मंगळवार, २ नोव्हेंबर, २०१०

लग्नातील विक्रमी मंगळ / मंगळाची कुंडली
        वधूवर निश्र्चय पद्धति   भाग ३...          


          आमच्या विद्वान व अत्यंत विचारी आर्य पूर्वजांनी आपल्या विवाह संस्थेचा पाया फार खोल व मजबूज घातला आहे व इतका विचारपूर्वक खोल व मजबूत पाया जगातील इतर कोणत्याही राष्ट्राचे विवाह संस्थेचा आढळणार नाही. अर्थात आमची विवाह संस्था जगातील इतर राष्ट्रांतील सर्व लग्न संस्थापेक्षा अति पवित्र असल्या कारणाने ती तितकीच चिरस्थायी आहे, विशेष उन्नत आहे व विशेष उदात्तही आहे. जगांटील सर्व ऐहीक सुखे प्राप्त व्हावी, धर्म, अर्थ, काम हे तीन पुरुषार्थ सहज साधता येऊन इष्टमित्र, अतिथी अभ्यागत, पशुपक्षी ह्या सारख्या जगांतील लहान मोठ्या प्राण्यांस देववेल तेवढे सुख देता यावे, वेदविहित यज्ञयागादि पुण्यकर्मे करता यावी धर्माची व प्रजेची अभिवृद्धि होऊन आपल्या उभय कुलांतील पूर्वजांचा उद्धार होऊन अंती मोक्ष साधता यावा हेच आमच्या विवाह विधीचे अंतिम साध्य आहे; असे आमचे आर्य पूर्वज सांगत आहेत व ह्याचकरिता आम्हाला विवाह करण्यास सांगितले आहे, किंबहुना आमच्या विवाह संस्थेचे रहस्य ह्यांतच आहे व म्हणून इतर राष्ट्राप्रमाणे आमच्यांतील विवाहसंबंध तोडता येत नाहीत. ( माझे कोठल्याही विवाह संस्थेची / वधूवर मंडळाशी संबध नाहीत )

          आमच्या धर्म शास्त्रात १. ब्राम्ह, २. दैव, ३. आर्य, ४. प्रजापत्य, ५. आसुर, ६. गंधर्व, ७. राक्षस, ८. पैशाच/ पिशाच असे आठ प्रकारचे विवाह सांगितले आहेत. परंतु आज ज्यांच्यात वधुवर पत्रिका संमेलन करुन लग्ने ठरवितात अशा बहुतेक ज्ञातीत ब्राह्मविवाह पद्धत चालू आहे व तीच पद्धत शास्त्रकारांनी उत्तम ठरविली आहे. इतर प्रकारचे विवाह कांही जातीत चालू असतील. ब्राह्मविवाहांत शास्त्राधाराप्रमाणे मुलीचे बापाने वरास आपले घरी बोलावून त्यास आपली उपवर कन्या यथाशक्ति अलंकृत करुन पूर्वी सांगितलेल्या उद्देशाने दान करावयाची असते. परंतु आजकालचे विवाह असे होत नसून त्यांस देवघेवीच्या व्यापाराचे स्वरुप येत चालले आहे! अमुक हुंडा दिला पाहिजे अमुक करणी\मनधरणी केलीच पाहिजे , जाण्यायेण्याचा खर्च दिला पाहिजे वगैरे शैकडो अटी वरपक्षाकडून वधुपक्षास घालण्यत येतात. अजूनही चाल रजिस्टर होण्यापर्यंत गेली नाही हेच आमचे सुदैव होय? व हा प्रकार जुन्या अशिक्षित लोंकापेक्षा नव्या सुशिक्षित व सुधारक म्हणाविर्याे लोकांतच जास्त दिसून येत आहे, व हुंड्याचे मान मुलाची प्रवेश परीक्षा अथवा विश्र्वविद्यालयांटील एक दोन परीक्षा ज्या मानाअने उतरल्या असतील त्या मानाने कमी जास्त होत आहे. ह्याचमुळे कित्येक मुलीचे बाप धुळीस मिळाले आहेत. अशा रीतीने धर्म, कुलाचार वगैरे गुंडाळून स्वार्थपरायण होऊन शास्त्रोक्त विवाहाचे उदात्त तत्त्वास हरताळ फासणे हे आमच्या सुशिक्षित म्हणाविण्यार्याा बंधूस लाजिरवाणॅ नव्हे काय? व ह्याच मुळे कित्येंकास अशा विचित्र गृहिणी मिळाल्या आहेत की, त्या योगाने त्याच्या भावी सुखाच्या आशेची कायमची राख रांगोळी होऊन कसा तरी संसारशकट ओढावा लागत आहे. उलटपक्षी आपले समाजांत अशीही उदाहरणे आढळून येतात की, गरिबीमुळे किंवा द्रव्य लोभमुळे आपल्या सुंदर मुली त्यांच्या वयाच्या व रुपाच्या मानाने जे कोणी जास्त पैसे देतील अशा गरजु उल्लु, उतारवयाच्या वरपशूस, कुरुप किंवा प्रसंगी गुणहीन नवरदेवास केवळ द्रव्य तृष्णेमुळे किंवा दारिद्रावस्था वगैरे अनेक अपरिहार्य अडचणीमुळे अर्पण करुन त्यांच्या संसारसुखाची राख रांगोळी करितात. या गोष्टीकडॅ आमच्या सुशिक्षित बंधु वर्गाचे लक्ष जाईल काय?

          लग्न जमविण्यापूर्वी वधुवरांच्या पत्रिका पहाण्याची चाल हिंदू, जैन व पारशी ह्या लोकात विशेष आढळते व त्या पत्रिका कशा पहाव्या ह्या बद्दलचे विवेचन करण्याचा ह्या लेखात मुख्य उद्देश आहे. वधुवरांच्या पत्रिकांचे गुणमेलन झाल्याखेरीज लग्न करणे हा गौण पक्ष होय असे आमच्यांतील बर्या च लोकांचे मत आहे. पत्रिका जु़ळविणे किंवा वधुवर पत्रिकात प्रीतीयोग होत आहे किंवा नाही हे पहाणे ज्योतिशास्त्राचे काम आहे, हे शास्त्र अनुभवसिद्ध आहे, त्या सहयाने मानवी प्राण्याच्या जीवन चरित्रात काय काय गोष्टी केव्हा आणि कशा घडून येतील ह्यांची बरीच अंशाने कल्पना बांधता येते. मागील अनुभवावरुन भावी गोष्टीवद्दल सावधगिरीने वागणे हा मानवी प्राण्याचा स्वाभाविक धर्मच आहे. परंतु आमच्याकडॅ पत्रिका ज्या साधनावरुन केल्या जातात त्या साधनाची स्थिती कोण शोचनीय आहे ह्याची कल्पनाच करावी लागेते. कित्येक आई बाप फक्त मुलीला अमुक वर्ष असावे अमुक तिथीस इअतके वाज?ण्याचे सुमारास जन्म झाला असावा असे सांगून पत्रिका करवून लग्ने जुळवितात. व कित्येकांची तर ह्यचे पलिकडे धांव असते.

          आपल्या भावी पत्नीचा किंवा पतीचा स्वभाव, आर्युमर्यादा, संतती, संपत्ती वगैरे गोष्टी जाणन्याची प्रत्येकाची इच्छा असते व ती पुष्कळ अंशी याच शास्त्राचे योगाने पूर्ण होते म्हणूनच आमच्या पूर्वजांनी घटित पाहण्याच चाल पाडली असती पाहिजे. पण वरील प्रकाराने आम्ही नुसत्या चालीचा फार्स करुन ह्या शास्त्राची थट्टाच करेत आहो असे मोठ्या कष्टाने म्हणावे लागते. पत्रिकांच्या अभावी कन्या गुणी वरांस देणे ह्या उत्तम मार्ग सोडून खोट्या नाट्या पत्रिका पाहण्याचा उपटसूळ आईवाप आपले खांद्यावर का घेतात ते कळात नाही.

          ज्योतिषशास्त्र दृष्ट्या वधुयरांच्या कुंडल्या जुळवणे हे काम किती नाजुक व महत्त्वाचे आहे व ते किती विचारपूर्वक केले पाहिजे ह्याची अंशतः कल्पना हे लेख वाचतील त्यांस सहज होईल.

          पुष्कळ लोक ज्योतिष्याकडे जाऊन कुंडल्या जमवितेवेळी अमुक एक स्थळ फार चांगले आहे, हुंडा थोडा पडत आहे परंतु मंगळ जरा अनिष्ट आहे तर ह्यास कांही हरकत आहे काय वगैरे गोष्टी सांगून ज्योतिषाला आपल्या तर्फेचे मत देण्यास लावितात, व क्वचितवेळी पत्रिकाही फिरवून घेतात वधुवरांच्या कुंडल्या न पाहता लग्ने करणे हा उत्तम पक्ष होय.

         हल्ली प्रचारात चालू असलेली घटित जुळविण्याची पद्धत फारच अपुरी आहे व तिच्यावर सर्वस्वी अवलंबून राहता येत नाही असे अनुभवास येत आहे, म्हणूनच आज जिकडे तिकडे ज्योतिषशास्त्राची कांही मंडळी टार उडवीत आहेत. ज्योतिषाने ३६ गुण जुळविले असता मुलीस थोड्या अवधीत वैधव्य, घटस्फोट, प्राप्त होते किंवा पतीपत्नीत षडाष्टक आढळले आणि म्हणुनच या शास्त्रावरील लोंकांचा भरवसा दिवसेदिवस कमी होत चालला आहे. हा शास्त्राचा दोष नव्हे तर हल्ली चालू असलेल्या पद्धतीचा व घटित जुळविणाराचा दोष होय, जी पध्दत दोषयुक्त आहे तिच्यापासून चांगले परिणाम पहावयास क्से मिळावे!.

         याकरिता लग्न जुळविणारा ज्योतिषी अति निर्भीड असून स्पष्टवक्तेपणा हा गुण त्याचे अंगांत पूर्णपणे वास करीत असला पाहिजे म्हणजे त्याच हातून योग्य सल्ला मिळून सहसा ज्योतिषशास्त्राच्या विरुद्ध गोष्टी घडणार नाही.

        माझ्या लेखात ब-याच महत्त्वाच्या गोष्टीबद्दल थोडक्यांत विवेचन केलेले आढळेल. अलीकडील समाजाचे स्थिति लक्षात घेतली असतां साधारणपणे मुलाचे लग्न वीस वर्षानंतर व मुलीचे लग्न अठरा वर्षानंतर होते. मुलाचे लग्न अमच्याच वयात झाले पाहिजे असा निर्बध कोठेच आढळत नाही. परंतु गुणी वर मिळाल्याखेरीज कन्येचे लग्न करु नये असे आपले आर्यशास्त्रकार जोराने प्रतिपदन करीत आहेत हल्ली मुलामुलीचे लग्ने योग्य वयाचे बाहेर होत नाहीत.

क्रमंश.........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: