठा योग्य मुहुर्तावर बसविला. त्यांमुळे ४०% घरात शांतता आली.
संजीव




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: